Sabitlenmiş Tweet
प्रदिप शिंदे
654 posts

प्रदिप शिंदे
@pradeep1003
मराठा 🚩 अभिमान आहे मी मराठी असल्याचा
pimpri chinchwad Katılım Aralık 2010
87 Takip Edilen30 Takipçiler
प्रदिप शिंदे retweetledi

सस्नेह जय महाराष्ट्र,
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का ? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणवर खर्च होते. आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत.
बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण ? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का ? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?
सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे ९० ते १०० डॉलर्स प्रति बॅरल असा आहे. हा भाव जगाने या आधी कधी पाहिला नाही असं नाही.
२००८ ला पुढे २०११-२०१२ मध्ये अरब स्प्रिंगच्या वेळेस, २०१३-२०१४ च्या काळात ( जेंव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किंमती आणि देशाची इभ्रत यावर तावातावाने बोलत होते तो काळ ), पुढे अशीच परिस्थिती २०२२ आणि २०२३ च्या दरम्यान जेंव्हा ओपेकने खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा देखील बॅरलचा भाव ९० ते १०० डॉलर्सच्या दरम्यान गेला होता. या घटनांपैकी ३ ते ४ वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते. मनमोहन सिंगांनी असं आवाहन केलं नाही की तेंव्हा मोदींनी केलं नाही. मग आत्ताच का ? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्याराज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलं आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत. बरं जेंव्हा बॅरलचा भाव ६० ते ६५ डॉलर्सच्या आसपास होता तेंव्हा पण तुम्ही चढ्या भावाने आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले जे काही लाख कोटी रुपये असतील ते कुठे गेले ? त्याचं काय झालं ?
ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली त्याच रेवड्या मग २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो की त्यानंतरच्या बिहार, पश्चिम बंगाल निवडणूका असोत की इतर कुठल्याही निवडणुका 'रेवड्या' वाटूनच निवडणुका जिंकल्यात. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली. महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपाने पुन्हा काढून घ्यायचे. देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था जर नाजूक झाली आहे तर या रेवड्या वाटू नका असं पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का ?
पेट्रोल, डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात. ठीक आहे. मग हे आत्ताच का सुचलं ? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेलं तेंव्हा का नाही सुचलं ? या राज्यांमध्ये जो अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं तेंव्हा का नाही सुचलं ? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं पंतप्रधान म्हणतात. पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आत्ता परवडत आहे ? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात आपली कंपनी आपल्याला कामावर ठेवेल का याची खात्री नाही. विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जावंस वाटतं कारण गेल्या १० ते ११ वर्षांत आपण शिक्षणात फार मूलभूत गुंतवणूक पण केली नाही भारतात रहावं असं वाटावं असं वातावरण पण निर्माण केलं नाही. शिक्षणात फक्त हिंदी कशी लादता येईल याकडे सगळं लक्ष लागलेलं.
गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत. एक अंदाज असा आहे जवळपास दीड लाख करोड रुपये गेल्या तीन महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेत. भारतात विदेशी गुंतवणूक होत नाहीये. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात, त्यासाठी थंड हवेच्या देशांत जातात. बरं तिथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे मग त्यासाठी स्वित्झर्लंडला काय जायचं? स्वतः पंतप्रधान आता १५ मे पासून ५ देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत, हे दौरे तुम्ही थांबवा. आणि मग लोकांना आवाहन करा.
MR

@keshavupadhye तुमच्या सारखे कार्यकर्ते हीच भाजप ची खरी ताकद आहे, त्यामुळेच भाजप सत्तेत आहे, विरोधी पक्षात ह्याच गोष्टीची कमी आहे, तुम्हाला ही एक दिवस नक्की न्याय मिळेल, पण कुणावर ही खोटी टीका करणे टाळा
MR

की घेतले न हे व्रत अंधतेने…”
२५-३० वर्षांपूर्वी विचारधारेचे काम सुरू करताना कुठे, काय, कोण, कधी होणार याचा कधीही विचार केला नव्हता. प्रखर राष्ट्रवादाची भावना आणि सकारात्मक काम करण्याची जिद्द, यातूनच या प्रवासाला सुरुवात झाली… आणि पाहता पाहता २५-३० वर्षे कधी निघून गेली ते कळलेच नाही.
ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत राहिलो… अनेक प्रसंग आले आणि मग अशा वेळी अटल बिहारी वाजपेयी नेहमी ज्यांची कविता सांगायचे त्या शिवमंगल सिंह सुमन यांच्या ओळी कायम प्रेरणा देत राहिल्या…
“संघर्ष पथ पर जो मिले, यह भी सही… वह भी सही…”
हीच एका खऱ्या कार्यकर्त्याची भूमिका असते… आणि तीच भूमिका आजही कायम आहे.
परवा सायंकाळी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाले. हे सर्व सहकारीच आहेत. त्यामुळे मनापासून आनंद झाला. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार तसेच संजय भेन्डे आणि विवेक कोल्हे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
बाकी… मला ट्रोल करण्यात, ‘सतरंजी उचले’ म्हणण्यात ज्यांना आनंद मिळतो, तो त्यांनी जरूर घ्यावा. त्यांनाही मनापासून शुभेच्छा!
@Dev_Fadnavis
@RaviDadaChavan
#विधानपरिषद #महाराष्ट्र #भाजपा #विचारधारा

