राज | Raj

9.3K posts

राज | Raj banner
राज | Raj

राज | Raj

@MarathiPremi

नास्तिक. मराठी शाळा. बेळगाव सीमाप्रश्न. प्रबोधनकार / तुकाराम. || जय भीम, जय शिवाजी, जय मराठी ||

संयुक्त महाराष्ट्र Katılım Mart 2019
1.1K Takip Edilen2.1K Takipçiler
राज | Raj retweetledi
राष्ट्रभाषा | National Language
एका मराठी महिलेचा अधिकार हिरावून आदित्य ठाकरेंनी परप्रांतीय चतुर्वेदीबाईला राज्यसभा दिली तेव्हाच शिवसैनिकांनी टोकाचा विरोध केला असता तर कदाचित शिवसैनिकांना भाजपच्या अंधभक्तांप्रमाणे गृहीत धरले गेले नसते. गृहीत धरण्यामागे कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या चुका असतात. #मराठीप्रथम
राष्ट्रभाषा | National Language tweet media
MR
8
33
222
10.2K
राज | Raj
राज | Raj@MarathiPremi·
अशोक खरात १५०-२०० वर्षांपूर्वी हयात असता तर तो पकडलाच गेला नसता. उलट त्याचा आता देव झाला असता. त्याच्या नावापुढे स्वामी, बाबा, महाराज वगैरे उपाधी लागली असती. त्याचा प्रकट दिन मोठ्या उत्साहाने साजरा झाला असता आणि समाधी दिन कडक उपवास ठेऊन पाळला गेला असता. त्याच्या भक्तांनी ठिकठिकाणी त्याचे मठ-मंदिर स्थापन केले असते. त्याचं भंपक गुणगान सांगणाऱ्या भाकड-माकड आरत्या रचल्या गेल्या असत्या. त्याच्या तथाकथित चमत्कारांवर आधारित अनेक काल्पनिक पोथ्या रचल्या गेल्या असत्या. त्याचं वास्तव्य असणाऱ्या गावात भलं मोठं दरबार वरकरणी भक्त वाटणारे पण प्रत्यक्षात संधीसाधू दलालांनी उभं केलं असतं. मग त्या दरबाराच्या ट्रस्टिनी स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी शक्कल लढवून खरात बाबाची जाहिरात करण्यासाठी २-३ चित्रपटांना फंडिंग केलं असतं. चित्रपट पाहून दरबाराकडे लोकांची पावलं वळू लागली की मग TV serial सुद्धा सुरू झाली असती. बाबाची भूमिका करणारा serial मध्ये फक्त चड्डीत दिसला, तरी लोकांनी त्यावर हरकत घेतली नसती. सहकुटुंब ते भक्तिमय वातावरणात चवीने पाहिलं असतं. मुंबईसारख्या शहरातील तरुणांना बधिर करण्याच्या उद्देशाने त्यांना एकत्रित करून राजकारण्यांनी गल्लोगल्ली खरात सेवा मंडळ वगैरे संस्था स्थापन केल्या असत्या. या मंडळातील तरुणांनी मुंबई ते नाशिक खरात बाबांचा चक्क टेबलच खांद्यावर घेऊन पायी प्रवास केला असता. अर्थात त्या तरुणांचा हेतू प्रामाणिक, खरात बाबांची सेवा. त्या खरात बाबांचं एखादं फेमस वाक्य असतं. उदाहरणार्थ : घराघरात फक्त खरात. मग भक्तांनी अभिमानाने घराबाहेर पाट्या लावल्या असत्या. "या घरात खरातांचा 'वास' आहे". भक्त मंडळींनी दिलेल्या देणग्यांचा कोणी हिशोब विचारू नये, संशय घेऊ नये, म्हणून ट्रस्टिनी एखाद दुसरं हॉस्पिटल किंवा शाळा वगैरे काढली असती. (सिगारेट कंपन्यांनी side business म्हणून कॅन्सर हॉस्पिटल काढावं तसं) बरं या खरात बाबांवर आजच्या काळात कोणी टीका केली असती, तर मात्र बाबांच्या भक्तांनी त्याला हिंदुत्वाचा अपमान वगैरे ठरवून जीवे मारण्याची धमकी, मारहाण