मनिष पाथरे

926 posts

मनिष पाथरे banner
मनिष पाथरे

मनिष पाथरे

@pathre_manish

मनसे जिल्हा संपर्क अध्यक्ष - दक्षिण रत्नागिरी | मनविसे- राज्य उपाध्यक्ष | हिंदू | मराठी | कोकणी | मुंबईकर

Mumbai, India Katılım Nisan 2020
148 Takip Edilen396 Takipçiler
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
#होळीच्या_शुभेच्छा
Raj Thackeray tweet media
QME
73
178
2.3K
64.8K
Vaibhav Parab - वैभव परब
आमदार रोहित पवारांच्या भेटीनंतर अजित पवार प्रकरणात राज ठाकरेंची एण्ट्री अजित पवार प्रकरणात FIR का नोंदवला गेला नाही? राज ठाकरेंचा सवाल सरकार या प्रकरणात गंभीर का नाही, आमदरांची दखल पोलीस घेत नाही तर सर्वसामान्यांचं काय ? राज ठाकरे @mnsadhikrut @RRPSpeaks
Vaibhav Parab - वैभव परब tweet media
MR
3
12
183
3.5K
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
काही दिवसांपूर्वी माझ्या लायब्ररीत एक पुस्तक शोधत असताना , अचानक 'सुख पाहता' या नाटकाचं एक जुनं पुस्तक सापडलं. वसंत कानेटकरांचं हे नाटक. आजच्या पिढीला कदाचित वसंत कानेटकर माहित नसतील, पण मराठीत ज्या लेखकांच्या नावावर नाटकांना हाऊसफुलचा बोर्ड लागायचा अशा लेखकांपैकी एक म्हणजे वसंत कानेटकर. तर हे पुसतक पाहताना पटकन मी भूतकाळात गेलो , कारण याचं मुखपृष्ठ मी केलं होतं ! घडलं असं की १९८९ साली, माझे सासरे, ज्येष्ठ नाट्यनिर्माते श्री. मोहन वाघ हे माझ्या घरी आले आणि म्हणाले की मी वसंत कानेटकरांचं 'सुख पाहता' नाटक करतोय. त्याचं पुस्तक काढावं अशी कानेटकरांची इच्छा आहे आणि त्यांची अजून एक इच्छा आहे की त्याचं मुखपृष्ठ तू करावं. मुळात मराठी रंगभूमीचा काय काळ होता की नाटक हा नाट्यानुभव पण त्याची पुस्तकं पण निघायची आणि लोकं ती आवडीने विकत घेऊन वाचायची. असो. मी तेव्हा सामना , मार्मिक, लोकसत्ता यांच्यासाठी व्यंगचित्रं करायचो. पण नाटकाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ हे माझ्यासाठी नवीन होतं. मी मोहन वाघांना म्हणलं की मी नाटक बघतो, आणि सांगतो. माझ्यासाठी एक आनंदाची बाब होती ती म्हणजे यशवंत दत्त ज्यांचा मी खूप मोठा फॅन होतो त्यांना प्रत्यक्ष रंगमंचावर बघणार होतो. नाटक शिवाजी मंदिरला होतं. नाटकांत यशवंत दत्त यांनी सहा पात्र उभी केली होती ती पाहून थक्क झालो. घरी आलो आणि मोहन वाघांना कळवलं की मी करतो मुखपृष्ठ. एका दिवसांत हे मुखपृष्ठ तयार झालं. ते मी मोहन वाघ आणि वसंत कानेटकरांना दाखवलं, ते दोघांना प्रचंड आवडलं. माझ्यासाठी हा तेंव्हा मिळालेला आशीर्वाद पण होता आणि मराठी नाट्यसृष्टीतील मानदंड मानल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेली एक पोचपावती पण होती. आज त्या इतिहासाला पुन्हा उजळणी मिळाली. म्हणलं तुम्हाला सगळ्यांना ही आठवण सांगावी आणि हे मुखपृष्ठ दाखवावं. मराठी रंगभूमीवर 'हाऊसफुल'चा बोर्ड कायम झळकत राहू दे आणि नाट्यानुभवसोबतच नाटकाचं पुस्तक घेऊन ते पण झपाटून वाचण्याचा काळ पुन्हा येऊ दे हीच सदिच्छा... राज ठाकरे ।
Raj Thackeray tweet mediaRaj Thackeray tweet media
MR
111
300
2.9K
91.9K
मनिष पाथरे
मनिष पाथरे@pathre_manish·
त्यांनी ठरवलं आहे मराठी साठी लढायचे..... आपण ठरवूया मराठी माणसांना जिंकावयाचे..... #मुंबई @RajThackeray @uddhavthackeray #महाराष्ट्र #मराठी #जरांगेपाटील #MNS
मनिष पाथरे tweet media
MR
0
0
0
22
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
