Kapil Patil

3.3K posts

Kapil Patil banner
Kapil Patil

Kapil Patil

@KapilHPatil

Democratic Socialist | Ex - Member of Maharashtra Legislative Council

Mumbai, Maharashtra Katılım Şubat 2013
199 Takip Edilen6.1K Takipçiler
Kapil Patil
Kapil Patil@KapilHPatil·
गर्जा महाराष्ट्र माझा ... ▶️ सम्राट अशोकाच्या वसई (सोपारा) जवळ सापडलेल्या शिलालेखात महाराष्ट्राचा उल्लेख आढळतो. तिथून बौद्ध धर्म श्रीलंकेत गेला. ▶️ महाराष्ट्री नावाची पहिली ओळख मिळवून देणारा पहिला शककर्ता राजा गौतमीपुत्र सातकर्णी. सातवाहनांच्या काळात अजिंठा वेरुळची लेणी खोदली गेली. ▶️ श्री देवी आद्यशक्ती जगदंबिका महाराष्ट्र धर्म रक्षिका तुम्हा सुप्रसन्न असो ! ▪️महिकावतीची बखर (इ.स. १४४८, मुंबई) ▶️ महाराष्ट्र धर्मासाठी मराठे सरदारांना एकीची हाक देणारा आणि मराठीला राजभाषेचा दर्जा देणारा अहमदनगरच्या निजामाचा प्रधान मलिक अंबर. ▶️ अठरा पगड मावळ्यांना एकत्र करुन मराठी राज्य स्थापून महाराष्ट्र धर्म वाढवणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. ▶️ १ मे १९६० रोजी साथी एसेम जोशी, आचार्य अत्रे, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, शाहीर अमरशेख, प्रबोधनकार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला. यशवंतराव चव्हाणांनी अमृत कलश आणला. महाराष्ट्राचे ते पहिले मुख्यमंत्री झाले. #महाराष्ट्रदिन #कामगारदिन #1मे #महाराष्ट्र
Kapil Patil tweet media
MR
0
3
7
145
Kapil Patil
Kapil Patil@KapilHPatil·
संसदेत महिला आरक्षण बिल पास झालं नाही म्हणून सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षांच्या विरोधात मोर्चे काढले. उत्तर प्रदेशात आमदार अनुपमा जायसवाल यांनी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे पुतळे जाळले. त्या पुतळा दहनात अनुपमा जायसवाल या स्वत:च भाजल्या. इतक्या की त्यांना मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. त्यांची चौकशी करायला अखिलेश यादव स्वत: गेले.  X अकाऊंट वर अखिलेश यादव यांनी लिहलं आहे, "हम नहीं चाहते हैं कि समाज के बीच आग जले। हम चाहते हैं समाज में सौहार्द की फुहार हो। हमारी सकारात्मक राजनीति की स्वस्थ परंपरा ने हमें यही सिखाया है। इसीलिए हम भाजपा विधायक श्रीमती अनुपमा जायसवाल जी से मिलने गये और उनके शीघ्र स्वास्थ्य लाभ की कामना करके आएं हैं। राजनीति अपनी जगह है और मानवीय संबंधों का महत्व अपनी जगह। सद्भाव बना रहे, सौहार्द बना रहे!" सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे काही एकमेकांचे शत्रू नव्हेत. पूर्वी परस्परांमध्ये सौहार्द असे. आता कटुता टोकाला गेली आहे. सभ्य, अहिंसक आणि संसदीय मार्गाने विरोध जरूर करावा. भाषेचा आणि कृतीचा स्तर मर्यादा ओलांडणारा नसावा. शिव्या, शाप देणं, आया, बहिणींचा उद्धार करणं, प्रतिमा, पुतळा जाळणं, कधी तिरडी काढणं, चपलेने बडवणं किंवा चपलांचे हार घालणं याची खरंच गरज असते का ? ही हिंसेचीच रूपं आहेत. असभ्य आणि असंस्कृत.  ठाण्याच्या एका कार्यकर्त्याने एका मोठ्या नेत्याचा पुतळा जाळला होता. पुढे तो त्यांच्याच पक्षात गेला. मंत्रीही झाला. (आहे.) लोकंही विसरून जातात. शिव्या मात्र रुतून राहतात. शिव्यांनी आपलीच जीभ चावली जाते आणि प्रतिमा दहनात आपलाच चेहरा.  अखिलेश यादव यांचं वेगळेपण म्हणूनच भावतं.      @yadavakhilesh
Kapil Patil tweet media