किंवा तोंडाला काळं फासणं वगैरे प्रकार केले असते. सरकारने तीर्थक्षेत्र विकास योजना सुरू करून खरात बाबाचं गाव चकचकीत करून टाकलं असतं. रेल्वेला स्टॉप, जवळच विमानतळ, गावात हेलिपॅड, थेट बससेवा. भक्तांनी याचं श्रेय सुद्धा खरात बाबाला दिलं असतं. गावातल्या गरीब लोकांनी बाबांच्या भव्य दरबाराच्या बाहेर चिंचोके विकण्याचे धंदे सुरू केले असते. बाबांना म्हणे चिंचोके आवडायचे. त्याच्या जप माळा, लॉकेट, ब्रेस्लेट, टॅटू सगळं जागच्याजागी. घराघरात मुल जन्माला आल्यावर अक्कल येण्यापूर्वीच बाळाला खरातच्या फोटो समोर उभं करून हात जोडायला लाऊन "नमो-नमो कर" म्हणून शिकवलं असतं. या प्रकाराला ते ब्रेनवॉशिंग न म्हणता संस्कार करणे म्हणाले असते. सकाळ संध्याकाळ लोकांनी एकमेकांना खरात बाबाचे फोटो व्हॉट्सअँपवर फॉरवर्ड करत 'श्री खरात स्वामीय नमः' चा अखंड ऑनलाइन जप सुरू ठेवला असता. असो, खरातचं दुर्दैव की तो पकडला गेला. आता आपल्या अवतीभोवती हा खरात टेम्प्लेट वापरणारे ढोंगी कोणी आहेत का, हे नीट पहायला हवं. खरात पॅटर्न वापरून देव्हाऱ्यात कोणी बाबा, स्वामी, महाराज वगैरे चिकटला नाही ना ? असेल तर असल्यांचे फोटो, मुर्त्या सरळ कचऱ्यात फेकून द्यायला हवे. फक्त स्वतःची सुटका करून उपयोग नाही. आपले मित्र मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी इत्यादी सर्वांना याबाबत जागृत करायला हवं.
राज | Raj tweet media
MR
1
4
9
210
राज | Raj retweetledi
नेत्वा धुरी NETWA DHURI
शिवसैनिकांच्या संतापाचे मूळ हे आदित्य ठाकरेंच्या वाढत्या 'कॉस्मोपॉलिटन' प्रतिमेत आणि शिवसेनेच्या मूळ 'लढाऊ' बाण्यात होणाऱ्या विसंगतीत आहे. कार्यकर्त्याला 'मैत्री' पेक्षा 'लढा' महत्त्वाचा वाटतो. 'दिवसा टीका आणि रात्री मैत्री' या आरोपामुळे शिवसेनेच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण होतो, जो आगामी निवडणुकांच्या दृष्टीने घातक ठरू शकतो. #AdityaThackarey #MohitKambhoj #BMC
MR
17
17
182
7.8K
राज | Raj
राज | Raj@MarathiPremi·
धर्मांध हा धर्मांधच असतो ! तो 'हिंदू' किंवा 'मुसलमान' असल्याचं फक्त ढोंग करत असतो.
MR
0
4
16
170
राज | Raj
राज | Raj@MarathiPremi·
झारखंडमधील हिंदुत्ववादी कार्यकर्ते रामनवमी निमित्त हिंदूधर्माची उपासना करतानाचा हा व्हिडीओ. महाराष्ट्रातल्या मराठी भय्यांना भारतात लोकशाही ऐवजी धर्मावर आधारित हिंदूराष्ट्र हवं आहे. पण हिंदूराष्ट्र म्हणजे नेमकं काय? हे त्यांना अजूनही धड सांगता येत नाही. उत्तरभारतीय प्रतिगामीपणा म्हणजे हिंदुत्व असा समज इथल्या संघभाजप समर्थक मराठी भय्यांचा झाला आहे. महाराष्ट्राची पुरोगामी संत परंपरा, समाज सुधारणेची चळवळ कुचकामी ठरवून उत्तरभारीतय गोंगाटाला आदर्श 'हिंदू' समजत ते अंगिकारण्याची त्यांची धडपड सातत्याने दिसून येते. हा एकूण प्रकार मराठी माणसाच्या अस्तित्वाच्याही विरोधात आहे, याचं देखील भान मराठी भय्यांना राहिलेलं नाही. #महाराष्ट्रधर्म
Manish RJ@mrjethwani__

