Locha
3.1K posts


@chintskap @YouTube Pancham Da is a legend in the world of music. His work continues to enthral us.
English

Tu Tu Hai Wahi (Original Version) Kishore Kumar, Asha Bhosle | Yeh Vaada... youtu.be/hjfzFVw2Zjo via @YouTube. The Chinese played our song to welcome PM Modi along PM Xi in Wuhan. Honored. Thank you Pancham! 🙏

YouTube
English

@aravind Indians in USA get all substandard quality stuff @ crazy prices.
Kachra quality vegetables n fruits, third class dry fruits, faltoo quality pulses n grains.
U name it.
But people in India, have no idea what they r enjoying n how literally rich they r in terms of quality/variety
English

Forget Methi, everything is damn expensive nowadays outside India. And the quality is third rate.
Indians who say "in foreign countries they earn a lot more per capita" "all the good stuff is exported out of India" etc have no clue.
By PPP, India will beat most countries out of the park in affordability thanks to abundant local production and excellent management of inflation.
And the cherry on top is - the amount of variety and quality you can get in India for most things from food to medical to services is unmatched anywhere.
The issue which is making Indians black pilled is poor quality of infra in towns and cities. And high education & real estate costs.
It is only a matter of time these things will also become better, as I clearly see India is trying to solve these issues now.
Woke Eminent@WokePandemic
She says this methi leaves cost 10 rupees in India and in the US it costs 600 rupees What is wrong with India?
English

@RajThackeray तुझ्या आजोबाचं नाव या थोर संतांच्या बरोबर घेऊ नकोस. तेवढे उपकार कर या महाराष्ट्रावर.
MR

अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च २०२६ ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' हा प्रश्न पडतो.
ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा 'गीतारहस्य' सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब 'तीर्थ' प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे.
महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजदेखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जणं या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे.
हा खरात स्त्रियांचं शोषण करतोय, ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही.
आधी आमदार खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड. आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे.
आणि या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांचे सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिकटून रहायचं आहे.
या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का ? माध्यमं सध्या खरात प्रकरणाचा रोज पाठपुरावा करत आहेत हे चांगलं आहे पण म्हणून त्यांनी जनतेला पुन्हा एकदा आपण कोण होतो याचं दर्शन घडवायला हवं असं मला मनापासून वाटतं. गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून मी हा महाराष्ट्र कोणी घडवला आहे याचं दर्शन मुद्दामून करवलं होतं, ती माझी समज काय आहे हे दाखवण्यासाठी नाही. तर आत्ताच्या तरुण पिढीला हे कळावं म्हणून. माझ्यापरीने हे काम मी करत राहणार आहेच.
पण महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. हे असले लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात. महाराष्ट्रातील गावागावांत आजही कीर्तनं होतात, ज्ञानेश्वरीचं पठण होतं, आजही या राज्यात तर्काचा आवाज मोठा आहे. पण जर तुम्ही या असल्या नाठाळांना आपले नेते मानणार असाल तर महाराष्ट्राचं काही खरं नाही हे नक्की.
राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला आहे.
जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेंव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं ? माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल.
माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपछाड राजकारणाचा भाग होऊ नका. या असल्या बुवाबाबांना शोधून काढा. त्यांची कृत्य उघडकीस आणा. इतकंच नाही तर खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका.
MR

#BREAKING: Israeli Prime Minister @netanyahu releases fresh video proof of life chatting with @IDF and civilians likely in the Northern part of Israel. (Waiting for Pakistani/Iranian propagandist and Indian jobless IT cell to declare it as an AI video)
English

@moronhumor He has taken mimicry on a different level nobody can match.
English
Locha nag-retweet