MR
0
3
7
146
Kapil Patil
Kapil Patil@KapilHPatil·
आमदार संजय गायकवाड यांनी ही दोन्ही पुस्तके वाचावीत. ते ज्या पक्षाचे आहेत, त्या पक्षाचे नाव प्रबोधनकार ठाकरे यांनीच दिले होते. @sanjaygaikwad34 #शिवाजीकोणहोता #दगलबाजशिवाजी
Kapil Patil tweet mediaKapil Patil tweet media
MR
4
38
214
4.3K
Kapil Patil
Kapil Patil@KapilHPatil·
विश्वास बसत नव्हता, पण आमदार संजय गायकवाड यांनी स्वत:च कबुली दिली आहे, की आवाज त्यांचा आहे. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचं त्यांनी उघड समर्थन केलं आहे. त्यांनी केवळ शिव्याच दिल्या नाहीत तर प्रशांत आंबीच्या आई आणि पत्नीवर अत्याचार करण्याची धमकी दिली आहे. परस्त्रीला माते समान मानणार्‍या छत्रपती शिवरायांचा इतका अपमान कुणी केला नसेल. गायकवाड यांना सरकार माफ करणार की कारवाई करणार ? की त्यांचं मराठी भाषेवरील अगाध प्रभुत्व पाहून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक त्यांच्याकडे रिक्षावाल्यांना मराठी शिकायला पाठवणार ? प्रशांत आंबी यांच्या संयमाला आणि हिमतीला सलाम ! @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @Chh_Udayanraje @Shivendraraje11 @YuvrajSambhaji @PratapSarnaik
MR
7
44
231
4.9K
Kapil Patil
Kapil Patil@KapilHPatil·
फुले थे, इसलिए लड़कियाँ पढ़ रही हैं! बड़ा उत्सव है, खुशी से हर घर फूल बाँटो राष्ट्र पितामह महात्मा जोतिराव फुले जन्म द्विशताब्दी वर्ष 2026 - 2027
Kapil Patil tweet media
हिन्दी
0
1
6
233
Kapil Patil
Kapil Patil@KapilHPatil·
होते फुले, म्हणून आज मुलगी शिकतेय ! सण मोठा, आनंदाने वाटा घरोघरी फुले राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले जन्म द्विशताब्दी वर्ष 2026 - 2027
Kapil Patil tweet media
MR
0
1
4
133
Kapil Patil
Kapil Patil@KapilHPatil·
महात्मा फुले भारतीय स्वातंत्र्याचे पितामह ~ कपिल पाटील shorturl.at/GpDOX Click Link to read Full Blog
NE
0
0
6
120
Kapil Patil
Kapil Patil@KapilHPatil·
राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले जन्म द्विशताब्दी वर्षाचा शुभारंभ 11 एप्रिल – फुले जयंती, घरोघरी फुले राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षाचा शुभारंभ शनिवार, दि. 11 एप्रिल 2026 रोजी होत आहे. हा ऐतिहासिक दिवस संपूर्ण राज्यात सणासारखा साजरा करण्याचे आवाहन आम्ही ‘राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले जन्म द्विशताब्दी महोत्सव समिती’च्या वतीने करत आहोत. घरोघरी फुले महात्मा फुले होते म्हणून आज मुलगी शिकतेय याची जाणीव ठेवत फुले जयंती घरोघरी सणासारखी साजरी व्हावी. दारावर फुलांचं तोरण बांधावं. मित्र, नातेवाईक, शेजारी यांना फुले देऊन आनंद वाटावा. गोडधोड करावं. त्यातून समाजात प्रेम बंधुता आणि समतेचा संदेश पोचेल. घरोघरी जाईल. मकरसंक्रांतीला तिळगूळ, दसऱ्याला आपट्याची पाने वाटली जातात, तसेच फुले जयंतीला “फुले वाटण्याची परंपरा” रुजवण्याचा संकल्प करूया. फुले विचारांच्या अनुयायी असलेल्या सामाजिक संघटनांची अलिकडेच एक बैठक झाली. त्यात हे आवाहन करण्याचं ठरलं आणि जन्म द्विशताब्दी समितीही स्थापन करण्यात आली. ---------------- सन्मान पुरस्कार – फुले विचारांना अनुसरून राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक कार्य करणार्‍या व्यक्ती आणि आणि संस्थांना