Saar weapons are for our safety saar. Hindu khatre mein hai saar…🤡

MR
1
17
47
1.3K
राज | Raj
राज | Raj@MarathiPremi·
संघ-भाजप पुरस्कृत हिंदी-हिंदू-हिंदुस्थानचा नॅरेटीव्ह पुरून उरण्याची ताकद महाराष्ट्रधर्मात आहे. या महाराष्ट्रधर्माची नीट मांडणी मराठी अभ्यास केंद्राने इथे केली आहे. हे आवर्जून वाचा. यामध्ये आलेला प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. 🧡 जय मराठी, जय महाराष्ट्र ! #महाराष्ट्रधर्म #मराठीप्रथम
मराठी अभ्यास केंद्र@AbhyasKendra

महाराष्ट्रधर्म म्हणजे काय ? "मराठी भाषा आणि महाराष्ट्रहित ज्याच्या केंद्रस्थानी आहे, ग्यानबातुकोबादींचा ज्याला सांस्कृतिक वारसा आहे, शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचा पुरोगामी विचार हा ज्याचा पाया आहे, जातिधर्माच्या भेदभाववादी, वर्चस्ववादी आचरणाला ज्याचा विरोध आहे आणि 'धर्म-पंथ-जात एक मानतो मराठी' ही ज्याच्या अनुयायांची भाषिक ओळख आहे असा लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्षतावादी, जातिअंतवादी, पर्यावरणस्नेही, वैज्ञानिक जाणिवेचा धर्म म्हणजे महाराष्ट्रधर्म." महाराष्ट्रधर्म हा उपासनाधर्म नाही, प्रादेशिक समाजधर्म आहे. विशिष्ट समाजाची वैशिष्ट्यपूर्ण भाषिक , सांस्कृतिक ओळख अधोरेखित करणारा आचरणधर्म आहे. राष्ट्रीयत्वाबरोबर वैश्विकतेचे भान असलेला स्थानिक जीवनधर्म आहे. जीवनाची अनन्यता, बहुविधता जपत एकतेचा संदेश देणारा प्रदेशधर्म आहे. #मराठीकारण #महाराष्ट्रधर्म #मराठीप्रथम

