Prashant Bhosale
1.6K posts


फडणवीस साहेब,वैद्यकीय शिक्षण विभागाने मागील 3 वर्षात मराठा तरुणाना पंजाबराव देशमुख निर्वाह भता शिष्यवृती योजनेचा लाभ दिलेला नाही.आपण विधी मंडळात मात्र 94% लोकानी शिष्यवृती घेतली म्हणत आहात.यामुळे तुम्ही खोट बोलताय की तुम्हाला खोटी माहिती दिली गेली आहे एकदा तपासावे
@Dev_Fadnavis
MR

MBBS शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना मागील 3 वर्ष पंजाबराव देशमुख शिष्यवृती योजनेचा वस्तिगृह भता मिळालेले नाही,अनेक निवेदन देऊन देखील हसन मुश्रीफ यांच्याकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष.
@HasanMushrif

MR
Prashant Bhosale retweetledi

गडकरींच्या मागे उभा असलेला माणूस नीट पहा. हा माणूस म्हणजे अतुल शिरोडकर, हा गडकरींचा व्यवसिक मित्र.
सगळेच्या सगळे कायदे धाब्यावर बसवून, ACS वळसा नायर व ACS असीम गुप्ता ह्यांना गडकरींनी थेट फोन करून, मित्राला ४ एकर भांडुप मधली जमीन, केवळ ८९ लाखात मिळवून दिली. ह्या दोन्ही अधिकाऱ्यांना पूर्ण कल्पना आहे की आपण जे करतोय ते चुकीचे आहे, पण त्यांच्यात हिंमत नाही कायद्याने काम करायची.
८९ लाखात भांडुप मधे आता 2BHK चे घर पण येत नाही. पण गडकरींच्या मित्राला १००० कोटीचा प्रोजेक्ट मिळाला.
आता SRA हा आता फक्त राजकारण्यांचा अड्डा कसा झाला आहे ते ऐका.
साईनगर भांडुप ही ६६० घरांची वस्ती. अतिशय स्वच्छ चाळी. १९९१-९२ मधे ह्या २०० ते २५० फुटाची घरं एका जमीन मालकाने बांधली आणि, घर व त्या खालची जमीन ही ६६० कुटुंबांना विकली. तुम्ही सोसाइटी झाली की मी conveyance करेन असे मालकाने सांगितले. सुखाने ही माणसे राहत होती.
२००७ मधे ह्याच मालकाने हीच जमीन अतुल शिरोडकर या इसमाला २ कोटी रुपयाला विकली. २ कोटी पैकी फक्त ८९ लाख त्या शिरोडकरने दिले. पण पैसे मिळतीलच असे समजून त्या मालकाने conveyance शिरोडकरच्या नावाने केले.
२००९ मधे ह्या लोकांना कळले तेव्हा त्यांनी कोर्टात धाव घेतली. पण गडकरी ह्या शिरोडकर चे मित्र, त्यात आमदार सुनील राऊत मित्र मग काय विचारा.
सर्व्हे ला ६६० पैकी ३०० घरं बंद दाखवली, खोटी consent दाखवली, खोटे कागदपत्र केले. Annexure I, Annexure II आणि Annexure III, तिन्ही बनावट. ना plan धड ना शिरोडकरांची आर्थिक स्थिती धड.
सुनावणी घेणारे AGRC खरतर ५ लोकांचे असते. न्याय व्हावा म्हणून. आमच्या केस मधे ५ पैकी ३ जण नव्हते, असीम गुप्तांनी आमच्या विरोधात निर्णय दिला, पण अश्विनी जोशी ह्यांनी डिस्सेंट ऑर्डर दिली. पण तरीही ४ जणांचा निर्णय एकतर्फी आहे असे खोटे दाखवून, ३३/३८ ची नोटिस काढली
मी ह्यात कधी आले ……
एप्रिल २०२४ पासून मी ह्या लढ्याला सुरुवात केली.
ह्यांना न्याय मिळावा म्हणून, माझा स्वाभिमान बाजूला ठेऊन, ह्याच वर्षी एप्रिलमध्ये, मी दिल्ली ला जाऊन गडकरींचे भेट घेतली , तेव्हा योगायोगाने संजय दिना पाटील पण भेटले. ते देखील माझ्या बरोबर आले. पण काहीही झालं नाही.
मुंबईत मी सुनील राऊतांशी दोनदा बोलले, संजय राऊतांची सामन्याच्या ऑफिस मधे जाऊन भेट घेतली. सगळ्यांकडे न्यायाची भीक मागितली. पण काही झाले नाही. १०० वेळा फडणवीसांना विनंती केली… एकनाथ शिंदेंना भेटेल. तेही वळसा नायर ह्यांच्याशी बोलले. आशिष शेलार ह्यांना भेटलो. त्यांनी असीम गुप्ता यांना फोन केला.
AGRC मधे स्वतः appear होऊन, जीव तोडून लढले. पण…..
११ सप्टेंबर ला गडकरी जिंकले, सगळे राजकारणी जिंकले आणि सामान्य माणूस हरला.
ही माणसे अतिक्रमण करून घुसखोरी करणारी नव्हती, ही घरं त्यांची स्वतःची होती. त्यांनी SRA च्या कडीपेट्यांच्या घरात का रहावं?
आता ३ ऑक्टोबर ला ह्याच्या घराचे फोर्स्फुल demolition केले जाणार आहे. आम्ही आज न्यायासाठी हाई कोर्टात पेटिशन दाखल केले आहे.
आता कोर्ट न्याय करेल नाहीतर परमेश्वर न्याय करेल. ह्यांच्या कर्मांची फळं ह्यांना ह्याच जन्मी भोगावी लागतील.