सन्मान पुरस्कार देण्याची योजनाही समितीने  तयार केली आहे. याबाबत सूचना करण्याचे आम्ही आवाहन करतो. ---------------- महात्मा फुले यांनी सामाजिक न्याय, स्त्री शिक्षण, शेतकरी हक्क आणि समता यांचा पाया घातला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्यांना “महात्म्यांचे महात्मा” असे गौरविले आहे, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या तीन गुरूंमध्ये बुद्ध आणि कबीर यांच्यानंतर फुले यांना स्थान दिले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सत्यशोधक चळवळीला पाठबळ देत त्यांच्या कार्याला बळ दिले. महात्मा फुले यांनी पहिली शिवजयंती सुरू केली, विधवा ब्राह्मण स्त्रियांचे केशवपन थांबवण्यासाठी लढा दिला, अस्पृश्यांसाठी पाण्याची विहीर खुली केली, तसेच “शेतकऱ्यांचा आसूड” आणि “गुलामगिरी” यांसारख्या ग्रंथांद्वारे सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. स्त्री शिक्षणाची पहाट घडवून. आधुनिक भारताचा पाया महात्मा फुले यांनी रचला. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली राजकीय स्वातंत्र्याचा लढा भारतीय जनतेने जिंकला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता म्हटलं. तसेच सामाजिक स्वातंत्र्याची लढाई महात्मा फुले यांनी सुरू केली म्हणून ते राष्ट्रपितामह ठरतात. जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त आपणही विविध कार्यक्रमांचे आयोजन करू शकाल. व्याख्यानमाला, लेखन स्पर्धा, पुस्तिका प्रकाशन, सांस्कृतिक कार्यक्रम, रंगमंचीय सादरीकरणे तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवता येतील. सर्व समाजघटकांनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. असा प्रयत्न आपण करूया. समतेने न्यायाने वागूया. तेच खरे महात्मा फुले यांना अभिवादन ठरेल. कृपया सन्मान पुरस्काराबाबतच्या आपल्या सूचना समितीचे सचिव राजा कांदळकर  9987121300 आणि रोहित ढाले 9869819878 यांना WhaatsApp वर पाठवाव्यात. जय ज्योती, जय क्रांती ! जय शिवराय, जय भीम ! ~ कपिल पाटील, ज्ञानेश महाराव निमंत्रक, राष्ट्र पितामह महात्मा जोतीराव फुले जन्म द्विशताब्दी महोत्सव समिती #Phule200 #फुलेजयंती200 #फुले_जयंती #PhuleJayanti #महात्माफुले #MahatmaPhule
Kapil Patil tweet media
MR
1
8
49
720
Kapil Patil
Kapil Patil@KapilHPatil·
21 एप्रिल पासून राज्य सरकारी कर्मचारी - शिक्षकांचे बेमुदत संप आंदोलन होणार आहे, त्यानिमित्ताने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी हिंद मजदूर किसान पंचायतचे महाराष्ट्र अध्यक्ष कपिल पाटील यांची आज भेट घेतली. सोबत सुबोध किर्लोस्कर, सुरेंद्र सरतापे. यावेळी कपिल पाटील यांनी 21 एप्रिलच्या आंदोलनास सक्रिय पाठिंबा जाहीर केला.
Kapil Patil tweet mediaKapil Patil tweet mediaKapil Patil tweet mediaKapil Patil tweet media
MR
0
0
3
211
Kapil Patil
Kapil Patil@KapilHPatil·