MR
2
10
42
717
राज | Raj
राज | Raj@MarathiPremi·
कबुतरांशी अनैसर्गिग संबंध ठेवणाऱ्यांच्यापाठीशी मेवाभाऊ ठामपणे उभे ! गुजराती जैनांच्या मतांसाठी कबुतरांना कुर्वाळणं गरजेचं. शिस्तबद्ध पद्धतीने कबुतरांना चणे घाला, म्हणजे ते शिस्तीत मुताऱ्यांमध्ये जाऊन शी-शु करतील आणि मानवी लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी पद्धतशीरपणे फुफुसाचे गंभीर आजारही पसरवतील. कृपया यावर कोणीही राजकारण करू नये, ही कबुतरबाजी म्हणजे गुजराती जैनांची अभिजात परंपरा आहे.
राज | Raj tweet media
MR
11
65
228
6.8K
राज | Raj retweetledi
Dr. Deepak Pawar दीपक पवार
नमस्कार, राजकारण करणाऱ्यांना दलाल अवतीभोवती लागतातच. काही वर्षांपूर्वीपर्यंत एका पक्षाचे अंतर्गत संबंध बरे करून देणारे दलाल होते. मधल्या काळात अनेक पक्षांच्या प्रमुख नेत्यांचं एकमेकांशी जुळवून देणं किंवा बिघडवणं यासाठी कामं करणारे, भरगच्च श्रीमंत दलाल निर्माण झाले. त्यातलं कुणी सिनेमा उद्योगात आहे तर कुणी क्रिकेट बोर्डात आहे. तालुक्यापासून शहरातल्या सप्ततारांकित हॉटेलांपर्यंत सर्व ठिकाणी दलालांची चंगळ झाली आहे. जागतिकीकरणोत्तर काळामध्ये ‘दलाल’ हा शब्द पुरेसा सन्मानजनक वाटत नसल्यामुळे त्याची नावं बदलत गेली. हा परिभाषेचा विस्तार आहे. अशा दलालांच्या मदतीशिवाय राजकारणाच्या शिड्या चढणं अशक्य आहे का, किंवा त्यांच्या मदतीने पटापट शिड्या चढून गेल्यामुळे अत्यंत लाभ व्हावा तसं काहीतरी घबाड सापडतं का, हा खरंतर शोधपत्रकारितेचा आणि संशोधकांच्या अभ्यासाचा विषय आहे. पण बहुतांश पत्रकारांनी स्वेच्छेने तलवारी म्यान केल्या आहेत. जे अजूनही तगून आहेत त्यांच्यावर अस्तित्वाची टांगती तलवार आहे. ज्यांनी जनमत उभं करायचं ते लेखक, कवी, प्राध्यापक, कलावंत — काही सन्मानजनक अपवाद वगळता — मुजरे घालण्यात दंग आहेत. अशा परिस्थितीत ‘मतभेद हवेत, मनभेद नको’, ‘राजकारणापलीकडे एकमेकांशी चांगले संबंध ठेवणे हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे’ अशा भूलथापा मारून लोक राजकारण करतात आणि यूपी-बिहार किंवा दक्षिण भारतातल्या राजकारणापेक्षा आमची राजकीय पक्षसंस्कृती उजवी आहे, अशी टिमकी वाजवतात. तेव्हा यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे सहज कळून येतं. कालचं मोहित कंबोज आणि ठाकरे यांच्यातील मनोमिलन म्हणजे ज्या शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी आपल्या पक्षाच्या नेत्याच्या प्रेमापोटी मोहित कंबोजला अंगावर घेतलं, त्याची दलालखोरी उघडी पाडली,त्या सगळ्यांच्या सामूहिक थोबाडीत लगावण्याचं पुण्यकर्म ठाकरे बंधूंनी पार पाडलं आहे. फडणवीस, शेलार, लालबागचा अंबानी, शाहरुख यांची आपापली कारणं असतील; पण ज्या माणसाने मराठी माणसांचा पक्ष फोडला, त्यासाठी आमदारांच्या खरेदी-विक्रीपासून सगळे धंदे केले, त्याच्या मुलीच्या सोळाव्या वाढदिवसाला जाण्यासारखं असं ठाकरे बंधूंचं काय अडलं होतं? या बाबतीत व्यावसायिक हितसंबंध, तथाकथित चांगुलपणा किंवा वाढदिवसाच्या आड फडणवीसांशी होणारं गुफ्तगू— यांपैकी कुठलंही कारण असलं तरी ते बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष उभा फोडण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं होतं का? या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये काही लिंक्स दिल्या आहेत; त्यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्याबद्दल कंबोजने जी गरळ ओकली त्याचा तपशील आहे. आपला किंवा आपल्या पक्षाचा, सरकारचा अपमान इतक्या पटकन विसरण्याइतपत ठाकरे मंडळींना स्मृतिभ्रंश झाला आहे का? ज्या संजय राऊतांनी प्रतिकूल परिस्थितीत पक्षाची खिंड लढवली, त्यांच्याशी घृणास्पद