MR

@sanjaynirupam @PratapSarnaik निरूपम जी, एवढ सगळ लिहिण्यापेक्षा २००८ पासून जरी मराठी शिकला असता तर अशी पळून जायची वेळ आली नसती,
सरनाईक साहेबांचा निर्णय योग्य आहे,
तुम्ही उगीच वळवळ करू नका
MR

ऑटो-टैक्सी चालकों से कामचलाऊ मराठी भाषा में
संवाद करने की अपेक्षा करिए मगर भाषा की सख्ती मत लादिए।
इससे उनकी रोज़ी-रोटी पर संकट आ जाएगा।
कृपया अपने फ़ैसले पर पुनर्विचार करें।
परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक को लिखा मेरा पत्र।
@PratapSarnaik

हिन्दी

@dr_prashantsb व्हेज मराठा
असा प्रकार कुठल्याही मराठ्याच्या घरात कधीच बनला नाही,
MR

काही अत्यंत भंपक ओव्हरेटेड आयटेम
१) चिकन खिमा.
२) व्हेज बिर्याणी.
३) व्हेज कोल्हापुरी.
४) फिश मिन्सड कबाब.
५) पनीर बटर मसाला.
६) बटर चिकन.
७) पंजाबी बैंगन भरता.
८) फिश बिर्याणी.
९) शेव टमाटर भाजी.
१०) व्हेज जलफरीजी.
या काही डिशेस आहेत ज्या खायला अतिशय भंपक, सपक असतात असा माझा अनुभव आहे. आपला अनुभव शेअर करा किंवा या यादीला वाढवत तुम्हाला भंपक किंवा सपक वाटणारे पदार्थ ऍड करा...
MR

@gajabhauX गजा भाऊ, जेव्हा महाराजांचा पुतळा पडला तेव्हा विरोधी पक्ष दिसला नाही तर आता कुठून दिसणार.
महाराष्ट्रात विरोधी पक्ष झोपी गेलेत तर आता २०२९ लाच जागे होणार आणि पराभूत होणार
MR

हजार दाभोळकरांनी जेवढं प्रबोधन केलं नसतं, तेवढं एकट्या अशोक खरात यांनी एका आठवड्यात करून दाखवलं.
स्वतःला कट्टर हिंदू आणि सनातनी म्हणवणारे सगळेच गायब झालेत.
पण विरोधी पक्षही कुठेच दिसत नाही
काँग्रेसलाही ठोस भूमिका घेता आलेली नाही.
आणि महत्त्वाचं म्हणजे, हेच प्रकरण जर भाजपाविरोधात असतं, तर खरातांचे पुतळे महाराष्ट्रभर जळताना दिसले असते
MR

@gajabhauX आता शिवसेना उबाठा हा पक्ष म्हणून अस्तित्व गमावून बसला आहे, आदित्य ठाकरे हे पक्ष पुन्हा उभा करू शकत नाही, त्यांची कष्ट करण्याची तयारीही दिसत नाही, महाराष्ट्रात आता रोहित पाटील वगळता आश्वासक युवा नेतृत्व नाही.
महाराष्ट्र आता अधोगतीच्या वाटेवर स्वार झाला आहे
MR

महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा आणि दशा हे बाहेरचे उपरे ठरवणार आहेत का?
शिवसेना पक्षप्रमुख पदाची एक वेगळीच मर्यादा आणि परंपरा आहे. मराठी माणसाचा पक्ष म्हणून राहावा आणि टिकावा म्हणून प्रयत्न करत असतात.
प्रियांका चतुर्वेदी यांचा ग्रामीण महाराष्ट्र काही संबंध नाही पण असे लोक खासदार झाले.
कोण कुठल्या Priyanka Chaturvedi येऊन मातोश्रीवरील खासदारांच्या बैठकीत उघडपणे उन्मत्तपणे वागतात Uddhav Thackeray यांच्यावर टीका करतात, आणि Sanjay Raut यांच्या विरोधात आक्रमक शेलक्या शब्दात टीका करतात. हे आजवर कधीही पाहायला मिळाले नव्हते.
नको त्या लोकांना स्वार्थासाठी मोठे केल्याचा हा परिणाम आज स्पष्ट दिसतो आहे. जर आज बाळासाहेब असते, तर अशा बेफाम वागणुकीला क्षणात आळा बसला असता.
मला वाटते उद्धव ठाकरे स्ट्रॉंग भूमिका घेऊन यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत का ?
आदित्य ठाकरेंनी पण कणखर भूमिका घेणे गरजेचे आहे
@OfficeofUT @AUThackeray
MR