प्रख्यात हिंदी कवी हूबनाथ पांडेय यांनी गुड फ्रायडे निमित्ताने व्यक्त केलेल्या भावना - *ज़ीजस!* याद है! तुमने कहा था - ईश्वर! इन्हें माफ़ करना ये नहीं जानते कि ये क्या कर रहे हैं ! ईश्वर इन्हें माफ़ करता उसके पहले इन्होंने ईश्वर को ही उस सलीब पर टांग दिया जिस सलीब पर से उतारा गया था तुम्हें! न तुम मरे न तुम्हारा ईश्वर पर जिन्हें तुमने और तुम्हारे ईश्वर ने माफ़ कर दिया था उनमें से कुछ जेरूसलम से निकल पूरी दुनिया में फैल गए और पूरी धरती को क़ब्रिस्तान में बदल दिया उनके पास बहुत कम थीं सलीबें इसलिए उन्होंने बनाए मिसाइल और बम विध्वंसक हथियार पागलपन को देशभक्ति की चादर उढ़ा हाथों में थमा दिए मोर्टार,मशीनगन वहशी जानवरों की तरह हांक दिया उन्हें फूलों के बगीचे में निर्मल नदियों में बच्चों की पाठशालाओं पर ज़ीजस! तुमने नहीं देखे हैं पागल हाथियों के झुंड उनके पैरों तले कुचली घास मसले फूल इसी हाल में मैंने जीते जागते इन्सान देखें बच्चे और बूढ़े औरतें देखीं तुम्हें जितना दर्द जितनी पीड़ा हुई होगी सलीब पर उससे हज़ार गुना दर्द बच्चे झेल रहे हैं तुम्हारे हाथ पैरों में ठुंकी थी कीलें कीलों से मांओं के जिस्म छलनी हैं तुम्हारी भी तो एक मां थी घायल दुधमुंहे बच्चे मां की चिथड़ा लाशों पिता के लहूलुहान घायल देह के पास न चीख पा रहे न रो पा रहे हैं इनका दर्द इनकी यातना इनकी पीड़ा तुमसे अधिक है प्यारे ज़ीजस और यह सब उनकी वजह से जिन्होंने तुम्हारा बाज़ार खड़ा किया तुम्हारी शानदार इमारतें बनाईं आसमान को छूती तुम्हारी प्रतिमाएं खड़ी कीं और तुम्हारे वजूद के ठीक नीचे दुनिया का सबसे बड़ा मक़्तल सजाया तुम और तुम्हारा ईश्वर क्या इतने कमज़ोर इतने अशक्त इतने पत्थर हैं कि अपनी ही संतानों को शैतानों के हाथों जिबह होते सिर्फ़ देख रहे हैं चुपचाप! ख़ामोश!! नि:शब्द!!! तुम्हारा और तुम्हारे ईश्वर का यह मौन कहीं शैतानियत का स्वीकार तो नहीं या क्रूरता के आगे करुणा की हार तो नहीं! चुप मत रहो ज़ीजस! अब और चुप मत रहो! तुम्हारी करुणा तुम्हारे प्रेम का दंड पूरी मानवता सह रही है क्या सिर्फ़ एक पल के लिए सिर्फ़ एक पल के लिए तुम जहां जहां हो जिस जिस में हो वहां तन कर खड़े नहीं हो सकते इन वहशी शैतानों के आगे तुम खड़े होओगे तो देखना सारे मजलूम होंगे साथ तुम्हारे और इस बार हम उन्हें माफ़ नहीं करेंगे न करने देंगे ईश्वर को भी बस! इस बार इस ईस्टर तुम रहो हमारे साथ तुम्हारे दुख से बड़ा दुख हम सह रहे हैं इसीलिए कह रहे हैं हमारे प्यारे ज़ीजस इस बार हमारा साथ दो सलीब पर से उतर कर साथ चलने का वक्त आ गया है! *- हूबनाथ*
हिन्दी
0
1
2
168
Kapil Patil
Kapil Patil@KapilHPatil·
'मनुस्मृती जाळणाऱ्यांनी ती वाचली नाही. वाचली असती तर ते जाळू शकले नसते', असे अकलेचे तारे कुणी शरद पोंक्षेने तोडले. त्यांचं नावही घेण्याची खरी गरज नाही. पूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर ते नथुरामी गरळ ओकायचे. आता तर त्यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर थेट हल्ला चढवला. पण आंबेडकर हे नुसतं रसायन नाही. कधीकाळी निद्रिस्त असलेला दलित समाज आता आंबेडकरी विचारांचा ज्वालामुखी बनला आहे. त्याचे चटके लागल्याबरोबर पोक्षांनी माफी मागून टाकली आहे. पण त्यांचा पीळ गेलेला नाही. मनुस्मृतीवरची श्रद्धा मिटलेली नाही. तसे ते एकटेच नाहीत एरव्ही पुरोगामी चेहरा घेणाऱ्यांच्या नेणीवेतही मनूची स्मृती लपलेली असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आधी चवदार तळ्याचा सत्याग्रह (20 मार्च 1927) करून आणि नंतर मनुस्मृतीचे दहन (25 डिसेंबर 1927) करून भारतात महाक्रांती घडवली. त्या क्रांतीचे बापूसाहेब सहस्रबुद्धे केवळ साक्षीदार नव्हते. भागीदार होते. गंगाधर नीळकंठ सहस्रबुद्धे विचाराने गांधीवादी समाजवादी. सोशल सर्व्हिस लीगचे सक्रिय पदाधिकारी. बाबासाहेबांच्या