उद्धवाने कृष्णाला विचारलेला कठोर प्रश्न: “तुमची मैत्री कुठे होती ?”
महाभारत युद्धा नंतर उद्धवाने श्री कृष्णा समोर तो प्रश्न ठेवला, जो आजही आपल्या सर्वांच्या मनात उमटतो. हा संवाद केवळ एक कथा नसून, जीवन जगण्याचा एक अत्यंत गहन “मॅनेजमेंट लेसन” आहे.
“हे माधवा! तुम्ही म्हणता की खरा मित्र तोच, जो न मागता मदत करतो. मग पांडवां बरोबर असे का घडले ? युधिष्ठिरांना जुगार खेळण्या पासून तुम्ही का थांबवले नाही ? त्या फासांना धर्मराजाच्या बाजूने का वळवले नाही ? आणि द्रौपदीचा सभेत अपमान होत असताना, तिच्या चीरहरणाची पराकाष्ठा होईपर्यंत तुम्ही वाट का पाहिली ? हीच का तुमच्या मैत्रीची व्याख्या ?”
भगवान मंद स्मित करून म्हणाले,“उद्धवा, संसारात विजय त्याचाच होतो ज्याच्याकडे विवेक असतो.
दुर्योधनाकडे विवेक होता—तो स्वतः न खेळता शकुनीला पुढे करतो. युधिष्ठिरांनीही विवेकाने वागून, स्वतःऐवजी मला खेळायला सांगू शकले असते. सांग, जर माझ्यात आणि शकुनीत खेळ झाला असता, तर विजय कुणाचा झाला असता ?” “धर्मराजांनी मला विनंती केली होती की बोलावल्याशिवाय सभेत यायचे नाही. त्यांना स्वतःचा पराभव माझ्यापासून लपवायचा होता. मी त्यांच्या त्या विनंतीच्या मर्यादेत बांधला गेलो आणि बाहेरच उभा राहिलो. ते हरत गेले, पण मला आठवण्या ऐवजी फक्त आपल्या नशिबालाच दोष देत राहिले.”
“द्रौपदीला जेव्हा सभेत ओढून आणले गेले, तेव्हाही तिला स्वतःच्या शक्तीवर आणि पांडवांवर विश्वास होता. पण ज्या क्षणी तिने स्वतःवरील आधार सोडून, पूर्ण शरणागतीने हाक मारली, ‘हे हरि! अभय दे, कृष्णा!’— त्या क्षणीच मी प्रकट झालो. सांग उद्धवा, उशीर माझ्याकडून झाला होता की तिच्या पुकारेत?”
उद्धवाने टोचून विचारले, “म्हणजे तुम्ही फक्त बोलावल्यावरच येता ? शांतपणे सगळं पाहत राहता ?”
कृष्ण म्हणाले, “उद्धवा, सृष्टी कर्म फलाच्या नियमावर चालते.
मी हस्तक्षेप करत नाही; मी केवळ साक्षी आहे. प्रत्येक क्षणी तुमच्या जवळ उभा राहून तुम्हाला पाहतो—हेच माझे धर्म आहे. ”उद्धवाने पुन्हा कटाक्ष केला, “वा! म्हणजे आम्ही पाप करत राहायचे आणि तुम्ही फक्त पाहत बसायचे ?” तेव्हा भगवानांनी मर्म सांगितले:
“उद्धवा, ज्या क्षणी तुला हे जाणवेल की ‘मी’ तुला पाहतो आहे, त्या क्षणी तू कोणतेही चुकीचे कृत्य करू शकशील का ?
मनुष्य पाप तेव्हाच करतो, जेव्हा त्याला वाटते की त्याला कोणीही पाहत नाही. युधिष्ठिरांची चूकही हीच होती.”
उद्धव निरुत्तर झाले.
हा संवाद आपल्याला हे शिकवतो की—
ईश्वराची अनुपस्थिती पाप नाही,
तर ईश्वराच्या उपस्थितीचे विस्मरण हाच पापाचा खरा मूळ आहे. जर आपण प्रत्येक क्षणी त्यांना आपल्या सोबत अनुभवले, तर जीवन आपोआप दिव्य होऊन जाईल.
॥ हरे कृष्ण ॥

MR

𝐌𝐚𝐧 𝐖𝐡𝐨 𝐊𝐞𝐞𝐩𝐬 ‘𝐁𝐮𝐲𝐢𝐧𝐠 𝐭𝐡𝐞 𝐃𝐢𝐩’ 𝐄𝐯𝐞𝐫𝐲 𝐌𝐚𝐫𝐤𝐞𝐭 𝐅𝐚𝐥𝐥 𝐁𝐞𝐜𝐨𝐦𝐞𝐬 𝐌𝐚𝐣𝐨𝐫𝐢𝐭𝐲 𝐎𝐰𝐧𝐞𝐫 𝐨𝐟 𝐭𝐡𝐞 𝐂𝐨𝐦𝐩𝐚𝐧𝐲.
#Sensex #ShareMarket #NIFTY

English

Sayali Satghare gets an extraordinary amount of movement for her first Test wicket 😱 #AUSvIND
English

