Things to do in Dombivli retweetledi

मध्य रेल्वे ही खरोखर 'मध्य रेल्वे' आहे की 'उत्तर भारतीय रेल्वे'?
रेल्वेच्या पक्षपाती धोरणामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात , विशेषतः कोकणी आणि मराठी माणसांमध्ये प्रचंड संताप आहे.
१५०० विशेष गाड्यांच्या घोषणेत महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले?
🚩 बिहारसाठी: ४५० गाड्या
🚩 उत्तर प्रदेशसाठी: ३३२ गाड्या
🚩 कोकणासाठी: फक्त ३६ गाड्या!
दादर - रत्नागिरी ही महत्त्वाची गाडी बंद केली?
या पक्षपातामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. आधीच हिंदी भाषेची सक्ती केल्यामुळे लोक नाराज होते, आता गाड्यांच्या बाबतीतही हाच भेदभाव होत आहे.
आज लोकसभेत शून्य प्रहरामध्ये (Zero Hour) रेल्वेकडून होणार्या ह्या पक्षपाताबद्दल आवाज उठवला.
उपस्थित केलेले मुख्य मुद्दे:
🚨सीएसएमटी-गोरखपूर रोज धावते, पण सीएसएमटी-मडगाव आठवड्यातून फक्त एकदाच का?
🚨कोकणवासीयांची महत्त्वाची दादर-रत्नागिरी गाडी बंद करून सरकारने काय साध्य केले?
🚨पुणे-नांदेड, नांदेड-हडपसर यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांची क्षमता का घटवली?
🚨ज्या कोकणवासीयांनी रेल्वेसाठी लढा दिला, त्यांच्यावरच हा अन्याय का?
ह्यामुळे माननीय रेल्वे मंत्र्यांकडे खालील मागण्या केल्या :
१. दादर-रत्नागिरी गाडी तात्काळ पुन्हा सुरू करा.
२. कोकणासाठी गाड्यांची संख्या वाढवा.
३. हडपसरला टर्मिनेट केलेल्या गाड्या पुन्हा पूर्ण क्षमतेने चालवा.
- खासदार अरविंद सावंत
नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
#ArvindSawant #LokSabha #ShivsenaUBT
@OfficeofUT @AUThackeray @ShivsenaUBTComm @ShivSenaUBT_
MR