बोलणाऱ्या माणसाशी तुम्ही दोस्ती करता आणि दुसरीकडे दोन भावांना एकत्र आणण्याच्या कार्यक्रमात राऊतांना मध्ये बसवून घेता, म्हणजे तुमच्या बोलण्यात बोलणं नाही असा त्याचा अर्थ आहे. आता याबद्दल आदित्य ठाकरे स्पष्टीकरणार्थ तर राज ठाकरे त्यांच्या नेहमीच्या उपहासात्मक शैलीत बोलतीलच; पण त्यातून काय साध्य होईल? तुम्ही महाराष्ट्रधर्म पायदळी तुडवणाऱ्याला मिठी मारायला उत्सुक आहात, एवढाच संदेश त्यातून जातो. असे अर्धवट स्वाभिमानी प्रादेशिक पक्ष महाराष्ट्राच्या काय उपयोगाचे आहेत? अजित पवारांच्या मृत्यूपूर्वी काही महिने आणि मृत्यूनंतरही दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येणार का, याची चर्चा सुरू होती आणि आहे. थोरल्या पवारांनी महाविकास आघाडीला आकार दिल्यामुळे आणि दादा आणि त्यांच्या चौकडीने विकासासाठी धर्मांतर केलं तरी, तांत्रिकदृष्ट्या अजूनतरी पवार साहेबांचा पक्ष मविआमध्ये असल्यामुळे त्या पक्षाची पुरेशी नाचक्की झालेली नाही. पण ‘आमचा पक्ष हेच कुटुंब आहे’ असं सुप्रिया सुळे यांनी एकीकडे म्हणायचं आणि दुसरीकडे पक्ष कुटुंबाच्या मालकीचा असल्यासारखं वागायचं — या घोळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या प्रामाणिक आणि बुद्धिमान कार्यकर्त्यांची फरफट झाली आहे. विलीनीकरण होईल न होईल, राष्ट्रवादीतील दोन्ही गट म्हणजे सत्तेवर मांड ठोकून बसलेले किंवा मांड ठोकायला उत्सुक असलेल्या सरंजामदारांचे समूह —यापलीकडे या दोन गटांना फार अर्थ नाही. त्यामुळे पवार साहेबांनंतर यातले बहुतांश लोक रानोमाळ पसरणार आहेत. दोन्ही ठाकरेंकडे असलेली कार्यकर्त्यांची फळी तुलनेने उजवी आहे.त्यांच्यातही शहरी आणि निमशहरी दलालांचा शिरकाव झालाच आहे. अशा परिस्थितीत आपल्या केडरचा आत्मसन्मान ढळणार नाही, याचं भान नेतृत्वाने ठेवलं पाहिजे. मोहित कंबोजबरोबरचं स्नेहसंमेलन हे त्याच्या उलट दिशेने जाणारं आत्मघातकी पाऊल आहे.
Dr. Deepak Pawar दीपक पवार tweet mediaDr. Deepak Pawar दीपक पवार tweet mediaDr. Deepak Pawar दीपक पवार tweet mediaDr. Deepak Pawar दीपक पवार tweet media
MR
30
179
738
42.1K
राज | Raj retweetledi
Dr. Deepak Pawar दीपक पवार
उर्वरित हिंदुत्वासाठी महाराष्ट्रधर्म सोडून असंगाशी संग केल्यामुळे सत्ता आणि मराठी समाजाचा विश्वास दोन्ही गमावल्यानंतर पुन्हा त्याच मार्गाने जायचं असेल तर दोन्ही सेनांना कोणीही वाचवू शकणार नाही. हिंदुत्व आणि महाराष्ट्रधर्म या दोन्ही परस्परविरोधी गोष्टी आहेत आणि यापुढे यातलं एकच काय ते निवडावं लागेल याचं भान ठाकरे मंडळींना जितक्या लवकर येईल तेवढं बरं. कारण मराठी समाज आणि हिंदू समाज असं दोन डगरींवरचं संधीसाधू राजकारण संघभाजपाच्या उघड उघड महाराष्ट्रद्रोही राजकारणाइतकंच महाराष्ट्रद्रोही आहे. अशा परिस्थितीत काय होऊ शकतं? सगळ्यांचीच भाजपशी दोस्ती झाल्यामुळे सगळेच लाभार्थी योजनेचा भाग होतील आणि सुखाने नांदू लागतील. मराठीकारण आणि महाराष्ट्रधर्म या गोष्टी महाराष्ट्रदिनाला बोलण्याइतपत दुर्मीळ होऊन बसतील. आणि मग महाराष्ट्राचं द्विभाजन, त्रिभाजन झालं तरी आपले हितसंबंध सांभाळण्यात गुंग असलेल्या लोकांकडून लुटुपुटूचा विरोध होईलही; पण संघ-भाजपच्या दडपशाहीला तो विरोध नेस्तनाबूत करणं अत्यंत सोपं जाईल. आपण एवढंच करू शकतो — आपण संघाच्या नॅरेटिव्हचा भाग नाही, हे छातीठोकपणे सांगू शकतो. कोणीही कंबोज-किरीट सोमय्या यांच्याशी स्नेहभोजन घेतलं तरी कंबोज आणि किरीट हे महाराष्ट्रद्रोही दलालच आहेत, या आपल्या भूमिकेवर ठाम राहू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रस्थापितांचे गड कोसळत असताना त्यांच्या डागडुजीत मदत करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा महाराष्ट्रधर्मावर आधारित समकालीन सांस्कृतिक राजकारण उभं करू शकतो. यांच्या नादाला लागून वैफल्यग्रस्त होण्यापेक्षा ते उत्तम आहे. निर्णय आपणच घ्यायचा आहे— आणि तो लवकर घ्यावा लागणार आहे. धन्यवाद! जय मराठी! जय महाराष्ट्र !