समता संघातही ते सामील झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाडच्या सत्याग्रहात अनेक समाजवाद्यांनी साथ दिली. सुरबानाना टिपणीस, बापूसाहेब सहस्रबुद्धे, फतेह खान, अनंत चित्रे, महादेवशेठ थरवळ हे सगळेच सामील होते. साने गुरुजी, एस. एम. जोशी यांच्या सोबतीने 1941 मध्ये राष्ट्र सेवा दलाचं पुनर्गठन झालं. त्यात सहभागी असलेली ही मंडळी सुरवातीपासून बाबासाहेबांची सहकारी होती आणि अखेरपर्यंत राहिली. मनुस्मृती जाळली ती बापूसाहेब सहस्रबुद्धे यांनी. बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृतीचं एक - एक पान सहस्रबुद्धे यांच्या हातात देत होते. बापूसाहेब सहस्रबुद्धे त्याचा अर्थ उपस्थितांना सांगत होते आणि सर्वांच्या साक्षीने ते पान अग्नीकुंडात टाकत होते. मनुस्मृती का जाळली पाहिजे ? हे बापूसाहेबांनी अर्थानिशी पटवून दिलं होतं. बापूसाहेब सहस्रबुद्धे यांच्यासारखे अनेक पुरोगामी ब्राम्हण, सारस्वत, कायस्थ ही कथित उच्चभ्रू जातीतली मंडळी त्या सत्याग्रहात सामील झाली होती. डी कास्ट होणं म्हणजे काय हे त्यांनी शिकवलं. त्या बापूसाहेब उपाख्य गंगाधर नीळकंठ सहस्रबुद्धे यांचा आज 68 वा स्मृतीदिन. त्यांना विनम्र अभिवादन ! ~ कपिल पाटील #babasahebambedkar #बाबासाहेबआंबेडकर #बापूसाहेबसहस्रबुद्धे #BapusahebSahasrbudhe #चवदारतळेसत्याग्रह #मनुस्मृतीदहन #chavdartale #manusmrutidahan
Kapil Patil tweet media
MR
13
65
285
9.3K
Kapil Patil
Kapil Patil@KapilHPatil·
ज्येष्ठ इतिहास संशोधक व विचारवंत डॉ.जयसिंगराव पवार यांचे निधन ही महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे. मराठेशाहीचा इतिहास आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यावर त्यांनी केलेले संशोधन अत्यंत मोलाचे आहे. त्यांनी नेहमीच वस्तुनिष्ठ आणि पुराव्यावर आधारित इतिहास मांडण्याचे काम केले. त्यांच्या लेखनातून अनेक पिढ्यांना इतिहासाची नवी दिशा मिळाली. एक निस्पृह, अभ्यासू आणि प्रामाणिक इतिहासकार आपण गमावला आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
Kapil Patil tweet media
MR
0
2
21
298
Kapil Patil
Kapil Patil@KapilHPatil·
नीलमताई, फडणवीस आणि मावळंकर Tap to read - shorturl.at/poLPn ~ कपिल पाटील
Kapil Patil tweet media
MR
1
2
7
201
Kapil Patil
Kapil Patil@KapilHPatil·
ऐसे कैसे झाले भोंदू ।  कर्म करोनि म्हणती साधू ।। अंगा लावूनियां राख ।  डोळे झांकुनी करिती पाप ।। • संत तुकाराम  बुवाबाजी आणि भोंदूगिरीचा धर्म आणि अध्यात्माशी काही संबंध नाही. पण अध्यात्म आणि धर्माचा आधार घेतल्याशिवाय भोंदूगिरी शक्य होत नाही. स्त्रियांचं लैंगिक शोषण आणि सामान्यांची आयुष्ये उदध्वस्त करणारी बुवाबाजी तेव्हाच शक्य होते, जेव्हा त्याला राजाश्रयही मिळतो. राज्यव्यवस्था पोखरणाऱ्या अशोक खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका आणि केलेली कारवाई अभिनंदनीय आहे.  