Kunal More

187 posts

Kunal More banner
Kunal More

Kunal More

@moreverr18

Do what works for you.

Katılım Haziran 2021
100 Takip Edilen8 Takipçiler
Kunal More retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
राज्य शासनाने जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठीचे आदेश असताना देखील अजूनही नगरपरिषद संचानालय फक्त आणि फक्त बैठकाच घेत आहे. कृपया लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती. @Dev_Fadnavis @ekantipur_com @CMOMaharashtra @Aaple_Sarkarr
Engineers Association Official tweet media
MR
7
134
104
1.3K
Kunal More retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भविष्यात होणाऱ्या "मेगाभरतीच्या " अनुषंगाने "कॅडर बकेटींग" शासन निर्णय तसेच लोकसेवा आयोगाकडून "परीक्षा पद्धती" ( Exam Scheme) अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत याबाबत तातडीने कार्यवाही करून लवकरात लवकर जाहिराती प्रसिद्ध करून बेरोजगार उमेदवारांना दिलासा द्यावा.@CMOMaharashtra
MR
13
236
156
1.9K
Kunal More retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
सरळसेवा परीक्षांचा इतिहास पाहता आगामी सर्वच परीक्षा हे खासगी केंद्र न देता अधिकृत @TCS_iON केंद्रावरच घ्यावेत व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती @MMRDAOfficial @TMCaTweetAway @NMMConline @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @CMOMaharashtra @rahul
MR
22
418
233
1.8K
Kunal More retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
जलसंधारण विभागाच्या भरती प्रक्रियेत स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधरांवर होणारा अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. पात्रतेचे निकष पारदर्शक आणि सर्वसमावेशक असणे ही काळाची गरज आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांची दखल घेऊन तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी; अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवाला गेलाच पाहिजे ! #StudentsVoice #WRD_Recruitment #JusticeForEngineers
Engineers Association Official@degree_holders

जलसंधारण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांवर " मृदा संधारण अधिकारी" पदांच्या पात्रतेच्या बाबत कोणत्याही प्रकारे अन्याय होता कामा नये अन्यथा आम्हा अभियांत्रिकी उमेदवारांना राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल. @SanjayDRathods @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra @Dhananjay4INC

