
काटोल येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ‘संगठन सृजन अभियान’ अंतर्गत बैठक आयोजित करण्यात आली होती.
श्री. राव दान सिंगजी (AICC निरीक्षक, संघठन सुजन अभियान), श्री. शिवारावजी पोलशेट्टी (प्रदेश निरीक्षक)
श्री. अश्विन बैस (अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली काटोल व नरखेड तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
या बैठकीदरम्यान काँग्रेस पक्षाची विचारधारा प्रभावीपणे प्रत्येकापर्यंत पोहोचविणे, नव्या सदस्यांची नोंदणी आणि पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. संगठन सृजन अभियानाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष अधिक सक्षम, संघटित आणि जनतेशी जोडलेला राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी काँग्रेस कमिटीचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
MR