ही लढाई सोपी नाही. स्वकीय आणि व्यवस्था या विरुद्धचं हे युद्ध आहे. हे युद्ध अटीतटीला जाऊन लढण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस यांचा दिसतो आहे. नरबळी आणि जादूटोणा कायदा ड्राफ्ट करण्यामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर, न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, तत्कालीन मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासोबत माझा प्रत्यक्ष सहभाग होता. त्या विधेयकाला कडवा विरोध करणारे दिवाकर रावते यांनीही मी सुचवलेले बदल आणि रदबदली मान्य करत विधेयकाला समर्थन दिलं. अखेर तो कायदा पास झाला. त्याच कायदाचा फास पहिल्यांदाच इतक्या हायप्रोफाइल प्रकरणात आवळला जातोय, याचं मनस्वी समाधान आणि आंनद आहे. कुणासोबत फोटो आहे म्हणून कुणाला लगेच दोषी ठरवण्याची गरज नाही. पण मुख्यमंत्री जी लक्ष्मण रेषा घालून देत आहेत, ती राजकारण्यांनी ओलांडली नाही तर विवेक बुद्धीचं चीरहरण होणं थांबेल. ~ कपिल पाटील #देवेंद्रफडणवीस #DevendraFadanvis
Kapil Patil tweet media
MR
3
5
24
1.7K
Kapil Patil
Kapil Patil@KapilHPatil·
स्वतंत्रता के बाद मुस्लिम समाज की पिछड़ी जातियों में इतना बड़ा परिवर्तन लाने वाला शब्बीर अंसारी जैसा दूसरा नेता नहीं हुआ। ~ कपिल पाटील forwardpress.in/2026/03/news-o… [फॉरवर्ड प्रेस]
हिन्दी
0
2
25
341
Kapil Patil
Kapil Patil@KapilHPatil·
शब्बीर अन्सारी गेले. मुस्लिम ओबीसींचा योद्धा गेला. पक्का लोहियावादी आणि फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा वारसा मुस्लिम समाजात घेऊन जाणारा नेता हरपला. केवळ मुस्लिम ओबीसीत नव्हे तर महाराष्ट्रातील ओबीसी चळवळीचा पाया रचणाऱ्यांपैकी ते एक होते. महाराष्ट्रातील ओबीसींचे मूळपुरुष अ‍ॅड. जनार्दन पाटील यांच्यासोबत सत्तरच्या दशकातच ते काम करत होते. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ तर राष्ट्रीय पातळीवर शरद यादव, रामविलास पासवान, चौधरी ब्रह्मप्रकाश यांच्यासोबतीने शब्बीर भाईंनी काम केलं. दिग्ग्ज सिने अभिनेते दिलीप कुमार पस्मांदा मुस्लिमांच्या चळवळीत उतरले तेही शब्बीर भाईंमुळेच. शायर हसन कमाल, अंजुमन इस्लामचे डॉ. झहीर काझी, बिहारचे अली अन्वर अन्सारी या सगळ्यांच्या मदतीने त्यांनी मुस्लिम ओबीसींची चळवळ राष्ट्रीय स्तरावर नेली. जनार्दन पाटील यांच्या ओबीसी संघटनेत शब्बीर भाई मुस्लिम ओबीसी विभागाचे प्रमुख होते. पण हा विभाग नको स्वतंत्र संघटना हवी, असं मी जेव्हा दोघांना म्हणालो तेव्हा दोघांनीही ते मान्य केलं. शब्बीरभाई, जनार्दन पाटील आणि मी आम्ही तिघांनी महाराष्ट्रात मुस्लिम ओबीसी संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. जालन्याला १९८३ ला झालेल्या स्थापना मेळाव्याला चौधरी ब्रह्मप्रकाश, अझगर अली इंजिनिअर, रा. सु. गवई, रामविलास पासवान हजर होते. पुढे १९९५ मध्ये त्याच संघटनेचं रूपांतर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायशेनमध्ये झालं. विलासराव देशमुख आणि माधवराव शिंदे यांचंही प्रेम शब्बीर भाईंना मिळालं. काँग्रेसमधून त्यांनी दोन आमदार निवडून आणले होते. मिरजेला हाफिज धतुरे आणि भिवंडीला रशीद ताहीर मोमीन. शब्बीर भाई म्हणजे अखंड भ्रमंती. पायाला भिंगरी लावून ते फिरत होते. महाराष्ट्रातलं असं एकही खेडं नसेल जिथे पस्मांदा मुस्लिम राहत होते आणि तिथे शब्बीर भाई गेले नाहीत. मुस्लिम समाजातल्या ६० ते ७० हुन अधिक जाती त्यांनी शोधून काढल्या. त्यांना मुख्य प्रवाहात आणलं. पुढे शरद पवार मुख्यमंत्री असताना, त्यांच्या मदतीने (डिसेंबर १९९४) मंडल आयोग मुस्लिम ओबीसींसाठी लागू गेला. मीच तेव्हा त्यांना पवार साहेबांकडे घेऊन गेलो होतो. खेड्यापाड्यातल्या मागासवर्गीय मुस्लिमांची नावं, त्यांचे व्यवसाय, गावगाड्यातील त्यांचं स्थान पवार साहेबांना माहीत होतं. पण शब्बीर भाईंनी ज्या पद्धतीने