
JainybachaBasu jain
809 posts

JainybachaBasu jain
@basuj018
जैनधर्म I'm proud to be Jain #जयजिनेन्द्र #jainybachabasu #savegirnar #shikharji आंदोलन का सदस्य instagram page @ladla_vidhyasagarjika.. followers up to 43k+


ईश्वर नाकारणाऱ्या जैन धर्मात ‘देव’ आला कुठून? भारतीय धार्मिक परंपरांमध्ये जैन धर्म हा एक आगळावेगळा आणि बौद्धिकदृष्ट्या प्रगल्भ धर्म मानला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे, इतर धर्मांप्रमाणे 'सर्वशक्तिमान' किंवा 'सृष्टी निर्माण करणाऱ्या' ईश्वराची कल्पना जैन तत्त्वज्ञानात आढळत नाही. भगवान महावीरांनी स्पष्टपणे मांडले आहे की, हे विश्व अनादी-अनंत आहे; ते कोणीही निर्माण केलेले नाही. प्रत्येक जीव स्वतःच्या कर्मांचा निर्माता असून तो स्वतःच त्याचे परिणाम भोगत असतो. म्हणजेच, येथे ईश्वराला स्थानच नाही. ना सृष्टीकर्ता, ना नियंता, ना कृपादाता. मग जर जैन धर्म ईश्वर नाकारतो, तर जैन मंदिरांमध्ये “देव” कोण आहेत? आणि त्या देवांची पूजा का केली जाते? जैन तत्त्वज्ञानात “देव” ही संज्ञा सृष्टीकर्त्यासाठी नसून ती ‘तीर्थंकर’ किंवा ‘अरिहंत’ यांच्यासाठी वापरली जाते. महावीरांसारख्या महापुरुषांनी कठोर तपस्येतून आत्मज्ञान प्राप्त केले, ते कर्मबंधनातून पूर्णपणे मुक्त झाले आणि त्यांनी मोक्ष मिळवला; म्हणूनच ते पूजनीय ठरले. परंतु, या पूजनीयतेचा अर्थ स्पष्ट आहे: ते कोणालाही भौतिक मदत करत नाहीत, कोणाचे नशीब बदलत नाहीत किंवा कोणाला आशीर्वादही देत नाहीत. ते केवळ एक 'आदर्श' आहेत. “तुमच्यातही सिद्ध होण्याची क्षमता आहे, असे व्हा” असा मार्ग दाखवणारे ते दीपस्तंभ आहेत. इथपर्यंत सर्व काही तर्कसुसंगत वाटते. मात्र, प्रत्यक्ष व्यवहारात जे घडते, ते या मूळ तत्त्वज्ञानाच्या पूर्णतः विरोधात जाणारे आहे. आज जैन मंदिरांमध्ये भक्त आरती करतात, अभिषेक करतात, नवस बोलतात आणि देवाकडे विविध मागण्या करतात. अनेकजण व्यवसायातील यश, आजारातून मुक्ती (आपल्या मुंबईच्या नवीन महापौर डॉक्टर ऐवजी जैन मुनी कडे जातात उपचारासाठी) किंवा संकटातून सुटका व्हावी म्हणून तीर्थंकरांना साकडे घालतात. येथेच मोठा पेच निर्माण होतो: जिथे तत्त्वज्ञान सांगते, “कोणीही तुमचे नशीब बदलू शकत नाही,” तिथे आचरण म्हणते, “देव माझे नशीब बदलेल.” हा केवळ विरोधाभास नसून, तत्त्वज्ञानाचा झालेला स्पष्ट पराभव आहे. हा विरोधाभास मानवी मानसिकतेतून निर्माण होतो. माणसाला अनिश्चिततेची भीती वाटते; त्याला सदैव कोणातरी शक्तीवर अवलंबून राहायचे असते. जीवनाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेण्यापेक्षा ती एखाद्या अदृश्य शक्तीवर ढकलणे त्याला अधिक सोपे वाटते. याच मानसिकतेतून “देव” जन्माला येतो, मग तत्त्वज्ञान त्याला नाकारत असले तरीही! याचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे परंपरा. भारतीय समाजात देवपूजा, विधी आणि कर्मकांड यांच्या मुळा इतक्या खोलवर रुजल्या आहेत की, कोणताही धर्म या प्रभावापासून पूर्णपणे मुक्त राहू शकलेला नाही. दुर्दैवाने, जैन धर्मही त्याला अपवाद ठरलेला नाही. (लेख महाराष्ट्र Atheist च्या FB Post वरील आहे)



















