
Shriniwas Morewar
18 posts
















संदर्भ: आप महाराष्ट्र/२०२४/२३०७००१ प्रति, मा. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य विषय : "कृषि सेवक" पदाचा सेवक कालावधी रद्द करून "कृषि सहाय्यक" म्हणून सेवेत घेण्याबाबत. महोदय, महाराष्ट्र सरकारने २००४ मध्ये शासन निर्णयांनुसार राज्यातील सततची दुष्काळाची परिस्थिती हाताळण्यासाठी व वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी कृषि सहाय्यकांची पदे ‘कृषिसेवक’ म्हणून भरणेबाबत निर्णय घेतला होता. यांमधील तरतुदीना अनुसरूनच ‘कृषि सेवक जाहिरात २०२४’ अंतर्गत पात्र उमेदवारांना कृषिसेवक म्हणून नियुक्ती मिळाली असून सध्या अनेक उमेदवार कृषि विभागामधे कार्यरत आहेत. सध्या कृषि सेवकांना पदावर असताना विविध प्रकारच्या प्रशासकीय व वित्तीय जबाबदाऱ्या, विस्तार व प्रशिक्षणाची कामे, नैसर्गिक आपत्तीवेळीच्या विविध जबाबदाऱ्या, निविष्ठा व गुणनियंत्रण, फलोत्पादन/पणन, मृदसंधारण व जलसंधारण, सांख्यिकी/ संनियंत्रण व मूल्यमापन संबंधी विविध कामे तसेच गाव पातळीवरील विविध कामे, वेळोवेळी कृषि विभागाकडून आलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी असे असंख्य कार्ये वेळोवेळी पार पाडावी लागतात. आपणांस ज्ञात आहेच की आपल्याच सरकारच्या नेतृत्वात आणि कृषि विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे नुकताच आपल्या महाराष्ट्र राज्याने देशपातळीवरचा १५ व्या कृषि नेतृत्व समितीचा २०२४ चा ‘सर्वोत्कृष्ट कृषि राज्य पुरस्कार’ पटकावला आहे. आरोग्य विभागाप्रमाणे कृषि हाही घटक अत्यावश्यक सेवांमध्ये मोडत असुनही शेतकरी हितासाठी राबणाऱ्या कृषीसेवकांना "कृषी सहाय्यक" पदी सेवेत घेऊन न्याय मिळावा हि सर्व कृषीसेवकांची मागणी आहे. या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि "कृषि सेवक" पदावरील कर्मचाऱ्यांचा सेवक कालावधी रद्द करून त्यांना "कृषि सहाय्यक" म्हणून सेवेत घेऊन सेवेचे लाभ पूर्वलक्षी प्रभावाने अदा करण्यात यावेत या मागणीचा विचार करावा व हजारो कृषीसेवकांना न्याय द्यावा. धन्यवाद, @mieknathshinde @CMOMaharashtra