या सर्वांना गोळा केलं होतं, ते पाहून पवार साहेब चकीत झाले होते. त्यांनी निर्णय घेतला आणि या सगळ्या वंचित मुस्लिम जातींना सवलती मिळाल्या. जुलाह, बुनकर, मोमीन, अत्तार, मेहतर, बकर कसाब, कुरेशी, मुलाणी, अस्वलवाले, माकडवाले, छप्परबंद डफलीवाले, रंगरेज, रंगारी, गुजर, मुजावर, मदारी, पिंजारी, नदाफ, पाथरवट, तांबोली, फकीर, अन्सारी अशा वंचित समाजातील मुलं आता शिकू लागली आहेत. एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच मुलं पूर्वी मुस्लिम समाजातून डॉक्टर किंवा इंजिनिअर होत होती. आता हजारो मुलांना संधी मिळू लागली आहे. शिक्षण आणि नोकरी दोन्ही. हे केवळ शब्बीर अन्सारी यांच्यामुळे शक्य झालं आहे. वंचित, उपेक्षित आणि आताच्या काळात जणू अस्पृश्यता वाट्याला आलेल्या मुस्लिम समाजातील मागास जातींमध्ये एवढा मोठा कायापालट घडवून आणणारा स्वातंत्र्यानंतर शब्बीर अन्सारी यांच्यासारखा दुसरा नेता झाला नाही. इतकं मोठं काम करूनही हा माणूस आयुष्यभर पत्र्याच्या घरात राहिला. फकीर राहिला. आपल्याकडे माणसांची कदर नसते. ती मेल्यानंतरच होते. पस्मांदा मुस्लिमांना स्वातंत्र्याच्या चळवळीत नेतृत्व दिलं ते अब्दुल कयुम अन्सारी यांनी. पण स्वातंत्र्यानंतर आरक्षणाच्या चळवळीत संघटीत केलं ते शब्बीर अन्सारी यांनी. शब्बीर भाईंचे एक सहकारी अली अन्वर अन्सारी यांना त्यांचं काम पाहून नीतीश कुमार यांनी थेट खासदार केलं. शब्बीर भाईंमुळे अनेकांना राजकीय ताकद मिळाली, पण त्यांना मात्र ना सरकारी किताब मिळाला ना पद्म पुरस्कार. शब्बीर भाई जाणं ही माझ्यासाठी मोठी हानी आहे. ४५ ते ४६ वर्ष त्यांच्यासोबत काम करत होतो. हा सहप्रवास आता थांबला. शब्बीर भाईंना भावपूर्ण श्रद्धांजली ! अलविदा ! ~ कपिल पाटील
Kapil Patil tweet media
MR
14
41
257
8.1K
Kapil Patil retweetledi
Vaibhav Sanap
Vaibhav Sanap@vaibhavsanap713·
हे ट्वीट वाचणाऱ्या 10 पैकी 9 लोकांना खालील दोन समस्यांपैकी एक समस्या असू शकते. भारतातील 47-70 टक्के लोकांना विटामीन B12 ची कमतरता आणि 70-94 लोकांमध्ये विटामीन D3 ची कमतरता आहे. गावाकडील लोकं सतत थकवा येतो, हातपाय दुखतात म्हणून अधूनमधून पेनकिलर घेतात. तेवढ्यापुरता आराम मिळतो पण वारंवार ही दुखणी डोकं वर काढत राहतात. काही लोकं एक्स-रे काढतात आणि त्यात सगळं नॉर्मल येतं आणि मग एक वेगळी शंका येते... आपल्याला काहीतरी बाहेरचं झालं आहे, कुणीतरी घरावर जादुटोना केला आहे म्हणून आपण सतत आजारी असतो, सतत थकवा आलेला असतो असं वाटायला लागतं. एके दिवशी शेजारची एक बाई संध्याकाळी गप्पा मारताना अमक्या बाबाची महिमा सांगायला सुरु करते आणि अनेकांच्या आयुष्यात - बाबा, बुआ, गुरुमाऊली, स्वामीजी, महाराज, भगत, गुरुजी असे भोंदू येतात.. बाबाकडे गाऱ्हाणं मांडलं जातं, बाबाच्या अंगात देव संचारतो, तुझ्यावर तुझ्या घरा शेचारच्याच बाईने उतारा केलाय, पुढचा एक महिना दर रविवारी उपवास कर, प्रत्येक रविवारी घराच्या चारही बाजूला रात्री दहीभात टाक आणि ही पुडी घे, रोज रात्री दुधामध्ये टाकून पी आणि एक महिन्याने मला भेटायला ये. असं सांगून बाबा शांत होतो. ती बाई बाबाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट नित्यनेमाने मनोभावे करते, बाबाने आपल्याला छत्रछायेत घेतलंय, आता आपण बरे होणार असा विश्वास तिला येत जातो.. सोबत रोज रात्री दुध, बाबाने दिलेली पुडी (यात आयुर्वेदीक औषधं असतात) (एक बाबा