Akash Wankhade
6.6K posts

Akash Wankhade retweetledi

#TCS
@TCS @AshwiniVaishnaw @narendramodi @PMOIndia @AmitShah @TataCompanies
IT company TCS not given any value towords PM's Appel on WORK From Home. @TCS is Simple ignoring PM'S Appel.
Government needs to be Strict againt this kind of Organization.
#WFH
#PMModiAppeal
English
Akash Wankhade retweetledi
Akash Wankhade retweetledi

काँग्रेसी चमच्यानो 'आरसा' बघा...
ज्यांना फक्त पेट्रोलच्या किमती दिसतात, पण देशाची बदललेली आर्थिक ताकद दिसत नाही, त्यांच्यासाठी ही काही विशेष आकडेवारी..
✅ लोकांची वाढलेली खरेदी शक्ती म्हणजे त्यांचं Per Capita Income ज्याला आपण मराठीत दरडोई उत्पन्न :
काँग्रेस सरकारच्या काळात २०१३ मध्ये देशाचे दरडोई उत्पन्न Per Capita Income साधारण ८०,००० च्या आसपास होते. आज २०२६ मध्ये ते वाढून २,२०,००० च्या पुढे गेले आहे. जनता मोदींजींच्या सोबत आहे. काँग्रेसी गुलाम तथाकथित निष्पक्ष असणारे चोट्टे एकतर काँग्रेसी असतात नाहीतर शेणिक असतात.
खिशातली ताकद तिप्पट वाढली आहे, पण काँग्रेसी रडगाणं मात्र अजून जुन्याच रेकॉर्डवर सुरू आहे. पगार वाढला की तो 'स्वतःच्या कष्टाचा' आणि महागाई वाढली की 'सरकारची चूक'? हा दुटप्पीपणा सोडा!
काँग्रेसी काळात अमदानी अठ्ठानी खर्चा रुपया होता... काँग्रेसी चोट्टेहो भानावर या..
✅ रस्त्यांवरील गाड्यांचा महापूर म्हणजे वाहनांची संख्या :
- २०१३ मध्ये देशात साधारण १५ - १६ कोटी वाहने होती. हवं RTO कडे नोंदणीकृत वाहनांची संख्या आहे!
- आज २०२६ मध्ये ही संख्या ३५ कोटींच्या पार गेली आहे!
तर काँग्रेसी चोट्टेहो मला सांगा..
आज घराघरात टू- व्हीलर आणि मध्यमवर्गीयांच्या दारात 'फोर - व्हीलर' दिसायला लागली आहे. गाड्यांची विक्री दरवर्षी नवे विक्रम मोडत आहे. जर खिशात पैसाच नाही, तर या गाड्या काय हवेवर चालतात का? चोट्टे याचे उत्तर देणार नाहीत. इगो हर्ट होतो ना कबूल करायला.
✅ काँग्रेसी ऑईल बॉण्ड्स'चा फास आणि मोदीजींची कर्जमुक्ती :
काँग्रेस सरकारने त्यांच्या काळात जनतेला "स्वस्त तेल" देण्याचे नाटक केले, पण त्याचे पैसे भरलेच नाहीत. जेंव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली तेंव्हा त्यांनी 'ऑईल बॉण्ड्स' काढून तेल कंपन्यांची हजारो कोटींची उधारी ठेवली. म्हणजे काय? तरीही नियंत्रण नसल्याने थेट पेट्रोल डिझेल ४० वर असणारे पेट्रोल २०१३ मध्ये प्रति लिटर ८६ रुपये एवढे होते.
मोदीजी सरकारने गेल्या १० - १२ वर्षांत या जुन्या कॉंग्रेसी उधारीचे लाखो कोटी रुपये व्याजासह फेडले आहेत. जर हे 'कर्ज' फेडावे लागले नसते, तर आज पेट्रोलचे दर नक्कीच कमी दिसले असते. पण काँग्रेसने पेरलेलं पाप आज मोदीजींना निस्तरावं लागतंय.
असो...चोट्टेहो तुम्हाला ही पोस्ट अधिक झोम्बणार यात शंका नाही!
देशातील जनता संकटकाळात मोदीजी सोबत होती आजही आहे. आज त्याच पेट्रोलच्या पैशातून देशात समृद्धी महामार्ग, अटल सेतू, मुंबई मेट्रोचे जाळे आणि सीमेवरचे रस्ते उभे राहत आहेत. २०१३ मध्ये पैसे जायचे भ्रष्टाचारात आणि घोटाळ्यांमध्ये 2G, कोळसा घोटाळा.
या कॉंग्रेसीना आंतरराष्ट्रीय बाजाराचं गणित कळत नाही आणि देशाच्या विकास दिसत नाही म्हणून ओरडत आहेत. कारण ज्यांना 'बदलता भारत' आणि 'पायाभूत सुविधा' दिसतात, त्यांना माहिती आहे की हा पैसा कुठल्या 'खास' परिवाराच्या खिशात जात नाहीये, तर तो देशाच्या नवनिर्माणासाठी वापरला जातोय!
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी फक्त सल्ला दिला तरी ज्यांना मिर्ची लागते, त्यांनी आधी स्वतःच्या काळातल्या 'उधारीच्या पेट्रोलचा हिशोब द्यावा!