MR

मनोज जरांगे आणखी एक अण्णा हजारे ठरू नयेत!
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, पण त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणं कठीण आहे…
कारण त्यांचा पॅटर्न स्पष्ट आहे, जेव्हा जेव्हा विरोधक सरकारला मोठ्या मुद्द्यांवर कोंडीत पकडतात, जसं की सद्यस्थितीत महाराष्ट्रातील वोट चोरी प्रकरण, नेमकं तेव्हाच ते अचानक समोर येतात आणि संपूर्ण चर्चेचं लक्ष वळवतात…
आत्तापर्यंत शांत होते, पण सरकारवर वोट चोरीची टीका व्हायला लागली, तशीच त्यांनी उडी मारली!
हे आम्हाला कळत नाही का?
खरं तर आरक्षणासाठीची खरी लढाई सर्वोच्च न्यायालयात लढली गेली पाहिजे. यासाठी असा नेता हवा, जो जबाबदार, सुज्ञ आणि दूरदृष्टी असलेला असेल, आणि जो या मागणीचं विश्वासार्ह नेतृत्व करू शकेल…
आणि नक्कीच असा कुणी नको, जो प्रत्येक निर्णायक क्षणी लढाईत भरकटतो!
#VoteChori #MarathaReservation #Maharashtra

MR

ओबीसीना मंत्रालय देणारे लोक,
मराठा आरक्षण उपसमिती देखील स्थापन करायला टाळाटाळ करत आहेत.सरकार स्थापन होऊन 7 महीने झाले तरी सरकारने समिती स्थापन केलेली नाही.
@Dev_Fadnavis @mieknathshinde
@AjitPawarSpeaks

MR
Prashant Bhosale retweetledi

🔴 BREAKING!
New inscription on the @UNESCO #WorldHeritage List: Maratha Military Landscapes of India, #India 🇮🇳.
➡️ unes.co/47whc #47WHC

English

@nishikant_dubey @nishikant_dubey बेटा पैदाशी बेवकूफ हो की गुज्जु बाबा को खुश करने के लिये अभी अभी बने हो ?
हिन्दी

मुम्बई में शिवसेना उद्धव,मनसे राज ठाकरे और एनसीपी पवार साहब में और कश्मीर से कश्मीरी हिंदुओं को भगाने वाले सलाउद्दीन,मौलाना मसूद अज़हर तथा मुम्बई में हिंदुओं के उपर अत्याचार करने वाले दाउद इब्राहिम में क्या फर्क है? एक ने हिंदू होने के नाते अत्याचार किया दूसरे हिंदी के कारण अत्याचार कर रहे हैं?
हिन्दी

@nishikant_dubey @RajThackeray @OfficeofUT @ShivSenaUBT_ हे सांगायला तुला मराठी लिहावे लागले बावळट यातच सगळे आल आणि तू कुत्रा आहेस का तिकडे बोलवायला ?
MR

"हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा."@RajThackeray @OfficeofUT @ShivSenaUBT_
MR

@Shivsenaofc मोहमद आली जिना गुजराती होता म्हणून त्यांचे बैनर लावयला सुरवात करू नका
MR