तर मेडीकल मध्ये खोकल्यासाठी मिळणारं कफ सिरफ देताना पाहिलेला आहे मी) याने काहीसा फरक पडतो.. एक महिन्याने पुन्हा बाबाकडे गेलेली बाई भारावून गेलेली असते, बाबा खरंच चमत्कारी आहेत, बाबाकडे दैवी शक्ती आहे असा विश्वास तिला आलेला असतो. दुखणं पूर्ण बरं झालेलं नसलं तरी एक बाबा आपल्याकडून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला बरं करण्यासाठी वेळ देतोय यामुळे माणसं मनाने पंगू होऊ लागतात. पैसे द्यावे लागत नसले तरी मन आणि मेदू आपण गहाण ठेवलेला असते. एखादी गोष्ट जेव्हा फुकट मिळते तेव्हा आपणच प्रोडक्ट असतो हे आपल्याला कळत नाही. (उदा. लाडकी बहीण) बाबा हाच भाग्यविधाता आणि बाबा हाच उद्धारकर्ता म्हणून डॉक्टरलाही कमी लेखायला सुरुवात करतात. याच विश्वासाचा फायदा कधी शरीराने, कधी पैशाने तर कधी मनाने ही भोंदू लोकं घेतात.. साखळी तयार होते, मोठा कल्ट तयार होतो.. गाडी घ्यायची - बाबाला विचारा, शेतात काय पिकवायचं - बाबाला विचारा.. सगळ्याच गोष्टींत बाबा... गाडीला बाबाचं स्टीकर, घराला बाबाचं स्टीकर.. फोनला आणि शाळेत शिकून आयटी इंजिनिअर झालेल्या पोराच्या लॅपटॉपलाही बाबाचाच वॉलपेपर.. भक्तांचा विश्वास काबीज केल्यानंतर हे बाबा त्यांचे खरे रंग दाखवतात, देवाच्या मुर्तीसमोर महिलांची, अल्पवयीन मुलींची अब्रू लुटतात... मंत्री त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात... ज्या महिलांना या गोष्टी समजतात त्या महिला बाबाकडे जायचं बंद करतात, काही निमुटपणे सहन करत जातात पण बदनामी आणि भितीपोटी कुणीच समोर येऊन बोलत नाही. अशा बुवाबाजीला विरोध करणाऱ्या दाभोळकरांना जीवे मारलं जातं, पत्रकारांना धमकावलं जातं.. ज्या बुआबाजीच्या विरोधात दाभोळकांना जीव गमवावा लागला त्या बुआंचे पाय महाराष्ट्रातले मंत्री धुतात, त्याने दिलेलं सरबत पितात आणि महाराष्ट्र घडवण्याचा थापा मारतात.. या मंत्र्यांवर, पुढाऱ्यांवर टीका होते तेव्हा यांनी पाळलेली पिलावळं धर्माची ढाल पुढे करुन त्यांच्या संरक्षणाला पुढे येतात. दाभोळकरांचा खून करणारे आणि खुनाचं समर्थन करणारे कोण हे तर वेगळं सांगायलाच नको... असो.. आपला मुद्दा विज्ञान आणि विवेक आहे. ज्याप्रमाणे बहुतांश भारतीयांमध्ये विटामीन B12 आणि विटामीन D3 ची कमतरता आहे त्याचप्रमाणे सुमार लोकांचं युग असल्याने विज्ञानवादी आणि विवेकी विचारांची देखील मोठी कमतरता आहे.. ही पोस्ट इथपर्यंत वाचलीच असेल तर वर्षातून एकदा Full Body Checkup करु घ्या.. सध्याची आहारशैली आणि जीवनमान बघता कोणतातरी एक घटक किंवा शुगर आणि कोलेस्ट्रॉल जास्त असण्याची शक्यता असते. वेळीच लक्षात आलं तर लवकर बरे व्हाल आणि बाबाकडे जायची वेळ येणार नाही. वयाची १८ वर्षे गावाकडे राहिल्यानंतर गावाकडचीच लोकं भोळी असतात, अंधश्रद्धाळू असतात असा माझा समज होता. गावाकडे राहून आपलं काहीच होणार नाही म्हणून शहरात येऊन शिकलो, इथेच नोकरी सुरु केली. पण जेव्हा शिकलेले IAS अधिकारी, राज्याचा गाडा हाकणारे मंत्री बुआच्या भरवशावर बसलेले आहेत हे कळतं तेव्हा या देशाचं आणि राज्याचं भलं पुढची १०० एक वर्षे तरी होणार नाही याची खात्री पटते.
Vaibhav Sanap tweet media
MR
34
204
923
60.8K
Kapil Patil
Kapil Patil@KapilHPatil·
गुढीपाडवा का साजरा करायचा? Tap to read - bit.ly/3ghFmuf -कपिल पाटील 2016 मध्ये लिहिलेला ब्लॉग. आज गुढीपाडव्या निमित्त पुन्हा एकदा. जरूर वाचा...
MR
0
0
2
186