#मराठीदिन निमित्त एक मजेशीर गोष्ट. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयातील काही मुलं मला भेटायला आली.
मला म्हणाली -“सर, झेवियर्स महाविद्यालयात खूप पूर्वीपासून मराठी वाङमय मंडळ आहे परंतु काही कारणाने ते अनेक वर्ष निष्क्रीय होतं. आमचे सर आहेत - शिंदे सर - त्यांनी या मंडळाला पुनुरुज्जिवित करायचं ठरवलं आहे. या मंडळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून आपण यावं अशी आमची इच्छा आहे. तुम्ही याल का?”
तरूण मुलांशी संवाद साधायला मी कधीही नकार देत नाही. मी त्वरित होकार दिला. तसा त्यातला एक मुलगा जरा ओशाळून म्हणाला - “एकच प्रॉब्लेम आहे सर. मंडळ नवीन आहे आणि तुम्हाला झेवियर्सची कल्पना आहे. आमच्याकडे बराचसा श्रोतृवर्ग अमराठी आहे. तर तुम्ही तुमचं भाषण इंग्रजीतून कराल का?” मला याची गंमत वाटली. कुणी म्हणेल हे कसलं मराठी मंडळ! पण मला यात एक संधी दिसली. मी म्हटलं मी इंग्रजीत हे भाषण करेन. मुलं खूष होऊन परतली.
त्या कार्यक्रमात मी मराठी का बोलली गेली पाहिजे. या विषयावर इंग्रजीतून भाषण केलं. पुण्याचे अनिल गोरे ज्यांना महाराष्ट्र शासनाचा भाषासंवर्धन पुरस्कार दिला गेला आहे, ते एकदा जे म्हणाले होते तेच मी या मुलांना इंग्रजीतून सांगितलं. आपण इंग्रजी बोलतो. उदा. आपण म्हणतो - “Virat Kohli is riding on a wave of popularity.” किंवा “I was surfing channels on my TV.” ही भाषा कुठून आली? तर ही भाषा समुद्रातून आणि नौकायनातून आली आहे. कारण इंग्लंड हा देश पाण्याने वेढलेला आहे. त्यामुळे औरंगाबादला राहणारी मुलगी जेव्हा riding on a wave म्हणते तेव्हा ती second hand अनुभवातून बोलत असते. लाटेवर स्वार होणं म्हणजे काय हे कळायला तो अनुभव स्वतःच्या इंद्रियांनी अनुभवायला हवा! आपली भाषा आपल्या मातीतून उगवते. म्हणूनच हिंदीत - “अफ़वाहों की बाढ़ आती है” आणि मराठीत “अफवांचं पीक येतं”. म्हणूनच मराठीत “पिकतं तिथे विकत नाही” आणि पत्रकार “घोटाळ्याची पाळंमुळं खणून काढतात”. लोक म्हणतात भाषा केवळ एक संवादाचं माध्यम आहे. भाषा संवादाचं माध्यम आहेच पण ‘केवळ’ नव्हे! भाषा संस्कृतीची वाहक आहे.
आपली ओळख म्हणजे काही जन्माचा दाखला नाही. आपली ओळख सनातन आहे. भाषा ही आपल्या ओळखीचं एक परिमाण आहे. म्हणूनच तर ज्ञानेश्वर आपल्या रक्तात आहेत आणि तुकाराम आपल्या नेणिवेत. मराठी भाषेमुळेच शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला होणारी जाणीव ही इतरांना होणाऱ्या जाणिवेपेक्षा काहीतरी वेगळी आहे. भाषा आपल्या पर्यावरणाशी असलेलं आपलं नातं आहे जे आपल्याला जमीनीशी, वास्तवाशी जोडून ठेवतं. आणि म्हणून जिथे आपण राहतो तिथली भाषा आपल्याला येणं इष्ट असतं.
मला ठाऊक नाही की माझ्या बोलण्याचा किती परिणाम झाला पण दोन वर्षांपूर्वी मला झेवियर्स महाविद्यालयात पुन्हा बोलावलं. या वेळी संपूर्ण कार्यक्रम तर मराठीत झालाच पण मीही माझं भाषण पूर्णपणे मराठीत केलं. पुन्हा एकदा माझं आवडतं वाक्य म्हणतो आणि थांबतो.
वीज वाचवायची तर तिचा वापर कमी करायला हवा, पण भाषा वाचवायची असेल तर तिचा वापर वाढवायला हवा!
#Repost
MR

My Next Presentation Is All Set For Release
"Mera Kya Pata"
Coming soon. Keep in touch 😊❤🙏
#MeraKyaPata
#AmitKumar
#ComingSoon
#NewMusic
#SoulfulMusic

English
Locha nag-retweet

@Nirvika15 @VinayTiwari_ @coolfunnytshirt Nothing is original in music. You may feel something original if you heard it for the first time.
English

@VinayTiwari_ @coolfunnytshirt Yes he stole and today's generation will steal from him
English

@VinayTiwari_ @coolfunnytshirt True.
It’s RDX repository.
Unlimited khajana for sampling purpose. May it be a song or BGM or background music.
English

@coolfunnytshirt There are many songs of #RDBurman that can be used as background music in today's movies. Their rhythm and melody patterns are so powerful that they can bring any scene in movies to life and make it impactful.
English









