Ajay Patil أُعيد تغريده

जलसंधारण खात्यातील सुमारे ८ हजार ६६७ पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया राबविण्याची घोषणा मृद व जलसंधारण मंत्री महोदयांनी वर्षभरापुर्वी केली होती. या भरतीसाठी 'इंजिनिअरींग असोसिएशन' ही अभियंत्यांची संघटना सातत्याने पाठपुरावा करीत आहे. या मागणीसाठी सदर संघटनेच्या वतीने आंदोलन देखील करण्यात आले. वाढते वय आणि बेरोजगारी यामुळे अभियंते चिंतेत आहेत. पदभरतीची जाहिरात वेळेत प्रसिद्ध होऊन ही प्रक्रिया पार पडली तर अनेक अभियंत्यांना रोजगार मिळू शकेल. हे लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री आणि मृद व जलसंधारण मंत्री यांनी या विभागातील ही भरती तातडीने जाहिर करुन वेळेत पुर्ण करावी.
@CMOMaharashtra @SanjayDRathods
MR

















