The Swayampurna Maharashtra Residential Roof Top (SMART) Solar Scheme provides up to 95% subsidies on solar installations for low-income and high-efficiency households.
@Dev_Fadnavis
भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत आयोजित प्रशिक्षण अभियान कार्यशाळेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळचे काही क्षण..
महाराष्ट्र शासनाने गोवंशाची अवैध वाहतूक, गोहत्या तसेच बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबाबत आज मंत्रालयातील माझ्या दालनात बैठक पार पडली.
बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर, अपर पोलीस अधीक्षक नयेामी साटम यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
वरळी जेट्टीच्या नियोजित विकासाबाबत तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई यांच्या होडींग व जाहीरात धोरणाबाबत आज मंत्रालयात आढावा बैठक पार पडली.
मुंबईतील सागरी वाहतूक अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. वरळी जेट्टीच्या नियोजित विकासासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलली असून, या प्रकल्पामुळे मुंबईतील जलवाहतूक, आपत्कालीन सेवा आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. वरळी जेट्टीचा विकास हा केवळ वाहतुकीपुरता मर्यादित नसून, आपत्कालीन सेवा, पर्यटन आणि किनारी भागातील कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे.
बैठकीस मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mybmc@AshwiniBhide
वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक जलवाहतुकीला चालना देण्यासाठी जुन्या लाकडी बोटींचे टप्या-टप्प्याने इलेक्ट्रिक बोटींमध्ये रूपांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री मा.श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात मत्स्यव्यवसाय विभागाने घेतला आहे. या उपक्रमासाठी बोट मालकांना मुंबई बँकेमार्फत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
इलेक्ट्रिक बोटींच्या माध्यमातून इंधन खर्चात बचत होण्याबरोबरच प्रदूषणमुक्त आणि हरित जलवाहतुकीला देखील मोठी चालना मिळणार आहे. शासनाचा हा निर्णय सागरी क्षेत्रासाठी पर्यावरणपूरक आणि भविष्यकालीन दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
या निर्णयाच्या समर्थनार्थ आज “नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमन” संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात सदिच्छा भेट घेत शासनाच्या या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@fisheriesgom
Devabhau is driving one of the world’s biggest transformations
From connectivity to AI, semiconductors, and clean energy - Maharashtra is building the future.
42 YEARS OF SAARANSH!❤️🎬
Today, I complete 42 years in the world of cinema and entertainment. Exactly 42 years ago, on 25th May 1984, my first film “Saaransh” was released. ❤️
What a journey it has been. Full of struggles, victories, failures, learning, laughter, tears, friendships, and unforgettable memories. But through all the ups and downs, “Saaransh” remains the most defining and iconic chapter of my life.🥹🥹
I will forever remain grateful to the Universe, to all the directors, producers, writers, technicians, co-actors, and audiences who believed in me and gave me love through all these years.
A very special and heartfelt THANK YOU to Rajshri Productions for backing a newcomer like me, and above all to Mahesh Bhatt Saab for having the courage and conviction to cast me in a role that changed my life forever.😍❤️
Whatever I am today is because of “Saaransh”. From a small-town boy from Shimla to a man who got to live his dream for 42 years… I can only say GOD IS KIND! Har Har Mahadev! ❤️🙏 @rajshri#42YearsOfSaaransh#MaheshBhatt#AnupamKher
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कार्यक्षेत्रात पवनचक्की प्रकल्प राबविण्याच्या अनुषंगाने आज मंत्रालयातील माझ्या दालनात Zest Enterprise कंपनीमार्फत सविस्तर सादरीकरण पार पडले.
हरित ऊर्जा निर्मितीला चालना देणे, सागरी क्षेत्राचा शाश्वत विकास साधणे तसेच भविष्यातील ऊर्जेची गरज लक्षात घेऊन आधुनिक आणि पर्यावरणपूरक प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली. तसेच सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
बैठकीस Zest Enterprise चे रजनीश बहल व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mahamaritime1
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि पर्यटकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांबाबत आज मंत्रालयातील माझ्या दालनात आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनानंतर देशांतर्गत पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून सिंधुदुर्ग जिल्हाही पर्यटकांची पसंती ठरत आहे. जिल्ह्यात वाढणारी पर्यटक संख्या लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रभावी नियोजन, स्वच्छतेवर विशेष भर, पार्किंग व्यवस्था आणि पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, MTDC चे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर, अपर पोलीस अधीक्षक नयेामी साटम, जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायतींचे मुख्याधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
जहाज पुर्नावापरा संदर्भात श्री राम हरित जहाज पुनर्वापर उद्योग (युनिट-२) एलएलपी या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली.
राज्यातील वापरात नसलेल्या बोटी आणि जहाजांच्या पुनर्वापरासाठी सक्षम यंत्रणा उभारणे ही काळाची गरज आहे. यामुळे पर्यावरणपूरक व्यवस्थापनास चालना मिळेलच, शिवाय स्क्रॅप प्रक्रियेतून महसूल निर्मितीचे नवीन मार्गही उपलब्ध होतील. विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण प्रक्रियेचा सविस्तर अभ्यास करून प्रभावी धोरण आखण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर श्री राम हरित जहाज पुनर्वापर उद्योग (युनिट-२) एलएलपी यांनी राज्यातील वापरात नसलेल्या बोटी व जहाजांचा पुनर्वापर करण्याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना यावेळी दिल्या.
बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकारी आणि श्री राम हरित जहाज पुनर्वापर उद्योग (युनिट-२) एलएलपी (Shree Ram Green Ship Recycling Industries (Unit-II) LLP ) चे प्रतिनिधी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mahamaritime1
@nitingodbole@Dev_Fadnavis मान्य पण हे सगळं आधी विचार करून ज्या त्या यंत्रणा तयार ठेवून मगच हात घातला असता तर जास्त परिणामकारक झाले असते असे वाटते. असो 🤭
@nitingodbole@Dev_Fadnavis नितीन, खरा मुद्दा हा आहे, जे इथून गेले ते कुठे गेले? आणि तिथे जाऊन ते काय घाण करतील? जो पर्यंत या समस्येचा सर्वांगीण विचार करून समूळ उच्चाटन करत नाही तो पर्यंत ही मलमपट्टी काम नाही करणार. जे कोणी बांगलादेशी वा पाकिस्तानी असतील त्यांना सीमेपार का नाही सोडले? ह्याचे उत्तर काय??