भिकु म्हात्रे 🔥 retweetledi
भिकु म्हात्रे 🔥
34.2K posts

भिकु म्हात्रे 🔥
@bhiku_007
#म #मराठी 🚩 👻 वैयक्तिक मत😎 वर्तमानात वावरणारा🙌 #बेळगाव_महाराष्ट्राचे... क्या आप भिकू म्हात्रे को जाणते हो...? #Parody 🇮🇳 🇭🇲
United Kingdom Katılım Ağustos 2020
844 Takip Edilen12.9K Takipçiler
भिकु म्हात्रे 🔥 retweetledi
भिकु म्हात्रे 🔥 retweetledi
भिकु म्हात्रे 🔥 retweetledi
भिकु म्हात्रे 🔥 retweetledi
भिकु म्हात्रे 🔥 retweetledi

जबरदस्त. शिवाजी महाराजांवर आत्ता पर्यंत बनलेला सगळ्यात भारी चित्रपट आहे.
कुठेही स्लो होऊन दिला नाहीये चित्रपट.
मनापासून बनवला आहे हे दिसून येतंय.
दोन उल्लेखनीय गोष्टी म्हणजे,
एक तर रितेश देशमुख यांचे दिग्दर्शन
आणि दुसरे म्हणजे, प्राजक्त देशमुख चे संवाद❤️ @Riteishd
#राजाशिवाजी

MR
भिकु म्हात्रे 🔥 retweetledi

मराठी चित्रपट सृष्टीतला आजवरचा सगळ्यात मोठा चित्रपट प्रदर्शित होतोय…
तिकीटबारीवर घवघवीत यश मिळवून उद्यापासून सर्व विक्रम मोडीत काढत ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक कामगिरी करणारा मराठी चित्रपट ठरो हिच छत्रपती शिवरायांचरणी प्रार्थना!
संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला मोठी स्वप्नं बघायला शिकवणारा हा चित्रपट नव्या पंखांना बळ देणार यात शंकाच नाही…
रितेशजी आपले खूप खूप अभिनंदन आणि प्रचंड अभिनंदन, कौतुक सर्वकाही! 👏🏻👏🏻👏🏻👏🏻

MR
भिकु म्हात्रे 🔥 retweetledi
भिकु म्हात्रे 🔥 retweetledi
भिकु म्हात्रे 🔥 retweetledi

हा महाराष्ट्र दिन आपल्याला एकत्र आणो आणि आपण तो आनंदाने साजरा करूया! 💛🤗
#WhistlePodu #MaharashtraDay

