तुषार इंगळे
28.6K posts


@MarathiDeadpool @Phanase_Patil थोडं भूतकाळात डोकावल्यास शासकीय भाषेत याला गळती झाली असे म्हणतात.
MR
तुषार इंगळे รีทวีตแล้ว

आजचा महाराष्ट्र हा 'प्रबोधनाच्या वाटेवरून' घसरून 'प्रक्षोभाच्या दरीत' पडतोय की काय, अशी भीती वाटते. जोपर्यंत लोक पुतळ्यापेक्षा पुस्तकाला आणि उत्सवापेक्षा रोजगाराला महत्त्व देणार नाहीत, तोपर्यंत हा 'अस्मितांचा खेळ' असाच सुरू राहील आणि मूलभूत प्रश्न 'मसाल्याच्या बातम्यां'खाली गाडले जातील.
आपण 'वापरले जात आहोत' हे समजण्याइतकी प्रगल्भता आता समाजात यायला हवी. स्वतःच्या अस्मितेचा वापर करून जर कोणी आपलीच पिढी बरबाद करत असेल, तर ती 'मेंदूची पोकळी' भरून काढण्याची वेळ आली आहे.
MR
तुषार इंगळे รีทวีตแล้ว

या पोस्ट ला दोन तासात 26 हजार views आलेत😃
माझे अनेक मानसिक आरोग्यावर असलेल्या पोस्ट अश्या viral जात नाहीत कारण लोकांना solution नकोय, लक्ष मूळ प्रश्नांकडून दुसरीकडे तात्पुरते वळवायचे आहे.
बाबा-बुवा, तंत्र मंत्र, लफडी,नशेचे पदार्थ हे तात्पुरते लक्ष वळविण्याचे प्रकार आहेत, त्यातून कोणत्याही समस्येचे समाधान निघत नाही.

MR
तुषार इंगळे รีทวีตแล้ว
तुषार इंगळे รีทวีตแล้ว

जॉर्ज फर्नांडिस ने ७० दशकात कोळसा वाहून नेणाऱ्या रेल्वे बंद करून देशात रेल्वे मध्ये संप करून जयप्रकाश नारायण आणि तत्कालीन अमेरिकेला सरकार ल मदत करत होते(कारण भारत रशिया जवळ जात होता म्हणून) हे सांगायचे आमचे मित्र बोडस सर विसरले..
आज सुद्धा रशिया मित्र म्हणून आहे आणि अमेरिका....
Sharangdhar Bodasशारंगधर बोडस@ipc2k15
@Garjana206 हा डिकास्टा म्हणजे त्या वेळच्या समाजवाद्यांचा "ब्ल्यू आइड बॉय जॉर्ज फर्नांडिस". जो नंतर भाजपला जाऊन मिळाला .आणि डाव्या लिब्रांडू पुरोगामी काँग्रेसच्या लोकांनी त्याला जाम शिव्या घातल्या. मेल्यावर श्रद्धांजली देखील वाहिली नाही.
MR
तुषार इंगळे รีทวีตแล้ว
तुषार इंगळे รีทวีตแล้ว
तुषार इंगळे รีทวีตแล้ว

भोंदूगिरी हा श्रद्धेचा गैरफायदा घेणारा व्यवसाय आहे.जर समाजाने
'चमत्कारांना' नाकारले, तर या लोकांचे दुकान आपोआप बंद होईल.
जेव्हा एखादी व्यक्ती तर्क आणि सारासार विचार सोडून अंधश्रद्धेच्या
आहारी जाते, तेव्हा तिची स्वतंत्र विचार करण्याची क्षमता संपते.
अध्यात्माचा खरा अर्थ आत्मशोध आणि सदाचार असा आहे, पण जेव्हा
त्याचे रूपांतर अशा अघोरी कृत्यांत होते, तेव्हा ते केवळ शोषण ठरते.
'सुशिक्षित' असणे आणि 'सुज्ञ' असणे यातला फरक इथेच स्पष्ट होतो.
आयुष्यातील संकटांवर झटपट उपाय शोधण्याच्या नादात माणूस
बुवाबाजीला शरण जातो. देवाच्या कोपाची किंवा पापाची भीती घालून
भोंदू बाबा लोकांना मानसिक गुलाम बनवतात.विज्ञानाच्या युगातही
वैयक्तिक लाभासाठी जुन्या कर्मकांडांना 'चमत्कार' म्हणून सादर केले
जाते.
अशा भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी कायद्यापेक्षा सामाजिक
जनजागृती जास्त प्रभावी ठरेल. कायद्यापेक्षा सामाजिक जनजागृती
जास्त प्रभावी ठरू शकते, कारण कायदा फक्त गुन्ह्यानंतर शिक्षा देऊ
शकतो, पण जनजागृती गुन्हासुद्धा होऊ देत नाही.|
कायदा शरीरावर नियंत्रण ठेवतो, पण विचार बदलण्यासाठी शिक्षणाची
आणि तर्काची गरज असते. जेव्हा लोकांची सारासार विचारशक्ती जागी
होते, तेव्हा ते स्वतःहून अशा बाबांपासून लांब राहतात.
कायद्याची भीती दाखवून लोक काही काळ थांबतील, पण जोपर्यंत
मनातील अंधश्रद्धा आणि भीती जात नाही, तोपर्यंत लोक चोरून-लपून
अशा गोष्टी करतच राहतात.
MR
तुषार इंगळे รีทวีตแล้ว
तुषार इंगळे รีทวีตแล้ว















