Namdev Katkar
5.7K posts

Namdev Katkar
@namdevwrites
Journalist, @BBCNewsMarathi, based at New Delhi. National Red Ink Awardee (2022). Heart belongs to Raigad, Maharashtra.

The Great Indian Illusion ! भ्रमाचे पडदे फाडून , देशातील बँकिंग उद्योग सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याच्या जिव्हाळ्याचा विषय कसा आहे हे लोक शिक्षण करणारी , फिल्म मेकर (आणि बरेच काही असणाऱ्या ) वरून सुखराज यांची नवीन डॉक्युमेंटरी फिल्म ! _______________________________ डॉक्युमेंटरीज बऱ्याच बनत असतात. पण शुद्ध राजकीय अर्थव्यवस्था, त्यात देखील बँकिंग सारख्या क्लिष्ट विषयाला, डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून भिडण्याचे धाडस फक्त वरुणच करू शकतो. जे त्याने केले आहे. The Great Indian Illusion या तब्बल ८८ मिनिटांच्या फिल्म मधून ( युट्यूब लिंक खाली दिली आहे). बँकिंग क्षेत्र कोणत्याही प्रगत, आधुनिक अर्थव्यवस्थेच्या हृदयाच्या स्थानी असते. त्यातून होऊ शकणाऱ्या किफायतशीर व्याज आणि खात्रीशीर पतपुरवठ्यावर देशातील बॉटम ऑफ पिरॅमिड मधील नागरिकांचे अर्थव्यवहार सुदृढ होऊ शकणार असतात. पण ……. __________________ स्वातंत्र्यानंतर, विशेषतः १९६९ मधील बँकांच्या राष्ट्रीयकरणानंतर, देशातील आपले हक्काचे बँकिंग क्षेत्र, आपले राहणीमान उंचावण्यासाठी काम करेल अशी वाजवी अपेक्षा देशातील कोट्यावधी जनतेने बाळगली होती. तो भ्रम होता हे गेल्या काही वर्षात पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे. वरुण त्या भ्रमनिरासाची गोष्ट त्याच्या फिल्म मधून आपल्याला सांगत आहे. स्वातंत्र्यापासूनच्या बँकिंग पासून सुरुवात करून फिल्म आजच्या काळापर्यंतचा वेगवान प्रवास आपल्याला घडवते. ग्रामीण आणि शहरी भागातील भौतिक दृष्ट्या वंचित असणारे समूह औपचारिक बँकिंग क्षेत्रापासून देखील वंचित आहेत हे दाखवते. देशातील बँकिंग क्षेत्र हळूहळू कसे मोठ्या कॉर्पोरेटच्या कह्यात गेले. किती मोठ्या कंपन्यांनी, मोठी कर्जे घेऊन ती कशी थकवली. आम्ही देशाच्या विकासासाठी कंपन्या चालवतो असा दावा करणारे भांडवलदार प्रवर्तक एका रात्रीत देश सोडून कसे पळाले हे ही फिल्म सांगते. _________________________ पण हा खरेच बँका आणि ते भ्रष्ट प्रवर्तक यांच्यातील निजी मामला होता का ? रिझर्व बँक काय करत होती ? काय करते ? असा वाजवी प्रश्न आपल्या मनात उपस्थित करत रिझर्व्ह बँकेच्या अनेक धोरणांची सामान्य नागरिकांना समजेल अशा पद्धतीने चिरफाड ही फिल्म करत जाते. सवलतीच्या व्याजदराने शेतीक्षेत्राला कर्जे द्यावी लागू नयेत म्हणून आता बँका डायरेक्ट शेतकऱ्यांना कर्जे न देता एनबीएफसी कंपन्यांना कर्जे देतात. मग या एनबीएफसी चढ्या / शोषक व्याजदराने ते पैसे शेतकऱ्यांना कर्जे म्हणून देतात. मुंबई आणि मोठ्या शहरातील कंपन्या आम्ही शेतीक्षेत्रासाठी वास्तुमाल / सेवा पुरवतो असे कागदोपत्री दाखवत प्रायोरिटी सेक्टर साठी राखून ठेवलेली कर्जे कशी हडप करतात…हे फिल्म सविस्तरपणे सांगते. ____________________ फिल्मच्या ओपनिंग वाक्यापासून वरुण स्वतः त्याच्या संयत आवाजात दर्शकांना हाताला धरून भारतीय बँकिंग क्षेत्राच्या खोल पाण्यात (खरेतर दलदलीत) फिरवून आणतो. बँकिंग क्षेत्राने एकत्रितपणे १२ लाख कोटी रुपयांचे कर्ज निर्लेखित (Write Off) केले आहे हे सांगत १२ लाख कोटी म्हणजे किती होतात हे प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहोचवतो. या १२ लाखात किती विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह आहार दिला जाऊ शकतो, किती घरे, किती रोजगार हमीचे दिवस, किती आरोग्य सेवा…आणि हे सारे कित्येक वर्षे दिले जाऊ शकले असते हे आकडेवारी घेऊन सांगतो. फक्त त्या तीन चार मिनिटांमध्ये बँकिंग क्षेत्रात जे काही गैर सुरू आहे त्याचा संबंध माझ्या वंचितावस्थेशी कसा आहे हे वरुण एवढ्या convincingly सांगतो की अगदी वित्त निरक्षर नागरिकाला देखील कळेल. _________________________ या फिल्ममध्ये पी साईनाथ, सुचेता दलाल, देवीदास तुळजापूरकर, प्रशांत भूषण, पृथ्वीराज चव्हाण या व अशा या क्षेत्रातील जाणकारांच्या मुलाखती आहेत. प्रसाद झावरे निर्माते आणि कुणाल कामरा सहनिर्माते यांनी या फिल्मची निर्मिती करून मोठे काम केले आहे. वरुणच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेले काम देखील वाखाणण्याजोगे आहे. देशातील बँकिंग उद्योगाच्या बॅलन्स शीटचे सतत वाढणारे आकार, त्यांच्या शेअर्सच्या सतत वाढणाऱ्या किमती ….आणि ….. आपल्या हक्काच्या बँकिंग क्षेत्राकडून भ्रमनिरास झालेल्या देशातील कोट्यावधी नागरिकांचा परस्परसंबंध काय आहे ..हे या फिल्मवरून कळून येईल. आणि जोपर्यंत हा विरोधाभास राहील तोपर्यंत या फिल्मची उपयुक्तता देखील राहील. वरुण आणि त्याची सारी टीम तरुण आहे. हे तरुण दिसतात , भेटतात म्हणून भविष्याबद्दल आशेची ज्योत तेवत राहते. वरुण आणि या फिल्मशी सबंधित सर्वांना खूप शुभेच्छा. सर्वांनी वेळ काढून ही फिल्म जरूर पाहावी संजीव चांदोरकर (२० मे २०२६) youtu.be/AKv7Tz3p_Bc?si…



