हे आहे मनसे चे हिंदूत्व.
नवी मुंबई मधील तळोजा मध्ये काही मुस्लिम समाजातील परप्रांतीय समाजकंटकांनी सोसायटी मध्ये लायटिंग लावण्यास जोरदार विरोध करत हिंदू महिलेला शिवीगाळ केली. ह्याची माहिती मिळताच मनसे चे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, तालुका अध्यक्ष रामदास पाटील ह्यांनी सोसायटी मध्ये नागरिकांची भेट घेत जोरात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले.
सबंधित घटनेचा स्थानिक पोलिसांकडे पाठपुरावा करत आरोपीला अटक केली आहे. तरी कोणतीही अडचण आल्यास मनसे खंबीर असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. #hindusanttargeted#HinduFestival#MNS #हिंदुराष्ट्र
दीपोत्सव २०२४ उद्घाटन सोहळा..
आज २८ ऑक्टोबर, सोमवार संध्याकाळी ५:३० वाजता स्थळः शिवाजीपार्क
प्रमुख उपस्थितिः राजसाहेब ठाकरे
अजय देवगण, रोहित शेट्टी, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ.
ह्यांच्या शुभहस्ते !
"राजू पाटील राजसाहेबांना सोडून जाणार"
गेली ५ वर्षे अशी दिवास्वप्नं पाहणाऱ्यांच्या स्वप्नांची राख झाली आहे
आज राजसाहेबांनी राजू पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आणि राजू पाटील यांच्या एकनिष्ठतेला पोचपावती म्हणून राजसाहेब स्वतः उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार!
कालच्या साहेबांच्या भाषणानंतर बऱ्यापैकी शंका कुशंकांचं मळभ दूर झालं असावं. खरंतर साहेबांनी आपल्या भाषणात सांगितल्याप्रमाणे अंदाज बांधणाऱ्या लोकांनी कल्पनांचे इमले इतके भयानक आणि अतर्क्य बांधले होते की विचारता सोय नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून पक्षाची धुरा वाहताना भूमिका मांडणं हे सोशल मीडियावर कुणाच्या तरी wall वर जाऊन आपली मतं मांडण्याइतकं (टर उडवण्याइतकं) सोप्पं नसतं. भूमिका ठरायला वेळ लागतो, विचारविनिमय करावा लागतो, भविष्यातील वाटचालींचा अंदाज घ्यावा लागतो.
महाराष्ट्रातील एकूण राजकीय परिस्थितीबद्दल अत्यंत स्पष्ट शब्दांत सन्माननीय राजसाहेबांच्या शैलीत खरपूस समाचार घेतला गेला आहेच. परंतु आगामी निवडणुका ह्या अखंड हिंदुस्थानच्या भविष्याची वाट ठरवणाऱ्या निवडणुका आहेत. विशेषतः आपला देश विकसनशील ते विकसित अशा संक्रमण अवस्थेतून जात असताना देशात नेतृत्व बदल होणे परवडण्यासारखं नाहीय. (आणि समजा जरी धोका पत्करायचा म्हटला तरी पर्याय कोण आहे ?) ह्यांना पराभूत करून जिंकून कोणाला देणार आहोत? आमच्या आगरी भाषेत म्हण आहे ‘खायाची मोत, पुन मिशीला तेल’ अशी मोदींच्या विरोधकांची अवस्था. ह्यांच्या नेतृत्वात आपल्या देशाचं काय भलं होणार? शिवाय मोदींच्या कणखर निर्णयांनी देशाची प्रतिमा उजळली आहे, हे मी जेव्हा परदेशात गेलो होतो तेव्हा स्वतः अनुभवलं आहे. खिळखिळी अर्थव्यवस्था ते पहिल्या पाचात जाऊ शकणारी अर्थव्यवस्था, ३७० कलम रद्द करणे आणि माझ्या वैयक्तिक इच्छेतलं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे राम मंदिराचे निर्माण, देशातील डिजिटल क्रांती अशा अनेक गोष्टी विचारात घेतल्याच पाहिजेत. सन्माननीय राज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे वाईट आहे त्यावर कोरडे ओढाच, पण चांगलं आहे त्याचं कौतुक करण्याची सर्वच राजकारण्यांनी सवय घ्यायला हवी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताची आणि अस्मितेची बाजू उंचावणारा पक्ष आहेच पण सवाल जेव्हा देशाचा येतो तेव्हा प्राथमिकता हिंदुस्थानच असणार ना. शिवाय आम्हा सर्व मनसैनिकांच्या आवडत्या शैलीत बोट उंचावून साहेबांनी सांगितलंच आहे.....विधानसभेच्या तयारीला लागा. आणि शेवटचं पण महत्वाचं सांगतो. ‘उंची छलांग लगाने के लिये चिता भी दो कदम पीछे आता है |’
अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या चर्चा पडत होत्या त्याच चर्चा माझ्या कानावरही पडत होत्या. वाट्टेल त्या चर्चा, तर्क-वितर्क मांडले जात होते. मी त्या सर्व 'सूत्रांच्या माहिती'चा आनंद घेत होतो. कुणी काहीही म्हटलं तरी मी ठरवलं होतं कि, मी माझी भूमिका योग्यवेळी मांडेन. मग उगीच पाळत ठेवल्यासारखी माध्यमं का वागतात ? माझी भूमिका मी जाहीर करणारच ना, आणि करावीच लागेल. मी आडपडदा ठेवून, आत एक बाहेर एक असं करणारा नेता नाही. #मनसे_पाडवामेळावा #MNSGudhiPadwaRally
🔴 महत्त्वाची माहिती : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामुळे मुंबईत जमणाऱ्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून अधिसूचना जाहीर 📢
marathi.hindustantimes.com/maharashtra/mu…
सन्माननीय श्री. राजसाहेबांच्या सहकारी बांधवांनो आणि भगिनींनो,
आज दुपारी चार वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डोंबिवली शहरातर्फे नवचैतन्य बाईक रॅली आयोजित केली आहे. या रॅलीचं महत्त्व सांगण्याकरता हा प्रपंच..