MR
भिकु म्हात्रे 🔥 retweetledi

“दगड मारणारा बाहेरचा असला तरी, तो नेमका कुठे मारायचा हे सांगणारा मात्र आतला-आपलाच असतो”
कोणीतरी भिकार-धर्माच्या नावावर भीक मागणारा उठला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं बोलला. त्याला समर्थन द्यायला दुसरा उभा राहिला. आणि आपले नेते त्यांनी चुकीचा इतिहास वाचला बोलतात. किती छान ना?
म्हणजे कोणी ही यावं महापुरुषांना टपली मारून जावं...!!!
बाहेरचा माणूस जसा तुमचा इतिहास बघतो, तसा तुमच्यातील वाददेखील बघतो.
तुम्हीच सोशल मीडियावर महापुरुषांवर, धर्मावर,जातीपातीवर एकमेकांवर तुटून पडता. आपल्या महापुरुषांवर शंका घेता. आपला इतिहास अर्धवट सांगता. अहो येवढंच काय, सोशल मीडियावर महापुरुषांच्या-देवाधर्माच्या-जातीपातीच्या चांगल्या-वाईट पोस्ट टाकून पोस्टला लाईक्स-कमेंट मिळणवणारे महाभागही असतात.
आज,
तुम्ही एकमेकांना ट्रोल करता
तुम्हीच आपल्या महापूरूषांवर प्रश्न उभे करता.
तुम्हीच, इतर ज्यांना मानतात, त्या महापुरुषांवर वाईट “कंटेंट-मिम्स” बनवता.
आणि मग राग तुम्हाला येतो,
“बाहेरचे आपल्या महापुरुषांबद्दल चुकीचं का बोलतात?”
कारण तुम्हीच आधी आपल्या महापुरुषांची थट्टा करून ठेवली आहे ना?
आज महाराष्ट्रात स्वाभिमान हा कायमचा गुण नाही, तो इव्हेंट-बेस्ड सर्विस आहे.
कार्यक्रम असेल तर स्वाभिमान.
कॅमेरा असेल तर स्वाभिमान.
नेत्याचा आदेश असेल तर स्वाभिमान.
तुम्ही स्वाभिमानासाठीही परवानगी घेता.
“साहेबांनी सांगितलं तर बोलू…”
“आदेश आला तर उतरू…”
“नाहीतर शांत बसू…”
म्हणजे तुम्ही स्वाभिमान भाड्याने दिलाय ना?
बाहेरच्यांना हे दिसत नाही का
हा भग्न समाज?
भग्न भिंतीवर दगड मारायला कोणाला भीती वाटेल?
बाहेरच्यांना माहिती आहे,
इथल्या लोकांना चिडवणं सोप्पं आहे… आणि शांत करणं त्याहून सोपं. दोन-चार पोस्ट… एखादं भाषणं… क्षमेची नौटंकी...आणि सगळं काही शांत.
छत्रपती शिवाजी महाराज एकच, पण तुम्हीच त्यांचे तुकडे केले.
कुणासाठी ते राजकारण
कुणासाठी ते भावना
कुणासाठी ते फक्त स्टेटस
तुम्हीच त्यांना विभागलं…
आणि मग अपेक्षा ठेवता की इतरांनी त्यांना अखंड मानावं?
बाहेरच्यांना आपल्या महापुरुषांबद्दल चुकीचे बोलण्याची “हिंमत कशी होते?”
हिंमत दिली तुम्हीच.
कारण:
तुमच्यात फूट आहे.
तुमच्यात सातत्य नाही.
तुमच्यात अभ्यास नाही.
लक्षात घ्या, जिथे रिकामी जागा असते, तिथे कोणीही येऊन आपली कथा लिहितो.
जग तुम्हाला पाहतं—तुमच्या वागण्यावरून. जर तुम्हीच तुमच्या आदर्श पुरुषांना विसरलात, तर बाहेरच्यांकडून आदराची अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःलाच फसवणं आहे.
दगड बाहेरचा फेकतो-हो.
पण:
नेम धरायला आतला सांगतो.
कमकुवत जागा आतला दाखवतो
आणि कधी कधी… दगड उचलायलाही आतलाच मदत करतो
इतिहासात किल्ले तोफांनी कमी,
फितुरीने जास्त पडलेत.
आजही तसंच आहे.
बाहेरचा बोलतो, तो तर एक आवाज आहे.
पण आतला त्याला पाठिंबा देतो. तोच प्रतिध्वनी बनतो. आवाजापेक्षा प्रतिध्वनी जास्त घातक असतो.
आज,
कोणता मुद्दा मोठा करायचा, कोणता दाबून ठेवायचा.
कोणावर राग काढायचा.
हे सगळं तुम्हीच ठरवता किंवा ठरवून घेता.
बाहेरचा दगड फेकतो,
पण लक्ष्य तुम्हीच रंगवून ठेवलं आहे ना?
तुम्ही स्वतःला वापरू देता.
तुमचा राग भाड्याने देतो.
तुमची निष्ठा पॅकेजमध्ये येते.
तुमचा आवाज ट्रेंडनुसार बदलतो
मग दोष फक्त त्यांचा?
की तुमचा आहे?
“साहेबांनी सांगितलं तरच उभे राहू…”
म्हणजे तुम्ही:
स्वतंत्र नाही.
जागरूक नाही.
फक्त निर्देशांवर चालणारे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य दिलं…पण तुम्ही आजही "साहेबांच्या" परवानगीत जगतो.
तुमचा स्वाभिमानही आता ‘ऑन-ऑफ’ स्विचवर चालतो…आणि स्विच कोणाच्या हातात? ‘साहेबांच्या’!
बाहेरचा माणूस चूक बोलतो. हो, ते चुकीचंच आहे.
पण आतला माणूस,
शांत बसतो,
सोयीप्रमाणे भूमिका घेतो,
आणि कधी कधी टाळ्याही वाजवतो.
तुमचा रागही कोणी ‘डायरेक्ट’ करतो का?
तुमची प्रतिक्रियाही कोणी ‘स्क्रिप्ट’ करतो का?
जर हो,
तर मग दोष बाहेरच्यांना देणं अपुरं आहे.
मग जास्त धोकादायक कोण?
जो दगड फेकतो… की जो नेम कुठे मारायचा सांगतो तो?
स्वतःला विचारा,
तुम्ही सत्यासाठी उभे राहता का?
की फक्त आपल्या गटासाठी?
आपल्या पक्षासाठी?
आपल्या नेत्यांसाठी?
तुम्ही इतिहास समजून घेता का?
की फक्त आपल्या सोयीप्रमाणे वापरता?
जर उत्तर कटू असेल,
तर मान्य करा
तुम्ही त्या नेम सांगणाऱ्यांच्या रांगेत उभे आहात.
“झोपू नकोस, रात्र वैऱ्याची आहे”
याचा अर्थ फक्त बाहेरच्यांपासून सावध राहणं नाही, तर आतल्या फितुरीपासूनही सावध राहणं आहे.
स्वतःच्या दुर्लक्षापासूनही जागं राहणं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान करायचा असेल,
तर आधी तुम्ही एकत्र उभं राहायला शिकावं लागेल.
“ बाहेरून दगड फेकणाऱ्याला थांबवणं सोपं आहे
पण आतून नेम सांगणाऱ्याला थांबवण्यासाठी स्वतःशी प्रामाणिक व्हावं लागेल.”