MR
6
47
212
4.2K
राज | Raj
राज | Raj@MarathiPremi·
@IndoSpecific मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात उपलब्ध आहे.
MR
0
0
1
10
Indo Specific
Indo Specific@IndoSpecific·
@MarathiPremi हे पुस्तक कुठे मिळेल? ऑनलाईन कुठेही उपलब्ध दिसत नाही.
MR
1
0
0
14
राज | Raj
राज | Raj@MarathiPremi·
देशाच्या स्वातंत्र्यासाठी मराठी माणूस लढत होता, समाज सुधारणेसाठी झटत होता तेव्हा बहुतांश गुजर काय करत होते ? दलाली करण्याची संधी मिळावी यासाठी गव्हर्नर जेराल्ड अँजियर याच्याकडे कोण भिका मागत होतं ? सुरतेच्या इंग्रजी वकिलाकडे, मुंबईत वसवण्यासाठी आणि मुंबईत वसवल्यावर विशेष सवलती पदरात पाडून घेण्यासाठी इंग्रजांचे पाय कोणी धरले ? पारतंत्रात इंग्रजांची सेवा केली आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर मराठी माणसाला देशभक्ती शिकवण्याचा यांचा धंदा सुरू. काळ कोणताही असो, सर्व काळात हे लोक फक्त पैसा करण्याच्या कामात दंग होते.
राज | Raj tweet media
MR
3
24
73
1.6K
राज | Raj retweetledi
राज | Raj
राज | Raj@MarathiPremi·
सार्वजनिक ठिकाणी सातत्याने देवा-धर्माचा जप करणारेच जास्त हरामखोर कसे काय निघतात ?
MR
2
3
34
510
राज | Raj
राज | Raj@MarathiPremi·
कबुतरांसोबत अनैसर्गिक संबंध ठेवण्याच्या सवयीमुळे मुंबईतील गुजराथी-जैन आधीच बदनाम झालेत. सुज्ञ लोकांत त्यांची सर्वत्र छी-थू होत आहे. त्यात त्यांना हा जैन-मौलवी आयताच लाभल्याने ते अजूनच कोषात जाऊन राहू लागले आहेत. जैनांच्या या नव-मौलवींनी भविष्यात 'व्हेजिटेरियन तालिबान' किंवा तत्सम नावाची संघटना काढून देशाच्या एकमतेला सुरुंग लावण्याचा उघड संकल्प केला तर आश्चर्य वाटून घेऊन नका. हे सगळं गुजरातच्या देवाभाऊने घडवून आणलं आहे.
राज | Raj tweet media
MR
0
7
15
221
राज | Raj retweetledi
Namdev Katkar
Namdev Katkar@namdevwrites·
भूमिका कार्यकर्त्यांनी घ्यायची, डोकी कार्यकर्त्यांनी फोडून घ्यायची, घरदार पणाला कार्यकर्त्यांनी लावायची... आणि 'ठाकरी बाणा' केक खायला जाणार. @RajThackeray @AUThackeray
MR
22
125
966
15.4K
राज | Raj
राज | Raj@MarathiPremi·
राज ठाकरे त्यांच्या भाषणात बोलतात एकदा महाराष्ट्र हातात द्या, सुतासारखा सरळ करतो. कंबोजने या ठाकरेंनाच सरळ केलं. छे-छे... करून दाखवलं ! सेना-मनसे युती झाली ती कंबोजच्या पार्टीतला केक खाण्यासाठी. बेळगाव सीमाभात काय चाललंय, हिंदीसक्तीवर वरवरचं नाटकी आंदोलन, मराठी शाळांच्या प्रश्नावर तोंड बंद, मराठी तरुणांच्या रोजगारावर थंड, मराठी माणसाला मुंबईत घरं मिळण्याबद्दल एक शब्द नाही.
राज | Raj tweet media
MR
4
59
332
13.8K
राज | Raj retweetledi
विचारप्रवाह
ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यातील हवा काढून घेण्यापुरते मर्यादित आहेत. त्यांची भाषणे नीट पहा, कधीही मूळ मुद्दा मांडून प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने धोरणात्मक कृती लावून धरणार नाहीत. बेळगावप्रश्नी कर्नाटकची बाजू घेतली, तेंव्हापासून आजतागायत केवळ त्यांच्यावरच नव्हे, तर कोणत्याही राजकारण्यावर विश्वास राहीला नाही. तूर्तास दुसरा पर्याय नाही म्हणून आपले म्हणत तेव्हढ्यापुरते समर्थन द्यायचे!
वस्सकन् ओरडलास्की | 𑘪𑘭𑘿𑘭𑘎 𑘌𑘨𑘚𑘩𑘰𑘭𑘿𑘎𑘲@oradlaski

काय म्हणाव आता… 🤦🏼‍♂️ ह्यांच्याकडून अपेक्षा असतात आणि हीच लोकं माती खातात.. @RajThackeray

MR
1
13
76
2.6K