MR
Akash Wankhade retweetledi
Akash Wankhade retweetledi

१३२ शिव्यांचा डोंगर आणि गावठी चाणक्याचे 'सोयीस्कर' मौन!
राजकारणातील 'गावठी चाणक्य' म्हणवून घेणाऱ्या शरद पवारांना आजकाल सत्याची इतकी भीती का वाटावी? देशाने पाहिले आहे की, काँग्रेसने पंतप्रधान @narendramodi जी यांना तब्बल १३२ वेळा अर्वाच्य भाषेत शिव्या घातल्या आहेत.
पण, साहेबांना त्या शिव्यांचे सोयरेसुतक नाही, त्यांना राग येतो तो मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी मांडलेल्या सत्याचा!
देवेंद्रजी फडणवीस यांनी राहुल गांधींना 'रिजेक्टेड' म्हटले, तर त्यात चुकीचे काय? देशातील जनतेने त्यांना वारंवार नाकारले आहे, हे लोकशाहीतील उघड सत्य आहे. पण हे सत्य ऐकल्यावर साहेबांना इतकी 'मिरची' लागण्याचे कारण काय?
राहुल गांधींनी मोदीजीना खिसेकापू, पनौती आणि आतंकवादी म्हटले, तेव्हा पवार साहेबांची राजकीय नैतिकता कुठे 'वॉक' ला गेली होती? सोनिया गांधींनी "मौत का सौदागर" म्हटले, तेव्हा साहेबांना देशाची प्रतिष्ठा धोक्यात आल्याचे का जाणवले नाही?
स्वतःच्या मित्रांनी म्हणजे काँग्रेसने पंतप्रधानांच्या आईचा अपमान केला, त्यांच्या मृत्यूची इच्छा व्यक्त केली "मोदी तेरी कब्र खुदेगी", म्हणत तेव्हा साहेब मौनव्रत धरून बसले होते. मग आता देवेंद्रजी फडणवीस यांनी फक्त वस्तुस्थिती मांडली तर साहेबांना 'सभ्यतेचे' उमाळे का फुटत आहेत?
ज्या व्यक्तीला जनतेने वारंवार नाकारले, त्या 'रिजेक्टेड' नेत्याची वकिली करणे ही साहेबांची राजकीय मजबुरी असू शकते, पण महाराष्ट्र हे ओळखून आहे.
पवार साहेब, आरसा दाखवणाऱ्यावर चिडण्यापेक्षा ज्यांनी आरशावर चिखल फेकला आहे, त्यांना आवरा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केवळ देशहिताचा सल्ला दिला तरी तुमच्या मित्रपक्षाला मिरच्या झोंबतात, पण त्यांनी १३२ शिव्या पचवल्या त्यावर तुम्ही चकार शब्दही काढत नाही.
देवेंद्रजी फडणवीस यांनी जे बोलले तेच जनतेचे मत आहे; जे नाकारले गेलेत त्यांना 'रिजेक्टेड' म्हणणे हा गुन्हा नाही, तर ते जळजळीत सत्य आहे! साहेब, आता तरी ही 'सोयीस्कर' मखलाशी थांबवा.