MR
भिकु म्हात्रे 🔥 retweetledi
भिकु म्हात्रे 🔥 retweetledi
भिकु म्हात्रे 🔥 retweetledi
भिकु म्हात्रे 🔥 retweetledi
भिकु म्हात्रे 🔥 retweetledi

भिकु म्हात्रे 🔥 retweetledi

#Thread 📍
छत्रपती शिवाजी महाराजांना, रामदास स्वामी यांचा परीचय ओळख दिवाकर गोसावी यांच्यामार्फत झाली याबद्दलचे 1658 सालचे जे पत्र आहे ते थोर इतिहास संशोधक - वा सी बेंद्रे यांच्या संशोधनाच्या अनुषंगाने 'बनावट' आहे.
यात ज्या दत्ताजीपंत यांचा वाकेनीस म्हणून उल्लेख आहे , त्याना वाकेनीसी पद 1658 नव्हतेच. ते पद 1660 च्या कितीतरी नंतर आले आहे.
इतिहासकार बेंद्रे, या प्रकरणात पान क्रमांक ७५ ला तळटिपेत लिहतात - "अर्थात् भास्कर गोसाव्याचे १३-२-१६५८ चे रामदासांबाबतचे पत्र पूर्ण बनावट आहे. 'दत्ताजीपंत वाकेनिवीस' हा उल्लेख सन १६७४ त ते सरसुभेदारीवर जाईपर्यंत त्याच्या नावाने पत्रे निघणे अशक्य आहेत"
पत्राचा सगळा मजकूर - पूढीलप्रमाणे
श्रीगुरुभक्तपरायण मोक्षश्रिया विराजित दिवाकर गोसावी या प्रति भास्कर गोसावी नमस्कार विनंति. उपरि श्रीचे उछाहास होनु पनास भिक्षेस मिळाले ते भानजी गोसावी बराचर पाठविले. पावतील. शिवाजी राजे याजकडे भिक्षेस गेलों. त्यानीं विचारिलें " तुम्ही कोठील? कोण ! कोणाठिकाणी असतां । " त्यावरून आम्ही बोललों की " आम्ही राम-दासी. श्रीसमर्थीचे शिष्य. चाफळास हों. मग ते बोलले की “ ते कोठे राहतात व मूळ गांव कोण?" त्यावरून मी सांगितले कर्की " गंगातीरचे जांबचे राहणों. प्रस्तुत चाफळास मठ करून श्री देवाची स्थापना करून उछाह मोहोछव चालू करून आम्हा सर्वास आज्ञा की " तुम्ही भिक्षा करून उछाह करीत जावा. " सागितल्यावरून आम्ही हिंडत आहों " असे बोलतां राजेश्रीनी दत्ताजीपंत वाकेनिवीस यास' प्रति-वर्षी श्रीउछाहास दोनशे होनु देत जाणे' ह्मणून पत्र पाठविलें तें हो + + स येतील. कलावे फाल्गुन शु२ शके १५८० * हे विनंति.
[ सज्जनगड व समर्थ रामदास पृ. १५० ]
या पत्रात दत्ताजीपंत यांनी स्वराज्याच्या तिजोरीतुन 200 होन महाराजांच्या आज्ञाने देण्याचे सांगितले आहे. मुळात दत्ताजीपंताना वाकेनवीसी पद 1658 ला नसल्याने, वाकेनवीसी पुढील काळात मिळाली. याचा अर्थ हे फार नंतरच्या काळात तयार केल असावं.
संदर्भ - १) छत्रपती संभाजी महाराज चरित्र - वा सी बेंद्रे ( पृ. क्र. ७५)
२) महाराष्ट्र इतिहास मंजिरी ( पृ. क्र. ९४) - द. वि आपटे


MR
भिकु म्हात्रे 🔥 retweetledi














