Sabitlenmiş Tweet
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
76.2K posts

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
@NCPspeaks
Official Twitter account of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
India Katılım Ağustos 2013
46 Takip Edilen765.7K Takipçiler

दैनंदिन जीवनात सरकारच्या नाकर्तेपणाची ठिणगी पडली की जनतेच्या आक्रोशाची आग भडकणारच!
परभणीमध्ये इंधन तुटवड्यामुळे लोकांमुळे हाणामारी झाली. याला जबाबदार कोण? पेट्रोलसाठी उन्हात तासनतास थांबलेली जनता? शेतीच्या कामासाठी डिझेल मिळावं म्हणून रांगा लावणारे शेतकरी? की ज्यांच्या नाकर्तेपणामुळे ही परिस्थिती जनतेवर ओढवली..ते सरकार?

MR

पक्षाचे मुंबई विभागीय अध्यक्ष, माजी आमदार श्री. मिलिंद (आण्णा) कांबळे, कार्याध्यक्ष श्री. सुहेल सुबेदार, जिल्हाध्यक्ष श्री. रुपेश खांडगे, महिला जिल्हाध्यक्ष सौ. वनिता तोंडवळकर, युवक मुंबई अध्यक्ष ऍड. अमोल मातेले आणि इतर मुंबई विभागीय पदाधिकाऱ्यांनी सायकलवरुन वरळी येथील मोठ्या नाल्यात उतरून मान्सूनपूर्व नाला सफाई व जलनिस्सारण व्यवस्थेच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ कागदोपत्री अहवालांवर सोडून चालणार नाही. नाला सफाई, जलनिस्सारण व्यवस्था आणि मान्सूनपूर्व तयारी यामध्ये फक्त आकडेवारी नव्हे, तर प्रत्यक्ष परिणाम दिसणे गरजेचे आहे. पावसाळ्यात नागरिकांचे जीव धोक्यात घालणारी निष्क्रियता आणि ढिसाळ कामे आम्ही खपवून घेणार नाही. मुंबईकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये, हीच पक्षाची ठाम भूमिका आहे.


MR

अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे उष्माघातामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यात “उष्णतारोध केंद्र” (Heat Relief Center) स्थापन करण्याची मागणी ‘राष्ट्रवादी जनहित चळवळ’ सेलचे अध्यक्ष श्रीनिवास शोभा ज्ञानेश्वर कोकाटे यांच्या वतीने करण्यात आली होती.
त्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शाखा) यांनी जिल्हा परिषद, महानगरपालिका, आरोग्य विभाग तसेच सर्व नगरपरिषद/नगरपंचायतींना नागरिकांना उष्माघातापासून संरक्षण मिळावे यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीच्या जनहित चळवळीमार्फत अशाच पद्धतीने जनतेच्या सर्वांगाने उपयुक्त प्रश्नांसाठी पाठपुरावा करण्यात येणार, ह्याची आम्ही ग्वाही देतो.

MR

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा बुलंद आवाज कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी भारतीय कामगार चळवळीच्या उभारणीत अग्रणी भूमिका बजावत कामगार संघटनांना संघटित स्वरूप दिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी ठाम नेतृत्व करत मराठी जनतेच्या हक्कासाठी आणि राज्याच्या अस्मितेसाठी सातत्याने लढा दिला. सामाजिक न्याय, कामगार हक्क आणि समताधिष्ठित समाजरचनेसाठीचा त्यांचा संघर्ष महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो.

MR

परिवर्तनाचा समग्र विचार मांडणारे राजा राम मोहन रॉय यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. राजा राम मोहन रॉय यांनी स्त्री-स्वातंत्र्य, शिक्षण आणि सामाजिक सुधारणांचा पाया रचत भारतीय समाजाला आधुनिक विचारांची दिशा दिली. सतीप्रथेच्या निर्मूलनासाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि समाजजागृतीसाठीचे कार्य आजही प्रेरणादायी आहे.