I never thought I would have to write this, but I am not a foreign spy of any sort, sent out by any foreign government. My work is journalism, primarily in Norway now.

प्रोफेसर मोटेगावकर ही हव्यासाची काळी कुट्ट कहाणी आहे. लाखो मुलांच्या आयुष्याशी खेळणारा हा माणूस शिक्षणाचा बाजार करत होता. आणि पैसेवाल्यांच्या घरी यश देण्याची व्यवस्था लावत होता. त्याच्या हव्यासाची गोष्ट ही आहेच पण सोबतच त्याच्या सर्व लाभार्थ्यांच्या हव्यासाची पण ही गोष्ट आहे.



मी दिल्लीत राहतो. मार्च ते नोव्हेंबरपर्यंत एसीशिवाय इथं जगणं मुश्कील आहे. तरी सर्वाधिक तापमानाच्या या २५ ठिकाणांच्या यादीत दिल्ली नाहीय. याचा अर्थ, दिल्लीहून अधिक उष्णता या ठिकाणी आहे, म्हणजे किती भयंकर उष्णता असेल, याची कल्पना करवत नाही! बरं महाराष्ट्रातली ७ ठिकाणं आहेत यात.




The scuffle broke out at fuel station at Wasim, Akola in Maharashtra. Farmers are struggling to get the fuel for their tractors for tilling & farm related work. There is severe shortage of fuel. People have to wait for uncertain period to get the fuel at many fuel stations.

Significant political messaging will be read into what CM Vijay does tomorrow. If he attends the Kerala CM oath taking, it would signal an open embrace of the Congress and suggest he is looking to build a wider political ecosystem too. If he skips it, the message would be just as clear that Tamil Nadu, governance, state priorities and his own party’s independent political positioning and track record come first…..









