RAJESH ANKUSH GHUGE retweetledi

@mybmc
सर्व अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षार्थी आपल्याला विनंती आणि विनवण्या करून थकले. शेवटी, त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले.
त्यांची मागणी अत्यंत साधी आणि सरळ आहे:
👉 1000 रुपये परीक्षा शुल्क भरलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना पारदर्शक आणि न्याय्य परीक्षा द्यावी.
👉 परीक्षा फक्त अधिकृत केंद्रांवरच घेण्यात याव्यात.
👉 500-600 किमी दूर परीक्षा केंद्र देणे अन्यायकारक आहे.
👉 गल्ली-बोळातील खाजगी परीक्षा केंद्रे जाणूनबुजून निवडणे हे संशयास्पद आहे.
👉 यापूर्वी गैरव्यवहार झालेल्या परीक्षा केंद्रांची पुन्हा निवड का केली जात आहे?
यातून नेमके काय साध्य करायचे आहे?????
Computerized online exam
मध्ये विद्यार्थ्यांना अतिशय जुने, निकृष्ट दर्जाचे desktop आणि keyboard दिले जातात, त्यामुळे परीक्षा सुरू असतानाच तांत्रिक अडचणी येतात.
पारदर्शकतेचा संपूर्ण अभाव आहे.
वारंवार तक्रारी असूनही प्रशासन जाणूनबुजून अशा परीक्षा केंद्रांची निवड करत आहे, जिथे गैरव्यवहाराला वाव मिळू शकतो.
👉 ही परिस्थिती कुठे घेऊन चालली आहे?
मा. मनपा आयुक्त श्री. भूषण गगराणीजी,
आपल्याकडून ही अपेक्षा नाहीच.
"Free, fair, and transparent exam" हा प्रत्येक परीक्षार्थी चा हक्क आहे, आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे.
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@maha_governor
@AjitPawarSpeaks
@ssaunik
मनमानी कारभार आणि राजकारणाच्या खेळात गोरगरीब विद्यार्थ्यांना ढकलू नका.
त्यांची मागणी पूर्णतः रास्त आहे.
तात्काळ अधिकृत परीक्षा केंद्रांवरच परीक्षा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा.
🔸 हे सर्व उमेदवार एकत्र आल्यावर
शेवटचा मार्ग कोणता व कसा निवडतात याचा आपणास अनुभव आहेच.
🔸 अशा अन्यायकारक निर्णयांमुळे महाराष्ट्र सरकारची देशभर बदनामी झाल्याची अनेक उदाहरणे ताजी आहेत.
हे पुन्हा अनुभवायचे आहे का??
MR



