गुजरात पाकिस्तान आहे का ?
सप्रेम जय महाराष्ट्र !
पुण्यातील गुजराती बांधवांच्या एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे साहेब ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ या घोषणेपाठोपाठ ‘जय गुजरात’ असेही म्हणालो. त्या मुद्द्यावर बरीच कोल्हेकुई चालू आहे. अस्तित्वातच नसलेल्या मुद्द्यावर गुद्दे मारण्याचा हा उद्योग आहे.
‘जय गुजरात’ ही घोषणा नसून पुण्याच्या उत्साही, सकारात्मक आणि उद्यमशील गुजराती बांधवांच्या कर्तृत्वाला दिलेली दाद होती. त्याकडे तशाच नजरेने पाहायला हवे. गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे, हे विरोधकांनी आधी लक्षात घ्यावे. ‘जय गुजरात’ म्हटल्यानंतर ज्यांना एवढा राग येतो, त्यांच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले तेव्हा त्यांचा राग कुठे गेला होता ?
आज या मुद्यावरून जे टीका करत आहेत, त्यांच्या नेत्यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’ अशी घोषणा यापूर्वी दिलेली आहे. निवडणुकांच्या तोंडावर ‘केम छो वरळी’ ही होर्डिंग्ज लावणारे कोण होते ? ‘जलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी प्रसिद्धिपत्रके पक्षाच्या अधिकृत सोशल मीडियावरून प्रसिद्ध करणारे कोण होते ? त्यांनी गुजराती समाजाची मते मिळवण्यासाठी हे सगळे उद्योग केले. परंतु, आम्ही गुजरातला जन्मभूमी आणि महाराष्ट्राला कर्मभूमी मानून राज्याच्या विकासात योगदान देणाऱ्या गुजराती बांधवांची प्रशंसा केली. त्यात कुठलेही राजकारण नव्हते.
गुजराती बांधवांचे कौतुक करणाऱ्यालाही विरोध करणाऱ्या, या विघ्नसंतोषी आणि स्वार्थी राजकारणाचा धिक्कार करावा तितका थोडाच आहे. थोडा तरी उमदेपणा कुणाकडून तरी उसना घ्यावा, असा आमचा विरोधकांना सल्ला आहे. पण जिथे-तिथे राजकारण कालवण्यात धन्यता मानणाऱ्या विरोधकांना कोण समजावणार ? त्यांच्याकडे कोणतेही ठोस मुद्दे उरले नाहीत, कार्यकर्ते नाहीत, पक्षही संपत चालल्यामुळे पराचा कावळा करण्याचा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही गुजराती बांधवांचा द्वेष केला नाही की त्यांना आपले शत्रू मानले नाही. जो देशाशी किंवा महाराष्ट्राशी द्रोह करतो, तो शिवसेनेचा शत्रू. मग तो कोणत्याही प्रांताचा, धर्माचा किंवा जातीचा असो. पुण्यातील गुजराती समाजाने व्यापारात योगदान दिले आहे. तेथे कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले गुजरात भवन, जयराज क्रीडा संकुल हे पुण्याच्याच लौकिकात भर घालणारे आहेत. पुण्यातच कशाला, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गुजराती समाज पसरला आहे आणि आपल्या स्वभावधर्माला जागून त्यांनी व्यापारधर्म वाढवून राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीला हातभार लावला हे वास्तव आहे.
हिंदुत्व आमचा प्राण आहे आणि मराठी आमचा श्वास आहे, हे मी वारंवार सांगितले आहे. आमची नाळ ही मराठी माणसाशी जोडलेली आहे. ती कुणी कितीही प्रयत्न केला तरी ती तुटणार नाही. आम्ही स्वकर्तृत्वावर निवडणूका जिंकू शकतो. त्यासाठी अशा मुद्यांचं राजकारण करण्याची गरज आम्हाला नाही.
गुजरात हा भारताचाच अविभाज्य भाग आहे. गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे. मतांच्या ध्रुवीकरणासाठी गुजराती बांधवांना दुय्यम नागरिक ठरवण्याचे विष सध्या कालवले जात आहे. त्यापासून सर्वांनीच सावध राहिले पाहिजे. यामुळे महाराष्ट्राचीच प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर मलिन होते, याचे भान विरोधकांनी ठेवायला हवे.
जय हिंद, जय महाराष्ट्र
#Shivsena #Eknathshinde #Maharashtra
MR
Prashant Bhosale retweetledi

इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे.
पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल २०२५ पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेंव्हापासून हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायच्या ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे.
अजून एक गोष्ट, सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतू हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत ! ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी ! ! !
हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी.
आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा. तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषेत शिकले, वाढले, जी भाषा त्यांची ओळख आहे त्याच्याशी काही देणंघेणं नाहीये... त्यांना कोणालातरी खुश करायचं आहे बहुदा. यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे.
असो, पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे. हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे, आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा.
मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन.
राज ठाकरे ।
MR