प्रति, श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, सस्नेह जय महाराष्ट्र, एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३०% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही... लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते ? यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही ? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही ? आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का ? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही ! असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे. राज ठाकरे ।
MR
293
905
4.4K
190.2K
Sandeep Deshpande
Sandeep Deshpande@SandeepDadarMNS·
*योजना राबवायला सरकारकडे पैसे नाहीत ... पण योजनेच्या नावावर अधिकारी मात्र गब्बर... "पी.डब्ल्यू.डी" मध्ये "महा भ्रष्टाचार"... उद्या चित्रफितीसह पुरावे देणार... सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद... सार्वजनिक बांधकाम फक्त "खाते"...*
MR
7
67
459
9.3K
मनिष पाथरे
मनिष पाथरे@pathre_manish·
@mnsadhikrut सत्य आहे.... बिबट्या हल्ले अनेक वर्ष करत आला आहे पण सध्या एकाच वेळेला एवढ्या बातम्या दिसतात त्या नेमक्या कशासाठी? वनतारा मध्ये २० बिबटे पाठवणार सांगणारा वन मंत्री सेट आहे का? वनतारा नंतर झालं... सह्याद्री एवढ घनदाट होत की सूर्यप्रकाश सुद्धा आत पोहचत नव्हता.. मग आता अस का झाल
MR
0
0
0
109
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
बिबट्या लोकवस्तीत शिरण्याच्या घटना सध्या महाराष्ट्रात सर्वत्र ऐकू येत आहेत. त्याविषयी सामान्यांच्या मनात असलेला आक्रोश देखील वाजवी आहे. पण बेसुमार जंगलतोडीकडे आणि वन्यप्राण्यांच्या अधिवासाकडे केलं गेलेलं साफ दुर्लक्ष यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे हे देखील तितकंच खरं आहे. यावर २०१४ साली महाराष्ट्राचा विकास आराखडा सादर करताना, एक चित्रफीत सादर केली गेली होती, त्यात राजसाहेबांनी या परिस्थितीवर केलेलं भाष्य... #बिबट्या #महाराष्ट्र #राजसाहेबठाकरे #वन्यजीव_संरक्षण #जंगलतोड_थांबवा #पर्यावरण_वाचवा #MNSAdhikrut
MR
4
36
120
2.8K
Vaibhav Parab - वैभव परब
नितिश कुमारचं हे मुख्यमंत्री निवास आहे, मोठ्या विजयानंतर कालपासून या परिसरात सन्नाटा पसरला आहे. याचं कारण काय असेल? #बिहारमध्येमहाराष्ट्रपॅटर्न #मुख्यमंत्रीकोण? #नितिशकुमारपुन्हा #भाजपचामुख्यमंत्री
Vaibhav Parab - वैभव परब tweet mediaVaibhav Parab - वैभव परब tweet media
MR
2
0
0
100
Tejashwii Yadav
Tejashwii Yadav@TejashwiYdvRJD·
क्या आप सबको लगता है कि चुनाव निष्पक्ष हुआ है ? अपना जवाब जरूर दें...
हिन्दी
18.4K
3.6K
25.9K
1.7M
मनिष पाथरे
मनिष पाथरे@pathre_manish·
सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या मनःपुर्वक शुभेच्छा 💐 #कोजागिरी_पौर्णिमा #MNS
मनिष पाथरे tweet media
MR
0
0
0
76
मनिष पाथरे
मनिष पाथरे@pathre_manish·
@anilshidore आरे, येवूर, गोरेगाव, पालघर जव्हार, मोखाडा, रायगड पट्ट्यातील असंख्य जमिनी हे आधीच कवडीमोल भावाने किंवा त्यांना फसवून खरेदी करून झाले आहेत आता फक्त यांना कायदेशीर मालक होण्याची सुकर प्रक्रिया हवी...... मानव उध्वस्त करी त्याचे सर्व तो पुन्हा येईल... घेऊन निसर्गाचे पर्व #nature
MR
0
0
1
13
Anil Shidore अनिल शिदोरे
मुख्यतः रायगड भागात जपलं पाहिजे आणि अर्थात ठाणे आणि इतर जिल्ह्यातही.. आदिवासींच्या स्थावर मालमत्तेकडे डोळ्यात तेल घालून जपलं पाहिजे, ह्या जमिनी त्यांना त्यांच्या परंपरागत वनहक्कातून मिळालेल्या आहेत .. #खरेप्रश्न
Sanjeev Chandorkar@s_chandorkar