MR
Akash Wankhade retweetledi

पुरावा जिवंत आहे!
इतिहास कधीच खोटा नसतो फक्त तो वाचण्याची, स्वीकारण्याची हिंमत लागते. आज जे लोक तथ्यांचा आधार न घेता प्रत्येक ऐतिहासिक सत्याला 'द हिंदू'ला 'फेक' म्हणून हिणवतात, त्यांच्यासाठी ' गोल्ड कंट्रोल ऍक्ट १९६८' चा जिआर हा आरसा आहे.
ही केवळ एक बातमी नाही, तर त्या काळातील काँग्रेस सरकारच्या आर्थिक धोरणांचे जिवंत दस्तऐवज आहे. 'सोनं खरेदी करू नका' असं आवाहन करणाऱ्यांपासून ते सोन्याच्या व्यापारावर बेड्या ठोकणाऱ्या 'गोल्ड कंट्रोल ॲक्ट' पर्यंतचा प्रवास हा भारतीय अर्थव्यवस्थेतील एक वेदनादायी अध्याय आहे.
चला तर मग, पुराव्यांसह जाणून घेऊया १९६८ चा तो कायदा, ज्याने भारतीयांच्या वैयक्तिक सोन्याच्या अधिकारावरही गदा आणली होती.
१. सोने बाळगण्यावर बंदी :
नागरिकांना सोन्याच्या बार किंवा नाण्यांच्या स्वरूपात सोने ठेवण्यास पूर्णपणे बंदी होती. जे सोने अशा स्वरूपात होते ते दागिन्यांमध्ये रूपांतरित करून सरकारकडे घोषित करणे अनिवार्य होते.
२. सोनारांवर कठोर बंधने :
सोनारांना फक्त १०० ग्रॅमपर्यंतच सोने ठेवण्याची परवानगी होती. परवानाधारक व्यापाऱ्यांना त्यांनी किती कारागीर ठेवले आहेत त्यानुसार जास्तीत जास्त २ किलो सोने ठेवता येत होते.
३. परवाना पद्धत :
सोन्याशी संबंधित प्रत्येक व्यवसायासाठी - व्यापारी, शुद्धीकरण कारखाने आणि सोनार - सरकारी परवाना अनिवार्य होता. परवान्याशिवाय सोने ठेवणे, बनवणे किंवा विकणे बेकायदेशीर होते.
४. कडक शिक्षा :
बेकायदेशीरपणे सोने ठेवल्यास ७ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होती. Gold Control Officers ला कोणाच्याही घरात, दुकानात जाऊन तपासणी करण्याचे अधिकार होते.
५. देवस्थानांनाही बंधन :
धार्मिक संस्थांना देणग्यांमधून मिळालेल्या सोन्याचे मासिक हिशेब सरकारला सादर करणे बंधनकारक होते.
सत्य हे सूर्यासारखं असतं, ते कितीही काळ खोटेपणाच्या ढगांआड लपवलं तरी एक दिवस लख्खपणे समोर येतंच. १९६८ चा सुवर्ण नियंत्रण कायदा हा त्याच सत्याचा भाग आहे. ज्यांना हा फोटो 'फेक' वाटतो, त्यांनी किमान संसदेच्या नोंदी आणि ऐतिहासिक गॅझेट तपासावेत. राजकीय भूमिका घेताना आपल्याच पक्षाचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करणे म्हणजे जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासारखे आहे.
आश्चर्य याचे वाटते की, आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाला फक्त एक सकारात्मक 'सल्ला' दिला, तर या मंडळींना एवढी मिर्ची लागली की त्यांनी थेट इतिहासालाच नाकारायला सुरुवात केली.
ज्यांनी स्वतःच्या काळात कायद्याचा बडगा उगारून सामान्य जनतेच्या सोन्यावर निर्बंध आणले, त्यांनी आज केवळ एका सल्ल्यावरून कांगावा करावा हे हास्यास्पद आहे.
भाजपच्या नावाने बोटं मोडण्याआधी काँग्रेसने स्वतःच्या काळातील या 'सुवर्ण' इतिहासाचे आत्मपरीक्षण करावे. पुराव्यासमोर कोणाचंही राजकारण टिकत नाही, हेच यावरून सिद्ध होतं!




