
दारव्हा ते कारंजा महामार्गावरील टोल नाका आणि रस्त्याच्या कामासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल भवन, यवतमाळ येथे आढावा बैठक घेतली.
बैठकीत मिळालेल्या माहितीनुसार महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असून तसेच पूर्ण झालेल्या कामातही काही त्रुटी आढळल्या.
यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत व आवश्यक सुविधा उपलब्ध होईपर्यंत टोल वसुली तात्काळ बंद करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि टोल कंपनीला देण्यात आले.
यावेळी आमदार राजू तोडसाम, आमदार किसन वानखेडे, जिल्हाधिकारी विकास मीना तसेच संबंधित अधिकारी व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
#darwha #toll #guardianminister




MR






















