MR
13
227
140
1.1K
Kunal More retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलसंधारण विभागात स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांवर " मृदा संधारण अधिकारी" पदांच्या पात्रतेच्या बाबत कोणत्याही प्रकारे अन्याय होता कामा नये अन्यथा आम्हा अभियांत्रिकी उमेदवारांना राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल. @SanjayDRathods @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra @Dhananjay4INC
MR
25
331
210
2.9K
Kunal More retweetledi
Ashwin 🇮🇳
Ashwin 🇮🇳@ashwinravi99·
Retweet if you want the man who picked up 16 wickets at 21 & economy of 7 in 2022 for KKR, as a solid replacement for an experienced new ball bowler.#ipl2026
Ashwin 🇮🇳 tweet media
English
473
3.4K
26.4K
619.7K
Kunal More retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च २०२६ ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' हा प्रश्न पडतो.  ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा 'गीतारहस्य' सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब 'तीर्थ' प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे.  महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजदेखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जणं या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे.  हा खरात स्त्रियांचं शोषण करतोय, ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही. आधी आमदार खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड. आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे. आणि या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांचे सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिकटून रहायचं आहे.  या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का ? माध्यमं सध्या खरात प्रकरणाचा रोज पाठपुरावा करत आहेत हे चांगलं आहे पण म्हणून त्यांनी जनतेला पुन्हा एकदा आपण कोण होतो याचं दर्शन घडवायला हवं असं मला मनापासून वाटतं. गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून मी हा महाराष्ट्र कोणी घडवला आहे याचं दर्शन मुद्दामून करवलं होतं, ती माझी समज काय आहे हे दाखवण्यासाठी नाही. तर आत्ताच्या तरुण पिढीला हे कळावं म्हणून. माझ्यापरीने हे काम मी करत राहणार आहेच.  पण महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. हे असले लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात. महाराष्ट्रातील गावागावांत आजही कीर्तनं होतात, ज्ञानेश्वरीचं पठण होतं, आजही या राज्यात तर्काचा आवाज मोठा आहे. पण जर तुम्ही या असल्या नाठाळांना आपले नेते मानणार असाल तर महाराष्ट्राचं काही खरं नाही हे नक्की.  राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला आहे. जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेंव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं ? माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल. माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपछाड राजकारणाचा भाग होऊ नका. या असल्या बुवाबाबांना शोधून काढा. त्यांची कृत्य उघडकीस आणा. इतकंच नाही तर खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका.
MR
77
583
3K
106K
Kunal More retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
अनेक वर्षांपासून @OfficialPMRDA मध्ये भरती करण्यात आलेली नसून सर्व कारभार कंत्राटी अभियंते सांभाळत आहेत,आपल्या विभागात तात्काळ @MMRDAOfficial सारखी भरती राबवून स्पर्धा परीक्षार्थींना न्याय द्यावा ही विनंती @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @PuneTimesOnline @PUWJ_PUNE
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
10
228
139
2.2K
Kunal More retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
माननीय मंत्री महोदय @SanjayDRathods साहेब सद्यःस्थितीत अधिवेशन सुरू आहे अधिवेशनात पदभरती बाबत " कालबद्ध कार्यक्रम" जाहीर करून विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. पुन्हा नवीन घोषणा नको ही नम्र विनंती. खालील ट्विट देखील आपलेच आहे.
Engineers Association Official tweet media
MR
17
402
220
1.8K
Kunal More retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
Mr. प्रफुल पटेल जी (माजी केंद्रीयनागरी उड्डाणमंत्री) आपणास विनंती आहे की, अजितदादांच्या अपघाताला / घातपातला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहीतच असेल ते आपण लोकांना सांगावं.. तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात, हे महाराष्ट्राला दाखवून द्या… उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल, ही अपेक्षा..! @praful_patel #justice_for_AJIT_DADA
MR
99
335
2.3K
71.9K
Kunal More retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
राज्याचे दोन्ही जलसंपदा मंत्री @RVikhePatil @girishdmahajan माजी वनमंत्री @SMungantiwar साहेबांना भेटून उमेदवारांनी निवेदन दिले. याबाबत @CMOMaharashtra देखील स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती. #WRD_JE
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
16
324
205
1.5K
Kunal More retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
ऑक्टोबर 2023 मध्ये जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती करायला वित्त विभाग परवानगी दिली होती. आज 3 वर्ष उलटून गेले तरी जलसंपदा विभाग सेवाप्रवेश नियम अद्ययावत करणे या कारणाखाली 3 वर्ष चालढकल करत आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी ही नम्र विनंती. @Dev_Fadnavis
Engineers Association Official tweet media
MR
23
437
250
2.6K
Kunal More retweetledi
Pooja Ashok More
Pooja Ashok More@poojamorespeaks·
विद्यार्थी हितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी PMC परीक्षा TCs ion सेंटर वरच व्हाव्यात हा विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल खूप खूप आभार🙏 @Dev_Fadnavis
Pooja Ashok More tweet media
MR
110
535
351
4.4K
Kunal More retweetledi
Ashish
Ashish@imashish269·
PMC EXAM POSTPONED.. 🔥🔥 Thank you @moreverr18 🙏
English
1
1
2
45
Kunal More retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
अखेर राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या प्रयत्नामुळे PMC कनिष्ठ अभियंता परीक्षा पुढे ढकलली, त्याबद्दल सरकारचे आभार.. सदरील परीक्षा पुन्हा घेत असताना परीक्षा केंद्र TCS ION केंद्रांवरच घ्यावी, ही विनंती..! @Dev_Fadnavis @mieknathshinde
Rohit Pawar tweet media
Rohit Pawar@RRPSpeaks

PMC कनिष्ठ अभियंता पदाच्या 169 जागांसाठी २५ जानेवारी रोजी होत असलेल्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांनी TCS ION केंद्रांची मागणी करूनही त्यांना खाजगी परीक्षा केंद्र देण्यात आली आहेत. यापुर्वी खाजगी परीक्षा केंद्रांवर झालेले गैरप्रकार पाहता सदरील परीक्षा पुन्हा खाजगी केंद्रांवरच घेतली तर परत गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच दुष्काळात तेरावा महिना म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना ३०० किमीहून अधिक दुरची केंद्र देण्यात आली आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना मोठा मानसिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी सरकारने तात्काळ सदरील विषयामध्ये लक्ष घालून खाजगी केंद्रांऐवजी TCS ION केंद्रांवर परीक्षा घेण्याबाबत निर्णय घ्यावा, ही विनंती...! @Dev_Fadnavis @mieknathshinde

MR
7
119
189
4.7K
Kunal More retweetledi
nooneasked
nooneasked@noone__asked·
२५ जानेवारी ला होणारी pmc je परीक्षा tcs ion वर च घेण्यात यावी . ४ दिवसापासून स्टुडेंट्स प्रयत्न करत आहे . पण अजूनही त्यांना न्याय मिळत नाही . लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा ही विनंती . #PMC_JE
nooneasked tweet media
MR
5
216
132
1.6K
Kunal More retweetledi
Vasant More | वसंत मोरे
पुणेकरांनी थोडा विचार करावा हे का घडवण्यात आले ? याला कारण २०२२ ते २०२६ या कालावधीमधे राज्य सरकारने प्रशासनाला हाताशी धरून पुणे महानगरपालिकेत केलेला कारभार वेळोवेळी बाहेर काढला जाईल..., या भीतीने पुणे महानगरपालिकेत प्रमुख पदांवर काम करणाऱ्या सर्व पक्षीय नगरसेवकांना निवडणुकीत
Vasant More | वसंत मोरे tweet media
MR
22
47
357
30.4K
Kunal More retweetledi