MR
Akash Wankhade retweetledi
Akash Wankhade retweetledi

कंबरडं अर्थव्यवस्थेचं नाही, कंबरडं मोडलंय आपल्या 'राज'कीय गणिताचं!
सप्रेम जय महाराष्ट्र,
राज ठाकरे, तुमचं पत्र वाचनात आलं. तुमची भाषा नेहमीप्रमाणेच 'खळ्ळ-खट्याक' शैलीची आणि टोमणेवजा आहे. पण साहेब, भाषणांच्या टाळ्या आणि देशाची अर्थव्यवस्था यातला फरक समजून घ्यायला फक्त 'मराठी'ची जाण असून चालत नाही, तर थोडा 'अर्थ' ही समजून घ्यावा लागतो.
पंतप्रधानांच्या ताफ्यावर तुमच्या चेल्यांच्या भाषेत सणसणीत टीका केलीत. पण साहेब, तुम्ही जेव्हा 'कृष्णकुंज' वरून बाहेर पडता, तेव्हा तुमच्या मागे - पुढे असलेल्या गाड्यांचा ताफा हा काय 'काटकसरीचा' नमुना असतो का? की तो फक्त तुमचा 'रुबाब' असतो? पंतप्रधान देशाचे प्रतिनिधी आहेत, त्यांचा ताफा ही 'मिरवणूक' नसून ती देशाची सुरक्षा आणि प्रोटोकॉल असतो. आता पंतप्रधान काय सायकलीवरून परदेश दौऱ्याला जातील अशी तुमची अपेक्षा आहे का? परदेश दौरे हे थंड हवेसाठी नसून भारताच्या प्रगतीची 'उब' वाढवण्यासाठी असतात, हे समजायला थोडी व्यापक दृष्टी लागते.
तुम्ही म्हणालात अर्थव्यवस्था आतून कमकुवत झाली आहे. साहेब, आज भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ताठ मानेने उभा आहे. देश मजबूतच आहे, पण घरचा प्रमुख जसा पावसाळ्यापूर्वी घराचं छप्पर तपासायला सांगतो, तसंच पंतप्रधान भविष्यातील जागतिक संकटाची इराण-इस्रायल युद्ध पूर्वकल्पना देत आहेत. याला 'कंबरडं मोडणं' म्हणत नाहीत, तर याला 'दूरदृष्टी' म्हणतात. जेव्हा तुम्ही टोलनाके फोडण्याचे आदेश देता, तेव्हा अर्थव्यवस्थेला खिळ बसते की चालना मिळते, याचाही हिशोब एकदा जनतेला द्यावा!
२००८ आणि २०१४ च्या किमतींचे दाखले देणं आता 'आऊटडेटेड' झालंय. तुमच्या माहितीसाठी, मनमोहन सिंगांच्या काळात जो 'इंधन रोख्यांचा' (Oil Bonds) डोंगर उभा केला होता, त्याचं व्याज आणि मुद्दल फेडण्याचं पुण्यकर्म हे सरकार करत आहे. तेव्हा तुम्ही स्वस्त कम महाग पेट्रोल वापरलंत कारण ते 'उधारी'वर होतं. आज आपण जे पैसे देतोय, त्यातून देश आत्मनिर्भर होतोय. रुपयाचं मूल्य कमी झालं म्हणून रडण्यापेक्षा, भारताचा परकीय चलन साठा किती वाढलाय हे पाहिलं तर 'मन की बात'ऐवजी 'डेटाची बात' समजेल.
महाराष्ट्राच्या योजनांना तुम्ही 'रेवडी' म्हणताय? जेव्हा आपल्या पक्षाला साधी 'विठ्ठलाची पाऊली' ही निवडणुकीत मिळत नाही, तेव्हा अशा योजना तुम्हाला 'अर्थव्यवस्था बुडवणाऱ्या' वाटणारच! महिलांच्या सक्षमीकरणासाठी दिलेल्या पैशाला 'रेवडी' म्हणणं हा तर महाराष्ट्राच्या माता -भगिनींचा अपमान आहे. तुम्हाला कदाचित 'ब्लू प्रिंट' सादर करण्याची सवय आहे, पण लोकांना प्रत्यक्ष कृती हवी असते, जी हे सरकार करत आहे.
विद्यार्थी परदेशात का जातात? कारण त्यांना तिथे संधी दिसतात. पण गेल्या १० वर्षांत भारतात जेवढे आयआयटी IIT आणि आयआयएम IIM उभे राहिले, तेवढे गेल्या ६० वर्षांत झाले नव्हते. तुम्ही म्हणता 'हिंदी लादली जातेय' हा तुमचा जुना आणि घासलेला टेप आता लोक ऐकत नाहीत. आज भारत तंत्रज्ञानाच्या भाषेत जगाशी बोलतोय आणि तुम्ही अजूनही भाषेच्या वादातच अडकलेले आहात.
शेवटी राज ठाकरे तुम्हाला एवढीच आठवण करून देतो...
राज ठाकरे, शास्त्रीजींनी उपवास करायला सांगितला होता, पण तेव्हा विरोधक 'उपहास' करत नव्हते. आज देश एकसंधपणे संकटाचा सामना करायला तयार असताना, तुम्ही केवळ टोमणे मारण्यात धन्यता मानत आहात. राजकारण करायला अख्खं वर्ष पडलंय, पण किमान देशाच्या आर्थिक शिस्तीच्या बाबतीत तरी 'सल्लागार' बनण्यापेक्षा 'सहभागी' व्हा!
बाकी, १५ मे च्या दौऱ्याची काळजी तुम्ही करू नका, देश सुरक्षित हातांत आहे!
धन्यवाद! @mnsadhikrut @RajThackeray