MR
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar retweetledi

विकास लवांडे यांना झालेली अटक हा लोकशाहीचा खून आहे. नागरिकांना आपलं मत मांडण्याचा अधिकार सुद्धा आज उरलेला नाही. हल्ली पोलीस यंत्रणा ही सरकारच्या दबावाखाली काम करते हे वारंवार आणि प्रत्येक वेळेला सिद्ध झालेलं आहे.
त्याचंच प्रत्यंतर म्हणजे विकास लवांडेंवर ज्यांनी शाईफेक केली त्यांना कुठल्याही प्रकारची अटक झाली नाही. याउलट खोटी तक्रार दाखल करून विकास लवांडेंवरच पोलिस कारवाई केली गेली. पोलिस प्रशासनाने इतकी तत्परता शाई फेकणाऱ्यांवर कारवाई करताना दाखवली असती, तर आम्ही समजू शकलो असतो परंतु न्याय देणारे जर पूर्णपणे सरकारच्या ताटाखालचं मांजर झाले असतील, तर न्याय कोणाकडे मागणार ? दिवस येतात आणि जातात. मी स्वतः व आमदार रोहित पवार वाघोली पोलिस स्टेशन येथे जाऊन आलो आहोत.
विकास लवांडे हे लढणारे सैनिक आहेत, घाबरणारे नाहीत. दडपशाही आणि हुकूमशाही फार काळ टिकत नसते. आता केवळ एका कोक्रोच जनता पार्टीचं नाव समोर आलं तरी देशातल्या तरुणांचा सरकारप्रती किती उद्रेक आहे हे पहायला मिळतंय. जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. अश्या पद्धतीने सर्वसामान्यांवर अन्याय होत राहिला तर ही जनताच उठाव करेल आणि नक्कीच त्यावेळेला या हुकूमशाहीचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही !
#WeStandWithVikasLawande
@VikasLawande1 @Dev_Fadnavis @RRPSpeaks @NCPspeaks




MR

आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे!
जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम असावा, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल व पक्षाच्या पालघर विभागाच्या वतीने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. सोबतच, जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनही देण्यात आले. ओबीसी समाजाला त्यांच्या घटनात्मक हक्कांपासून वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न असून केंद्र सरकारच्या या फसव्या जनगणना प्रक्रियेचा आणि त्यावर मौन बाळगणाऱ्या राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला.
या निषेध आंदोलनात पक्षाच्या ओबीसी सेलचे राज्यप्रमुख श्री. राज राजापूरकर, अनिल गावंड, निखिल पाष्टे, सुरेश पवार, अक्षता चौधरी, भक्तीताई वालटे, गणेश पाटील, किर्ती ताई मेहता, सुश्रुत पाटील, मनोज म्हात्रे, शिवाजी पाटील, मुकेश पाटील, गजानन चौधरी, अमित भोईर, शोभा म्हात्रे, आरती कुमावत व सलीम बेग यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


MR

"बहुत हुई महंगाई की मार, अब भगाओ मोदी सरकार!"
राष्ट्रवादी युवक काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयासमोर पेट्रोल, डिझेल व गॅसच्या सातत्याने वाढणाऱ्या किंमती, NEET पेपरफुटी प्रकरण आणि वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या निष्क्रिय धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला खेळ थांबवून NEET पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, इंधन व गॅस दरवाढ तातडीने कमी करावी तसेच बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्या आंदोलनातून करण्यात आल्या.
या आंदोलनात पक्षाचे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष श्री. सुनील गव्हाणे, प्रदेश उपाध्यक्ष सचिन नारकर, प्रदेश सरचिटणीस नताशा आव्हाड, रामेश्वर पवार, शहाबाज पटेल, हारुण खान, समाधान म्हात्रे, योगेश पदरे, कुंदन काळे व किरण शिखरे यांच्यासह इतरही पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.




MR

वारकऱ्यांचा संस्कार रक्तात, द्वेष पेरू देणार नाही,
आधुनिक मंबाजींना माझा वारकरी संप्रदाय घेरू देणार नाही!
हल्लेखोर मोकाट आणि ज्यांच्यावर हल्ला झाला त्या विकास लवांडे ह्यांनाच अटक... निषेध ! निषेध निषेध !
#WeSupportVikasLawande

MR
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar retweetledi

पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी..
माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय ? असा माझा सवाल आहे ? पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन , वकील ,दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे.
आता मला पुण्यातून पोलीस #वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत.
#pune #police

MR

स्व. राजीव गांधी यांनी माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देत भारताच्या परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू केला. प्रशासनातील आधुनिकीकरण, पंचायतराज बळकटीकरण आणि युवा सक्षमीकरणाच्या उपक्रमांमधून त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व दिले. माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन.

MR


















