हळूहळू अडानी महाराष्ट्र गिळून टाकतोय. मराठीत एक जुनी म्हण आहे, अडाण्याचं जेवण अन ताटाचा सत्यानाश! आणखी एक म्हण आहे, “आला अडाण्याचा गाडा, वाटेवरल्या वेशी मोडा”.
अडाण्याला गाडा चालवायचा अनुभव नसतो. त्याला गाडा दिला की वाटेत जे येईल ते उध्वस्त होत जातं. मग ती चाळ असो किंवा जंगल.
माधवराव गाडगीळ यांनी एका चिनी ग्रंथातल्या अनुवाद केलेल्या ओळी.
सत्ताधीशा याचि मार्गे तु जावे । जनांना न काही कधी जाणु द्यावे ।। सुजाण प्रजा पार उधळे नि बाधे । अजाण प्रजा हाकणे काम साधे ।। म्हणोनी सदा वास्तवा छपवावे । खोटेपणाने नटावे, थटावे ।।
काल पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेने लेखनासाठी “जयवंत दळवी पुरस्कार” दिला. त्यांच्या “ठणठणपाळ” या जबरदस्त लोकप्रिय सदराच्या प्रभावातून मी दैनिक लोकमतला “मिरचीच्या खळ्यावर” हे माझं पहिलं सदर लिहायला सुरुवात केली होती. मनापासून आभार!
भाऊ वेगळे झाले की शेताचा बांध तुटतो .
भाऊ एक झाले की अश्रूंचा बांध फुटतो.
भाऊ एक झाले की शहराला बळ येतं . गावाला तर येणारच. एक व्हायचं.
गावात दोन भाऊ एकत्र आले की सावकाराच्या तुकड्यांवर जगणारे दोनचार सोडले तर प्रत्येकाला आनंद होतो. एकत्र येऊन बघा.
काल वडिलांचा ७५ वा वाढदिवस. अण्णांच्या पंचाहत्तरी निमित्त पाडळशिंगीला शेतात ७५ झाडं लावली. हाच शुभमुहुर्त म्हणून बीडला रामगडावर नविन सह्याद्री देवराईचं उद्घाटन केलं आणि ७५ दुर्मिळ झाडं लावली. सह्याद्री देवराईकडून रामगडला येत्या दोन महिन्यात पाच हजार नविन झाडं लावणार आहोत.