
#कनिष्ठ_अभियंता (स्थापत्य गट ब) च्या रखडलेल्या नियुक्त्यांच्या संदर्भात मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांची भेट घेऊन हा विषय निकाली काढण्याची विनंती केली.त्यांनी देखील त्वरित जलसंपदा विभागाच्या सचिवांशी संपर्क करून सद्यस्थिती जाणून घेतली.या विषयाची सुनावणी ११ सप्टेबर रोजी असून त्यासाठी अत्यंत नामांकित वकील विद्यार्थ्यांची बाजू मांडणार असून विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल लागण्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.न्यायालयाच्या निकालानंतर त्वरित नियुक्त्या देण्याबाबत देखील त्यांनी आश्वासित केले आहे. न्यायालयाचा निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूनेच लागणार असा विश्वास आहे.गेल्या अधिवेशनात देखील मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री साहेबांशी याविषयी चर्चा केली असून मी स्वता या विषयी वैयक्तिक लक्ष ठेवून आहे.त्यामुळे सद्या सुरु असलेला पाउस व उपोषणात विद्यार्थिनी भगिनींची असलेली संख्या बघता आपण हे उपोषण त्वरित मागे घ्यावे अशी आपला मोठा भाऊ विनंती करतो.











