ब्रेकिंग
ईरान ने 2 भारतीय जहाजाना होर्मुज मधून जाण्याची परवानगी दिली
याच श्रेय कोणाला?
न मोदी
न जयशंकर
इराणी प्रतिनिधी नुसार याच श्रेय भारतीय जनतेला, ज्यांनी युद्ध, लहान मुलांवर बमबारी च्या विरोधात आवाज उचलला
इराण ने सहानुभूती दाखवली
भारतीय जनता🇮🇳🔥
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षानं कसं रहायला हवं.. एकदम गुर्मीत, एकदम माजात. आम्ही म्हणू तेच खरं, आमच्यापेक्षा तुम्हाला कळतंय काय.. काय सल्ला द्यायचा असेल तर पैसा पण तुम्हीच द्यायचा.. प्रदेशाध्यक्ष असूनही या माणसाला जातप्रश्न कळतो, जात आणि वर्ग जाणीवा नेणीवा दोन्हींची ठळक ओळख आहे. हे असं कसं.. असा गंमतीदार प्रश्न माझ्या मनात उभा राहीला होता. कारण या गोष्टी आधीच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये कधीच सापडल्या नव्हत्या. आणि या अश्या कारणांमुळेच तर टिळक भवनात गर्दीची वानवा असायची..
त्या दिवशी निघताना ते मला इतकंच म्हणाले होते की..
कश्याला कुणाला फोन करत वाट बघत बसायची. माझा नंबर आहे तुमच्याकडे वैभव. एक फोन करा. वेळ घ्या. मी नाहीच घेतला फोन तर मेसेज करा. मी जसा पाहीन तसा रिप्लाय तर देईनच ना. काय आहे.. की, मला खूप काही बदल करून आणायचाय. अगदी मुळापासून बदल करताना प्रिंसीपल्स फॉलो करणारं संघटन आधी तयार करून मजबूत करायचंय..
त्यानंतर निरोप घेऊन आम्ही निघालो. ते आपले रस्त्यावरच्या बाजारातून तुरूतूरू वाट काढत पुन्ह गांधी भवनला पायीच निघाले होते.
आज हे लिहायचं कारण म्हणजे.. पुणे शहरातला एक फ्लेक्सचा फोटो पाठवला मित्रानं. त्यावर लिहीलं होतं.. की सपकाळ सोबत फिरतो म्हणून तू सज्जन होत नाहीस. टिका करणाऱ्यालाही सपकाळांच्या कॅरेक्टरचा दाखला द्यावा लागला आहे. त्यावरून हे लिहावंसं वाटलं.
हर्षवर्धन सपकाळ आहेत म्हणून काँग्रेस आणि वंचित युती होऊ शकली. राज्यात ठिकठिकाणी काँग्रेस वंचित युतीला अपेक्षित फायदा मिळाला. नव्या राजकारणाची सुरूवात झाली. बाळासाहेब आंबेडकर नीडर आहेत. आणि हर्षवर्धन सपकाळ बिल्कूल मॅनेज न होणारा माणूस.
या दोघांनी मिळून थेट नागपूरच्या संघ मुख्यालयावरच घाव घालण्याचा विडा उचललाय. ते दोघंही १०० टक्के घाव घालतीलच विषारी मुळांवर. त्यासाठी सहभाग, सहयोग आणि खूप साऱ्या शुभेच्छा.
(2/2)
हे वाचायला सुरू करण्यापूर्वी माझं एक Honest Confession.. मला कधीच वाटलं नव्हतं की कधी कोणत्या काँग्रेसच्या नेत्याबाबत असं लिहीता येईल किंवा तशी संधी मिळेल.