आदिवासी, शेतकरी, पिढ्यान्पिढ्या मासेमारी करणारे कोळी बांधव यांच्या मालकीची असणारी जल, जंगल , जमिनी कॉर्पोरेट भांडवलाला हव्या आहेत. त्या बळजबरीने हिसकावून घेणे लोकशाहीमुळे शक्य होत नाही. मग त्या उत्पादक मत्ता भाडेतत्त्वावर घ्या किंवा त्यांना कंपनीमध्ये शेअर होल्डर करून घ्या अशा आयडियाज पुढे येतात. वरकरणी अत्यंत फेअर गेम आहे असे भासवले जाते. पण ते लबाडाच्या घरचे आवतण आहे. न समजणाऱ्या कायदेशीर आणि वित्तीय संज्ञा वापरून करार केले जातील. सह्या घेतल्या जातील. उद्या काही मतभेद झाले तर मॅटर कोर्टात जाईल. कोर्ट करारात काय प्रावाधाने आहेत त्याप्रमाणे निर्णय देईल. मोबदला घ्या आणि आमच्या रस्त्यातून बाजूला व्हा असा तो प्रकार आहे. पण प्रश्न वरकरणी फेअर गेमचा नाहीं. हाताला काम, त्यातून वाजवी उत्पन्न, त्यातून कुटुंबाचे भरण पोषण, त्यातून मिळणारा आत्मसन्मान, पूर्ण सामाजिक, सांस्कृतिक अस्तित्व अशा अनेक पेडी त्याला आहेत. प्रस्थापित कॉर्पोरेट प्रणालीला यांचे काहीही पडलेले नाही संजीव चांदोरकर (२० सप्टेंबर २०२५)

MR
12
53
212
6.6K
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
शारदीय नवरात्र उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. #शारदीय_नवरात्र #नवरात्रि२०२५ #Navratri2025
Raj Thackeray tweet media
MR
41
116
1.6K
36.6K
Anil Shidore अनिल शिदोरे
माझे पूर्वज कोण आहेत ह्याचं मला कायम कुतूहल आहे. जेंव्हा आज वाचलं की कोकणातील कातळशिल्पं सुमारे २४,००० वर्षांपूर्वीची आहेत तेंव्हा ते कुतूहल पुन्हा उफाळून आलं. २४,००० वर्ष म्हणजे झालं काय. त्यावेळी लोकांनी बसून चित्रं काढली आहेत.. कोण होते हे लोक? काय सांगायचं होतं त्यांना त्या चित्रातून? त्यांची भाषा कुठली होती? ते कसे रहात होते? २४,००० वर्ष म्हणजे मोहेंजोदारो, हरप्पाच्या ही २०,००० वर्ष आधी.. वेदकाळाच्याही खूप खूप पूर्वी. आपल्याला माहीत असलेल्या आपल्या इतिहासाच्याही पुष्कळ आधी. आपण हा ठेवा नीट सांभाळला पाहिजे. समजून घेतला पाहिजे. त्यावर संशोधन केलं पाहिजे. उत्तम दस्तावेजीकरण केलं पाहिजे. आपल्या पुढील पिढ्यांना सांगितलं पाहिजे. त्यासाठी जे जे करायला लागेल ते ते केलं पाहिजे.. (प्रतिसादात बातमीचा फोटो दिला आहे..) #महाराष्ट्र #प्राचीनमहाराष्ट्र
MR
18
159
1.1K
44.4K