परवा आपला गुढीपाडवा मेळावा शिवतीर्थावरती साजरा होणार आहे. "नक्की काय घडलंय आणि नक्की काय घडतंय" याबाबत आपल्याशी प्रत्यक्ष बोलण्याकरिता सन्माननीय श्री. राजसाहेबांनी आपणांस निमंत्रण दिलेलंच आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आगामी काळातील धोरण आणि वाटचाल याबाबत सन्माननीय श्री. राजसाहेब सांगतीलच. परंतू, आत्तापर्यंतच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पडत्या काळातही आपण ज्या दृढतेने सन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिलात ती ताकद आणि एकजूट, आज शक्तीप्रदर्शनाच्या रूपाने, अस्तित्वात असलेल्या सर्व राजकीय पक्षांना दाखविण्याची वेळ आली आहे.
आगामी काळात आपण निवडणुका लढू अथवा नाही, कोणासोबत लढू अथवा एकटे लढू, याबाबतचा निर्णय सन्माननीय साहेब घेतीलच. परंतू, सन्माननीय श्री. राजसाहेबांच्या पाठीशी असलेली आपल्या एकजुटीची वज्रमूठ ही कायमस्वरूपी राहणे आवश्यक आहे.
आज या एकजूटीचं शक्तीप्रदर्शन करून, समोरील सर्व राजकीय पक्षांना, आपण आपल्या वज्रमूठीची ताकद दाखवणं गरजेचं आहे. जेणेकरून, यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गृहीत धरण्याचा कोणी विचारही करू शकणार नाही.
चला.. महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहरातर्फे आयोजित नवचैतन्य बाईक रॅलीत सामील होऊया.
*स्थळ* - आर के बाजार समोर,सर्वोदय लीला, ९० फीट रोड, डोंबिवली (पूर्व.)
*वेळ* - सायं. ठीक ४ वाजल्यापासून.
आपलाच सहकारी,
राहुल सुनिल कामत,
शहराध्यक्ष.
#मनसे
आज ९ मार्च महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिनाचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे डोंबिवली शहराच्या वतीने यंदाही सत्यनारायणाच्या पूजेचा आयोजन करण्यात आले होते. सोबतच भव्य दिव्य असा चलचित्र देखावा उभारण्यात आला होता. या कार्यक्रमास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, सन्माननीय राज साहेबांचे सहकारी आणि महिला भगिनी उपस्थित होते. डोंबिवली करांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घेत देखाव्याचा आनंद घेतला.
#मनसे_डोंबिवली
#वर्धापन_दिन
नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त मा. राज साहेबांनी सर्व सहकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. सोशल माध्यमांचे महत्त्व सहकाऱ्यांना समजावत, पक्षाने केलेल्या यशस्वी आंदोलनांची आठवण करून दिली. तसेच सर्व महाराष्ट्र सैनिकांना असा आत्मविश्वास दिला की, संयम ठेवा मी यश नक्की खेचून आणेन.
#मनसे_वर्धापनदिन #RajThackeray#RajuPatil#VardhapanDin
"मला दुसऱ्यांची पोरं कडेवर घेऊन फिरायची नाहीत. माझ्या पक्षातील निष्ठावंत सहकाऱ्यांना मोठं करायचं आहे. निवडून येणाऱ्या माणसांची मोळी बांधायची नाही !" ; पक्षांतरं, फोडाफोडी, उमेदवारांच्या पळवापळवीवर राजसाहेबांची मिश्किल टिपण्णी. #मनसे_वर्धापनदिन
महाराष्ट्रात विविध ठिकाणी फिरतोय... राजकारणाचा इतका विचका झाला आहे की, माय-माता समोर येतात, मायेने डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात "बाबा रे, विश्वास आता तुझ्यावरच आहे."
हा विश्वास टिकवायला हवा ! 🙏
माझ्या पक्षात जातीयवाद चालणार नाही. हा खालच्या जातीचा, तो वरच्या जातीचा हे कुणी ठरवलं ? मग आपण शिवछत्रपतींचं नाव का घेतो... ज्यांनी अठरापगड जातींना एकत्र आणून रयतेचं राज्य उभं केलं. सर्व जातीभेद गाडा, आणि महाराष्ट्रासाठी एकदिलाने काम करा.
#मनसे_वर्धापनदिन