महाराष्ट्रातल्या दोन्ही काँग्रेस... भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष राजकीय पक्ष कमी आणि फेडरेशन जास्त आहेत. फेडरेशन ऑफ फ्यू फ्युडल फॅमिलीज. काही ठराविक कुटूंबानी मिळून हे दोन्ही पक्ष चालवत ठेवले आहेत. कॉर्पोरेट मध्ये जसं डिस्ट्रीक्ट हेड नेमून दिलेले असतात अगदी तसं. प्रत्येकाने आपापले जिल्हे वाटून घेतलेले आहेत. पक्षाची राज्यातली सत्ता जातेय किंवा केंद्रातली जातेय यापेक्षा माझ्या राज्यातली सत्ता शाबूत आहे ना याकडे लक्ष देणाऱ्या सरंजामी कुटूंबानी भरलेले हे दोन्ही पक्ष. महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांची सत्ता पूर्णतः सरदार मराठ्यांच्या हातात एकवटलेली आहे. आपण भलं, आपलं खानदान भलं आणि आपल्या खानदानाला कायम आबाद करणारे धंदे भले. त्यापलीकडे ना कधी मजल गेली ना कधी सर्वसमावेशक राजकारण करण्याची कुवत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटीसोबत काही काळ काम केलं होतं. तसंच राष्ट्रवादी काँग्रेससोबतही काम केलं होतं. पण, दोन्ही कडे दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं वर्तन अजूनही फ्यूडल मानसिकतेचंच आहे हे सातत्याने अनुभवाला येत होतं. दरबारी राजकारण असतं ना अगदी तसंच. याला ठाकरे कुटूंब देखील अपवाद नाही. आणि ठाकरेंना शिव्या देत सत्तेवर बसलेलं शिंदे कुटूंब आणि त्यांच्यासोबतचे ४० नवे कुटूंब. सगळं काही कपडे बदलून इथून तिथून मिथून...
२०२४ च्या निवडणूकांनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटीने हर्षवर्धन सपकाळांना प्रदेशाध्यक्ष केलं. त्यांचा सुरूवातीचा काळ खडतर राहीला. मिडीयाने त्यांना म्हणावं तसं कधीच स्पेस देण्याचा मोठेपणा दाखवला नाही. पण, सपकाळ सातत्याने भेटत राहीले.. कधी आझाद मैदानाच्या आंदोलनात तर कधी रस्त्यांवरच्या आंदोनात. माझी त्यांच्यासोबतची पहिली भेट टिळक भवनातच झाली. त्यांना समष्टीच्या कार्य़क्रमाला येण्याचं निमंत्रण दिलं. आणि ते चक्क आले देखील. कडकडून गळाभेट दिली आम्हा सर्व सहकाऱ्यांना. बराच वेळ बोलले ते स्टेजवर. सगळ्यांना आवाहन केलं की या माझ्यासोबत. पण ती वेळ आणि जागा सार्वजनिक होती. सार्वजनिक ठिकाणी नेता जे काही वागतो ते कधीच खरं नसतं. हा नियम मला चांगला माहीत आहे. तरी नंतर सपकाळ साहेब कधी मराठी भाषेच्या सक्तीविरोधातल्या आंदोनात भेटले तर कधी बीएमसी निवडणूकांच्या अनुषंगाने आयोजित कार्य़क्रमात भेटले.
पण, तरीही त्यांची प्रत्यक्ष ऑन द टेबल भेट होणं शक्य झालं नव्हतं. मी तशी भेट होण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण, ती भेट होऊ शकली नाही. असो तो भाग वेगळा. नंतर बऱ्याच दिवसांनी सपकाळ सरांबरोबर बोलणं झालं. आम्ही गांधी भवनला भेटलो. एकटेच होते तिथे ते. मी पोहोचलो तेव्हा ते आधीच एका बैठकीत होते. ती बैठक बराच काळ चालली. ती बैठक आटोपल्यानंतर ते स्वतः बैठकीतल्या पाहुण्यांना दरवाज्यापर्यंत सोडायला बाहेर आले.. आणि आम्हाला त्यांनी स्वतः रिसीव करून आत नेलं बसवलं. कॉफी आणि पाण्याची विचारपूस केली.
पहायला गेलं तर हे खूप साधं आणि अपेक्षित वर्तन आहे. जे प्रत्येकाने करायलाच हवं. पण काँग्रेस प्रदेशाध्यक्षाकडून हे असं वागणं मला भयानक अनाकलनीय होतं. कारण मी असे प्रदेशाध्यक्ष पाहीलेत ज्यांना त्यांच्यासमोर आलेल्या माणसांनी बसलेलं सुद्धा पटत नव्हतं. त्यांना वेळ मागितलेली आवडत नव्हती. आणि बरंच काही त्यामुळे हे जरा डोईजड जात होतं.