MR

Akash Wankhade retweetledi

If we have to stop the outflow of dollars there are many small things one can do.
- Students going for studies abroad because inspite of getting 90% plus they don’t get admissions in any good collages in India and they spend 50/60 lacs per annum overseas.
- Domestic Travel should be promoted by making it people friendly. Let’s take the example of Goa one of the most aspirational destination of an average Indian but no one wants to address the taxi mafia, high hotel and flight prices, super expensive eateries and people find it cheaper to travel to Malaysia, Thailand, Vietnam etc.
- FIIs selling - there is not even a discussion by relevant people as to what can be done to stop the flows or take some measures to restore their confidence.
In the absence of any concrete solutions there cannot be any credible result.
English
Akash Wankhade retweetledi

#workfromhome
#PMAppel
#वर्कफ्रॉमहोम
Why Government not forced all IT companies to give Work From Home to their employee.
@PMOIndia @narendramodi
@AshwiniVaishnaw @AmitShah @TCS @Infosys @hcltech @Wipro @aajtak @ZeeBusiness @tech_mahindra @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
English
Akash Wankhade retweetledi

Akash Wankhade retweetledi
Akash Wankhade retweetledi
Akash Wankhade retweetledi
Akash Wankhade retweetledi
Akash Wankhade retweetledi