@TheAnilkumarG94 @amolmitkari22 जी यांच्यावर आजपर्यंत बरीच टीका झाली पण ते अजितदादांचे खरे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी ते सिद्ध केलंय, निलम ताई ह्या फक्त पुढारी आहेत, त्यांनी पुण्यात शिवसेना शून्यावर आणली, असे १०० कार्यकर्ते असण्यापेक्षा १ अमोल मिटकरींसारखा कार्यकर्ता असावा
MR

पहिल्या फोटोत Amol Mitkari हे Ajit Pawar यांनी आमदार केल्यामुळे त्यांचा फोटो हातात घेऊन कृतज्ञता व्यक्त करताना दिसतात. पाच वर्षे आमदारकीची संधी दिल्याबद्दल ते आभार मानत आहेत...!
तर दुसऱ्या फोटोत Neelam Gorhe ज्यांना Uddhav Thackeray यांनी सलग २४ वर्ष आमदारकीची संधी दिली त्या आज त्यांच्यावरच टीका करताना दिसतात. 🤷♂️
इतिहास नेहमीच कर्तृत्व, निष्ठा आणि कृतज्ञतेची नोंद ठेवतो.
@amolmitkari22

MR

@nalawade23 @theWolvosaga दादा, महेश शिंदे हे मूळचे भाजप चेच आहेत, फक्त आमदारकी साठी शिवसेनेत आलेत.
त्यांचे सर्व जवळचे कार्यकर्ते भाजप च्याच कार्यकारणीत आहेत
MR

@theWolvosaga Shamburaje + Makrand + Shashikant shinde + Mahesh Shinde
Lok sabha fix padnar BJP chi 100%
English

@ChakankarSpeaks ताई तुम्हीच अशोक खरात च्या विरोधात लिखाण केलं म्हणून अ नगर च्या स्थानिक संपादकांकडून माफीपत्र लिहून घेतलं होत, त्या वेळेस जर तुम्ही चौकशी चे पत्र दिले असते तर तुमच्या गुरुवर्य व्यक्ती कडून छळ झालेल्या भगिनींना आधीच न्याय मिळाला असता,
@Dev_Fadnavis साहेब यांचा राजीनामा घ्या आधी
MR

आज मुंबई येथे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले.या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपीवर कारवाई होण्याकरता आपल्या स्तरावरून निर्देश देण्याबाबत सांगितले.
@Maha_MahilaAyog
@DGPMaharashtra


MR

नववर्षाचे प्रतीक असलेला ‘गुढी पाडवा’ हा पवित्र सण आपल्या सर्वांच्या जीवनात नवीन आशा, सकारात्मक विचार आणि नवचैतन्य निर्माण करो. भगवान श्री गणेशांच्या चरणी प्रार्थना आहे की, या शुभ प्रसंगी सुरू होणारे हिंदू नववर्ष आपल्या सर्व भारतवासीयांच्या जीवनात सुख, समृद्धी, यश आणि उज्ज्वल भविष्य घेऊन येवो.
या मंगलमय प्रसंगी आपण सर्वांना माझ्या अनंत शुभेच्छा.

MR

महाराष्ट्र नव निर्माण सेनेला २० व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@mnsadhikrut
@RajThackeray

MR

@solpurya123 मी गेलेल्या सर्व ठिकाणांपैकी जुन्नर (पुणे नाही)मधील माणसं मला जास्त प्रेमळ व मायाळू वाटली,
MR

@gajabhauX महाराष्ट्रात विरोधी पक्ष आहे ह्यावर आता जनतेचा ही विश्वास नाही.
महाविकास आघाडी ही निवडणूक नसताना झोपलेली असते, निवडणूक आली की अचानक जागे होतात व भाजप च्या नावाने बोंब मारत सुटतात पण भाजप सारखे निवडणूक नसतानाही लोकांशी कनेक्ट ठेवत नाहीत.
MR

महाविकास आघाडी लोकसभेच्या वेळेला एक नंबरचा पक्ष होता
विधानसभेला जेव्हा भारतीय जनता पार्टी मतदाना वाढवत होती त्यावेळेला हे झोपलेले होते
विधानसभेच्या निकालाच्या अगोदरच्या दिवशी हे जिंकले म्हणून, यांची चर्चा की कोण कुठला मंत्रिपद वाटून घेणार यावर चर्चा चालू होती
आणि इकडे पूर्ण निकाल भाजपने बदलून टाकला.
अजून पण यांचे 32 खासदार आहेत पण यांची लढण्याची मानसिकता शून्य आहे
२०२१-२२ जेव्हा सत्ता बदलली तेव्हा एक राज्यसभा जागा कारणीभुत होती
असेल हरी तर देईल खाटल्यावरी
या तत्त्वावर महाविकास आघाडीची पुढची वाटचाल चालू आहे
संघर्ष करा
रोडवर उत्तरा
तलवारीला तलवार जोडण्याची भाषा करा
एक ही प्रश्न घेऊन तुम्ही लढत नाही आहात
MR

#मराठीभाषागौरवदिन
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥ #मराठीभाषागौरवदिन
#MarathiBhashaGauravDin
#मराठीभाषा
#मराठीअभिमान

MR