नंतर आमची चर्चा दिड तास चालली. सपकाळांनी अनेक विषयांना हात घातला. भाजपा आणि आरएसएस च्या विरोधात लढायचं असेल तर आधी सांस्कृतिक आघाडी मजबूत केली पाहीजे त्यासाठी मला तरूणांची मदत पाहीजे वगैरे बोलले. पण ते बोलताना त्यांच्याकडे एक व्हिजन आहे याचीही चुणूक त्यांच्या बोलण्यातून येत होती.
या चर्चेत माझ्यासोबत असलेल्या पाचही जणांनी खूप तिखट आरोप केले. काँग्रेस अशी, काँग्रेस तशी पण एका क्षणासाठीही त्यांना अँगर मोड मध्ये पाहीलं नाही. उलट.. हो मला माहीत आहे, पण यावर मला सोल्यूशन द्या हेच सातत्याने ते सांगत राहीले. हे ही तितकंच अनाकलनीय होतं.
या चर्चेतच दुपार झाली. त्यांनी स्वतःहून आग्रहानं जेवायला नेलं. बिल भरताना प्रेमानं दरडावून स्वतःच बिल भरलं. मी मनातल्या मनात बोलत राहीलो.. अरे बाबा.. एक तरी साईन दाखवा काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असल्याचा. एकही साईन नाही. इतकं कसं सहजपणे हा माणूस बोलतोय.. सोबत आजूबाजूला बसतोय.. बरं हे सगळं होताना कोणते कॅमेरेही नाहीत.
(1/2)
Still no condemnation❗️
Except for the words “safety and security of Indian Nationals”,
the whole text is about “serious situation in the region”, “concern over escalation of tensions”, “need for unhindered transit of goods and energy”, “urged for dialogue and diplomacy”
Was this conversation for India by an INDEPENDENT Head of the State or by an ally of USA, to pass on the message❓Looks more like the later case.
🆘 President Trump called out for lying on Iran and having no clue about Iran war.
The Legislators of a truly functional democracy are truly independent and believe in briefing the Nation on blunders made by the Executive.
👏 Here are American Senators and Congressmen, releasing videos on X, after leaving the briefing by the President and the Secretary of State, to the Congress committee.
🆘 They are equivocal on one aspect - THERE BEING NO INTELLINGENCE ON IRAN ATTACKING USA.
▪️Senator Chris Van Hollen even called out President Trump for walking into Netanyahu’s trap and helping him fulfil his personal agenda of attacking Iran.
🔥To quote him, “..What we do know from Secretary Rubio is that Netanyahu decided to strike Iran. And here we are, doing what Prime Minister Netanyahu said he wanted to do for 40 years, which was to attack Iran. It’s just Netanyahu had not found a President stupid enough to drag the United States into that war before. And now Donald Trump has done it and they don’t have a clue, what the end game is.”
You would find the same scenes from UK, Spain and other Legilatures.
❓But did you see such scenes from Indian Parliamentarians except ofcourse from a handful of vocal and active Leaders from the Opposition like LOP Rahul Gandhi, LOP Mallikarjun Kharge ji, Mahua Moitra to name a few❓Aren’t we a Democracy too, touted as the largest one too❓Didn’t Indian Parliamentary Committee/a call for a briefing from Modi and his CoM/Cabinet❓Why did they not summon Modi, the Defence Minister, the NSA (hopefully he is awake) and ask them about siding with Iran, Operation Sindoor, Trade Deal with America and matters affecting India’s sovereignty❓
No❗️Why not❓Think, even though You are late❗️
राजदीप सरदेसाई ने जो कहा उसके लिए कलेजा चाहिए 🫡
उन्होंने कहा- “क्षमा कीजिए प्रधानमंत्री जी, अब आपकी यह ‘भाषणात्मक अतिशयोक्ति’ अपने चरम पर है.
लोकतंत्र में हमेशा प्रतीकवाद के रंगमंच रहे हैं. काली पट्टियां, भूख हड़तालें, मौन मार्च हों या नुक्कड़ नाटक. विरोध शायद ही कभी सुगढ़ या सौंदर्यपूर्ण होता है.